शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

राष्ट्रगीताचा नसता वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 03:04 IST

आपल्या राष्ट्रगीताचा भारताच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान असायला हवा, त्याचा मान प्रत्येकाने ठेवायला हवा, याबाबत कुणाचे दुमत असणार नाही. त्याचा अपमान वा अवहेलना कुणीही करता कामा नये, याविषयीही मतभेद होणार नाहीत.

आपल्या राष्ट्रगीताचा भारताच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान असायला हवा, त्याचा मान प्रत्येकाने ठेवायला हवा, याबाबत कुणाचे दुमत असणार नाही. त्याचा अपमान वा अवहेलना कुणीही करता कामा नये, याविषयीही मतभेद होणार नाहीत. पण याचा अर्थ रोज सर्वच ठिकाणी राष्ट्रगीत म्हटलेच पाहिजे, असाही काढणे चुकीचे आहे. चित्रपटगृहांत राष्ट्रगीताची सक्ती नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून हेच स्पष्ट झाले आहे. याच सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहांत प्रत्येक शोच्या आधी राष्ट्रगीत वाजवण्यात यावे आणि त्यावेळी प्रत्येकाने उभे राहावे, असा आदेश दिला होता. पण राष्ट्रगीताबाबत सक्ती वा कोणताही निर्णय करणे, हे आपले काम नाही, याची उपरती न्यायालयाला झाली, हे चांगले झाले. राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत याविषयी संहिता आहे. त्यात साºया गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. असे असताना कुणी तरी उठून न्यायालयात गेला, त्याने चित्रपटगृहांत ते वाजवावे, अशी मागणी केली. खरे तर तेव्हाच न्यायालयाने हे आमचे काम नाही, असे सांगायला हवे होते. पण तसे घडले नाही आणि सुमारे दीड वर्षांनी न्यायालयाला आपल्या आदेशात बदल करावा लागला, ही भूषणावह बाब नाही. आधीच्या निर्णयानंतर तथाकथित राष्ट्रभक्तांची संख्या वाढली. काहींना राष्ट्रभक्तीचा अचानक उमाळा आला आणि चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजत असताना उभे न राहणाºयांना ते मारहाण करीत सुटले. ज्यांना मारले, त्यापैकी अनेक दिव्यांग होते आणि त्यांना उभे राहणे शक्य नव्हते. असे असताना देशभक्तीचा मक्ता केवळ आपल्याकडेच आहे, असे समजणाºयांनी इतरांवर राष्ट्रद्रोहाचे शिक्केच मारायला सुरुवात केली होती. मारहाण करणे, हे गुन्हेगारी कृत्य आहे, याचाही राष्ट्रभक्तांना विसर पडला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आदेशात केलेला बदल स्वागतार्हच म्हणायला हवा. राष्ट्रगीत कोणत्या ठिकाणी म्हणावे वा वाजवावे आणि कोठे त्याची गरज नाही, यासंबंधीचे आदेश न्यायालयाने वा शासनयंत्रणेने देण्याचे कारण नाही. त्याचा निर्णय देशातील जनतेवर सोडायला हवा. पण गेल्या काही वर्षांत राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत म्हटले म्हणजेच देशप्रेम वा देशभक्ती सिद्ध होते, असे काहींना वाटू लागले आहे. राष्ट्रगीताचा मान ठेवावा, याचा अर्थ ते सदासर्वकाळ म्हणायला हवे, असे नव्हे. मनोरंजनाच्या ठिकाणी राष्ट्रगीत बंधनकारक करायचे तर नाट्यगृह, तमाशे, लावणी, कव्वाल्यांचा कार्यक्रम, नौटंकी, गायनाचे कार्यक्रम, कथाकथन आदी ठिकाणीही त्याची सक्ती करायला हवी होती. चित्रपटगृहांपुरताच वेगळा न्याय लावण्याची गरज नव्हती. राष्ट्रगीत वाजवावे वा नाही, हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाने आता चित्रपटगृहांवर सोडला आहे. पण ते लावल्यास उभे राहण्याचे बंधन प्रेक्षकांवर असेल आणि दिव्यांगांना न उभे राहण्याची सवलत आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यात काहीच गैर नाही. केंद्र सरकारनेही राष्ट्रगीताची चित्रपटगृहांत सक्ती नको, ही जी भूमिका (बदलून) घेतली, ती योग्यच म्हणावी लागेल. राष्ट्रगीताबाबत केंद्र सरकारने नियमावली करण्याचे ठरविले आहे. नव्याने नियम करताना या साºया बाबींचा विचार व्हावा. राष्ट्रगीत म्हणणे हाच देशप्रेम वा राष्ट्रभक्तीचा एकमेव निकष असू शकत नाही. राष्ट्रगीताचा मान ठेवणारी मंडळी प्रत्यक्षात गुन्हे करीत असतील, देशविरोधी कारवाया करीत असतील, सरकारचे कर चुकवत असतील, समाजात जातीय व धार्मिक विद्वेष फैलावत असतील आणि फसवणूक करत असतील, तर ते राष्ट्रभक्त असू शकत नाहीत, हे सर्वांनीही लक्षात घ्यायला हवे. भावनेच्या भरात राष्ट्रगीत व राष्ट्रभक्ती यांचे नाते जोडणे ही स्वत:ची व इतरांचीही फसवणूक ठरेल.

टॅग्स :National Anthemराष्ट्रगीत