शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

सतर्कता गरजेची!

By admin | Updated: February 15, 2017 00:26 IST

देशांतर्गत दूरच्या प्रवासासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी सेवा म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. रेल्वेला अलीकडे मात्र कुणाची तरी नजर लागली

देशांतर्गत दूरच्या प्रवासासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी सेवा म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. रेल्वेला अलीकडे मात्र कुणाची तरी नजर लागली आणि अपघातांची मालिकाच सुरू झाली. यातील काही अपघात तांत्रिक कारणांमुळे घडले, तर काही अपघातांमागे घातपाताची शक्यता वर्तविण्यात येते. वर्षभरापूर्वी कानपूर येथे झालेला भीषण रेल्वे अपघात हा घातपाताचा प्रकार होता, यावर शिक्कामोर्तबही झाले आहे. या दुर्घटनेतील प्रमुख संशयित समशूल होडा हा आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा कथित एजंट आहे. कानपूर रेल्वे अपघातामागे समशूलचा हात असल्याचे एका गुन्हेगाराची चौकशी करताना पुढे आल्यापासून तो तपास यंत्रणेच्या ‘रडार’वर होता. गत सोमवारी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर समशूलच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्या चौकशीतून सत्य काय ते समोर येईलच! गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातही रेल्वगाड्यांना घातपात करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून झाल्याचे समोर आले आहे. दिवा रेल्वे स्थानकानजीक रेल्वेमार्गावर मोठी लोखंडी सळई ठेवल्याचे लक्षात येताच, रेल्वे चालकाने सावधानतेने संभाव्य अपघात टाळला. अकोला जिल्ह्यातही रेल्वे मार्गावर मोठा दगड ठेवून अकोला-वाशिम इंटरसिटी एक्स्प्रेसला घातपात करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या घटनांची शाई वाळते न वाळते, तोच शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेरवाडी ते ओढा दरम्यान रेल्वे रुळांवर १५ किलो वजनाचा सीमेंटचा दगड ठेवून हावडा-कुर्ला एक्स्प्र्रेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानाने ती घटनाही टळली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी दगड ठेवण्यात आला होता, तेथून जवळच वीस फूट उंचीचा पूल होता. काही विपरीत घडले असते तर... या कल्पनेनेच अंगावर शहारे उभे राहतात. मुंबई, ठाणे, अकोला आणि नाशिक येथील या घटनांमुळे पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. या घटना अत्यंत गंभीर असून, त्यामागील प्रवृत्तींचा शोध घेणे हे तपास यंत्रणांसमोर आव्हानच आहे. या घटनांमागे समाजकंटकांचा हात आहे, की केवळ काहीतरी करायचे म्हणून टवाळखोरांनी केलेली कृत्ये आहेत, हे तपासण्याची जबाबदारी तपास यंत्रणांची आहेच; पण सोबतच रेल्वेमार्गांलगत वास्तव्य असलेल्या नागरिकांनी, रेल्वेमार्गांलगत शेती असलेल्या शेतकऱ्यांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती संशयास्पद स्थितीत रेल्वे मार्गालगत आढळल्यास, पोलिसांशी संपर्क साधून नागरिकांनीही आपले कर्तव्य पार पाडायला हवे, तरच अशा प्रवृत्तींना पायबंद घालणे शक्य होईल.