शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नेटिझन्स, जरा जपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 02:48 IST

आज आम्ही सोशल मीडियाच्या पार आहारी गेलो आहेत. एवढे की त्यामुळे होणाऱ्या नुकसानाचाही आम्हाला पर्वा राहिलेली नाही किंबहुना तसे भानच आम्हाला नाही.

आज आम्ही सोशल मीडियाच्या पार आहारी गेलो आहेत. एवढे की त्यामुळे होणाऱ्या नुकसानाचाही आम्हाला पर्वा राहिलेली नाही किंबहुना तसे भानच आम्हाला नाही. आपल्या आयुष्यातील अगदी लहानसहान प्रत्येक गोष्ट फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर शेअर केल्याशिवाय आम्हाला चैनच नसते. तसेही एखादी गोष्ट फुकटात मिळाली की ती जास्तीतजास्त वापरून घेण्याकडे आमचा कल असतो आणि आमच्या या प्रवृत्तीचाच मग फेसबुकसारख्या कंपन्या फायदा उचलत असतात. आम्ही जो डेटा फेसबुक, टिष्ट्वटर यासारख्या साईटस्वर टाकतो त्याचे पुढे काय होत असेल याचा विचारही करीत नाही. पण या वरील आमच्या वैयक्तिक माहितीची राजरोसपणे चोरी होतेय. यासंदर्भात अलीकडेच केम्ब्रिज अ‍ॅनलिटिकाचे प्रकरण उघडकीस आले असतानाच सायबरतज्ज्ञ अ‍ॅड. महेंद्र लिमये यांनी सुद्धा नेटिझन्सना यासंदर्भात सतर्क केले आहे. त्यांच्या मते फेसबुक वापरणाºया भारतातील २० कोटी लोकांचा डेटा असुरक्षित आहे. भारतीय डिजिटल निरक्षर असल्याचे त्यांचे म्हणणे मान्य करावे लागेल. तसेच मोबाईलवरून आर्थिक व्यवहार टाळण्याचा सल्लासुद्धा गांभीर्याने घ्यावा लागेल. त्याचे कारण असे की आमच्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की आपल्या मोबाईलवरील प्रत्येक डेटा अगदी बँक व्यवहार पण फेसबुकला स्टोअर होत असतो आणि मग या कंपन्या हीच माहिती कोट्यवधी रुपयात विकतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की फेसबुक असो वा अन्य कुठलाही सोशल मीडिया ते व्यवसाय करताहेत. समाजकार्य नाही. सोशल मीडियावरील डेटाचा होणारा दुरुपयोग लक्षात घेता त्यावर सरकारी माहितीसुद्धा सुरक्षित नसल्याचा इशारा लिमये यांनी दिला आहे. २०१२ साली शासकीय दस्तावेज सोशल मीडियावर टाकण्याचे एक प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले होते. त्यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने सरकारी अधिकाºयांसाठी ई-मेल धोरण तयार केले होते. त्यानुसार सोशल मीडियावर शासकीय माहितीचे आदानप्रदान हे कायद्याचे उल्लंघन ठरते. पण सोशल मीडिया कंपन्यांचे सर्व्हर विदेशात असल्याने या कंपन्या भारतीय कायदे मानण्यास बाध्य नाहीत. अमेरिकेत नऊ इंटरनेट कंपन्यांनी आॅपरेशन प्रिझमअंतर्गत भारतासह अनेक देशांची माहिती अमेरिकी गुप्तचर संस्थांना पुरविली होती. हे वास्तव उघड झाल्यावरही भारत सरकार या कंपन्यांविरुद्ध कुठलीही कारवाई करू शकले नव्हते, हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे भूतकाळातील अशा घटनांमधून धडा घेत वेळीच या माध्यमांना आणि त्यांच्या वापराला आवर घालणे नितांत गरजेचे आहे.