शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

नवाजुद्दीन पाकड्या?

By admin | Updated: October 12, 2016 07:18 IST

देशाच्या एकूण लोकसंख्येत ज्या समुदायाचे प्रमाण सुमारे पंधरा टक्के आहे, त्या मुस्लीम समाजाची प्रगती झाली नाही तर देश कसा प्रगती करु शकेल असा प्रश्न विचारुन

देशाच्या एकूण लोकसंख्येत ज्या समुदायाचे प्रमाण सुमारे पंधरा टक्के आहे, त्या मुस्लीम समाजाची प्रगती झाली नाही तर देश कसा प्रगती करु शकेल असा प्रश्न विचारुन मुस्लीमांना नेहमी सोबतच ठेवण्याची व त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहाण्याची आमची भूमिका असल्याचे संघ परिवार सांगत असतो. तूर्तास ते खरे आहे असे मान्य करायचे झाल्यास ज्या हिन्दुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेने संघप्रणित भाजपाशी युती केली आहे ती आजची शिवसेना इतक्या पराकोटीच्या मुस्लीमद्वेषाने का पेटलेली आहे याचे उत्तर कोणी द्यायचे? येथे आवर्जून आजची शिवसेना म्हणण्याचे कारण म्हणजे सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका देशी मुसलमानांचा नव्हे तर पाकधार्जिण्या आणि पाकड्या मुस्लीमांचा द्वेष करण्याची होती. तसे करणेही योग्य की अयोग्य हा प्रश्न पुन्हा अलाहिदा. बाळासाहेबांच्या या भूमिकेला तलाक देऊन उत्तर प्रदेशातील शिवसैनिकांनी नवाजुद्दीन सिद्दीकी या अत्यंत गुणी कलावंताला रामलीलेत काम करण्यास मज्जाव केला. त्या राज्यातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुधाना हे त्यांचे मूळ गाव. त्या गावातील रामलीलेत काम करण्याची त्याची बालपणापासूनची इच्छा. यंदा तो सुट्टी घेऊन आपल्या गावी गेला आणि त्याने रामलीलेच्या संयोजकांकडे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पुन्हा त्याला पात्रदेखील सादर करायचे होते, ते मारीच मामाचे. म्हणजे रामायणातील अनेक खलनायकांपैकी एकाचे. पण तेथील शिवसैनिकांनी केवळ तो मुस्लीम आहे म्हणून आयोजकांवर दबाव आणला आणि नवाजुद्दीनला मारीच सादर करण्यापासून रोखले. वास्तविक पाहाता अलीकडच्या काळात हिन्दी सिनेमांमध्ये विविध रंगाच्या आणि विविध ढंगांच्या भूमिका सादर करुन एक अस्सल चरित्र अभिनेता म्हणून त्याने आपल्यातील अभिनयगुण सिद्ध केले आहेत. त्यामुळे त्याच्यासारखा कलाकार आपणहून रामलीलेत सहभागी होणे हा एकप्रकारे त्या आयोजकांचाच गौरव होता. पण रामलीलेत काम करणारा हिन्दु असला पाहिजे आणि केवळ तितकेच नव्हे तर तो धार्मिकदेखील असला पाहिजे हा तेथील सैनिकांचा आग्रह. धार्मिकतेचा हाच आग्रह अगदी कसोसीने महाराष्ट्रात सेना पुरस्कृत गणोशोत्सवांना लावायचे ठरले तर बव्हंशी मंडप रिकामेच करावे लागतील. मुळात कलेच्या क्षेत्रात भारतातील जनसामान्यांनी भारतीय वंशाच्या कोणत्याही जाती-धर्माच्या कलाकाराच्या बाबतीत कधीही भेदभाव केलेला नाही आणि कलाकारांनीही कलेच्या सादरीकरणात ते ओझे बाळगलेले नाही. त्यामुळेच ‘बैराग’ सिनेमातील युसुफखान (दिलीपकुमार) याच्या तोंडच्या ‘ओ शंकर मोरे, कब होंगे दर्शन तेरे’ या भजनात आजदेखील ‘हिन्दु’ प्रेक्षक तल्लीन होत असतात. पण जो आम्हाला शरण आला तोच तितका पवित्रा आणि स्वीाकारणीय अशी भूमिका घेतल्यानंतर इतक्या उशिराने ‘त्या’ सैनिकांशी आमचा काहीही संबंध नाही असा खुलासा आदित्य ठाकरे यांनी करणे याचा एकच अर्थ तुमचे नाव पुढे करुन कोणीही हुल्लडबाजी करतो आणि तुम्हाला त्याचा पत्ताही नसतो!