शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

दिल्लीतील मराठी खासदारांची लॉबी समर्थ होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:11 IST

गुणवान मराठी माणसांना आणि संबंधित अधिका-यांना रास्त संधी दिली जात नाही. त्यांना गुणवत्तेच्या आधारावर रास्त संधी मिळण्यासाठी मराठी खासदार त्यांच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे बंध बाजूस सारून आवाज उठविणार का?

- प्रभाकर कुलकर्णी(वरिष्ठ पत्रकार व स्तंभ लेखक )लोकप्रतिनिधी या नात्याने खासदारांचे विशेष महत्त्व आहे. दिल्लीतील सत्ताकेंद्र सतत संपर्क साधून आपल्या बाजूला वळविणे आणि आपल्या राज्यातील भाषिक अस्मिता सांभाळण्यासाठी आणि विकास कामे करून घेण्यासाठी दबाव आणणे हे खासदारांना शक्य असते. इतर भाषिक राज्यांतील खासदार हे सातत्याने करीत असताना मराठी खासदार मात्र मागे राहतात आणि मराठी अस्मिता एका अर्थाने डावलली जाते, हे चित्र बदलण्याची वेळ आली आहे.केंद्र सरकारच्या शासकीय विभागात कोणत्याही पात्र महाराष्ट्रीयनांना प्रवेश मिळत नाही. इतर राज्यांतील खासदारांच्या समर्थ लॉबीमुळे ही अडचण निर्माण झाली आहे. एका महाराष्ट्रीयन खासदाराने सांगितले की, अमराठी खासदार इतके जागरूक आहेत, की ते दिल्लीतील राजकीय शक्ती-केंद्रांशी संपर्कसाधतात आणि राष्ट्रीयीकृत बँका व इतर शासकीय योजनांतील महत्त्वाच्या पदांचा आपल्या भाषिक अधिकाºयांना लाभ मिळावा, यासाठी दबाव टाकतात. विशेषत: सर्व राष्ट्रीयीकृत बँकांत अमराठी अधिकारी अध्यक्ष आहेत. सर्व बँकांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अमराठी आहेत.मध्यमवर्गातील महाराष्ट्रीयन व्यक्तींनी पुढाकार घेऊन स्थापन झालेल्या बँक आॅफ महाराष्ट्रमध्येही अविरतपणे अध्यक्ष आणि संचालकांसाठी १५-२० वर्षांहून अधिक काळ अमराठी व्यक्तींची निवड होत होती. नुकतीच निवड झालेले अध्यक्ष हे महाराष्ट्रीयन आहेत. पण इतर सर्व संचालक अमराठी आहेत.गुणवान मराठी माणसांना आणि संबंधित अधिकाºयांना रास्त संधी दिली जात नाही. यासंदर्भात या बँकेतील एक पूर्वीची घटना लक्षात घेण्यासारखी आहे. अर्थ क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती म्हणून पुण्याचे वसंतराव पटवर्धन हे प्रसिद्ध आहेत. त्यांची या बँकेच्या अध्यक्षपदावर या गुणवत्तेच्या जोरावर निवड होणे सहज शक्य होते. कारण सक्षम अधिकारी या नात्याने त्यांनी या बँकेत काम केलेही होते. पण हे सहजासहजी घडले नाही. जनता पक्षाच्या काळात मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांना पक्षाचे नेते एस.एम जोशी यांना सांगावे लागले आणि पटवर्धन यांची अध्यक्षपदावर निवड झाली. हे उदाहरण एवढ्यासाठी लक्षणीय आहे की, गुणवान मराठी माणसांना केवळ गुणवत्तेच्या आधारावर रास्त संधी मिळणे दिल्लीच्या सत्ताकेंद्राच्या व अन्य भाषिक खासदारांच्या दबावाच्या राजकारणात शक्य नाही.या महाराष्ट्र बँकेच्या युनियनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमराठी अध्यक्ष आणि संचालकांच्या काळात, इतर राज्यांतील त्यांच्या ज्ञात व बड्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कर्जे दिलेली आहेत आणि आता ती कर्जे एनपीएत अडकली आहेत. मोठ्या थकीत कर्जाचे ओझे आता वसुलीने कमी केले नाही तर ही बँक संकट-समस्यांच्या गर्तेत सापडणार आहे आणि याचा फायदा घेऊन अन्य प्रादेशिक बँकांशी विलिनीकरण करण्याच्या हेतूने ही बँक संपविली तर मराठी माणूस आपली बँक गमावेल.मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेना मराठी माणूस या तत्त्वासाठी लढत असताना ते या आर्थिक समस्येचा विचार करणार आहेत काय, हा प्रश्न आहे. शिवाय याबाबतीत मराठी खासदार जागरूक राहून आणि त्यांच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे बंध बाजूस सारून (ज्याप्रमाणे इतर भाषिक खासदार करतात) व या मुद्यावर एकत्र येऊन या महाराष्ट्र बँकेला संभाव्य संकटापासून वाचविणार आहेत काय?

टॅग्स :PoliticsराजकारणNew Delhiनवी दिल्ली