शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रगीताचा नसता वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 03:04 IST

आपल्या राष्ट्रगीताचा भारताच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान असायला हवा, त्याचा मान प्रत्येकाने ठेवायला हवा, याबाबत कुणाचे दुमत असणार नाही. त्याचा अपमान वा अवहेलना कुणीही करता कामा नये, याविषयीही मतभेद होणार नाहीत.

आपल्या राष्ट्रगीताचा भारताच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान असायला हवा, त्याचा मान प्रत्येकाने ठेवायला हवा, याबाबत कुणाचे दुमत असणार नाही. त्याचा अपमान वा अवहेलना कुणीही करता कामा नये, याविषयीही मतभेद होणार नाहीत. पण याचा अर्थ रोज सर्वच ठिकाणी राष्ट्रगीत म्हटलेच पाहिजे, असाही काढणे चुकीचे आहे. चित्रपटगृहांत राष्ट्रगीताची सक्ती नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून हेच स्पष्ट झाले आहे. याच सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहांत प्रत्येक शोच्या आधी राष्ट्रगीत वाजवण्यात यावे आणि त्यावेळी प्रत्येकाने उभे राहावे, असा आदेश दिला होता. पण राष्ट्रगीताबाबत सक्ती वा कोणताही निर्णय करणे, हे आपले काम नाही, याची उपरती न्यायालयाला झाली, हे चांगले झाले. राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत याविषयी संहिता आहे. त्यात साºया गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. असे असताना कुणी तरी उठून न्यायालयात गेला, त्याने चित्रपटगृहांत ते वाजवावे, अशी मागणी केली. खरे तर तेव्हाच न्यायालयाने हे आमचे काम नाही, असे सांगायला हवे होते. पण तसे घडले नाही आणि सुमारे दीड वर्षांनी न्यायालयाला आपल्या आदेशात बदल करावा लागला, ही भूषणावह बाब नाही. आधीच्या निर्णयानंतर तथाकथित राष्ट्रभक्तांची संख्या वाढली. काहींना राष्ट्रभक्तीचा अचानक उमाळा आला आणि चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजत असताना उभे न राहणाºयांना ते मारहाण करीत सुटले. ज्यांना मारले, त्यापैकी अनेक दिव्यांग होते आणि त्यांना उभे राहणे शक्य नव्हते. असे असताना देशभक्तीचा मक्ता केवळ आपल्याकडेच आहे, असे समजणाºयांनी इतरांवर राष्ट्रद्रोहाचे शिक्केच मारायला सुरुवात केली होती. मारहाण करणे, हे गुन्हेगारी कृत्य आहे, याचाही राष्ट्रभक्तांना विसर पडला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आदेशात केलेला बदल स्वागतार्हच म्हणायला हवा. राष्ट्रगीत कोणत्या ठिकाणी म्हणावे वा वाजवावे आणि कोठे त्याची गरज नाही, यासंबंधीचे आदेश न्यायालयाने वा शासनयंत्रणेने देण्याचे कारण नाही. त्याचा निर्णय देशातील जनतेवर सोडायला हवा. पण गेल्या काही वर्षांत राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत म्हटले म्हणजेच देशप्रेम वा देशभक्ती सिद्ध होते, असे काहींना वाटू लागले आहे. राष्ट्रगीताचा मान ठेवावा, याचा अर्थ ते सदासर्वकाळ म्हणायला हवे, असे नव्हे. मनोरंजनाच्या ठिकाणी राष्ट्रगीत बंधनकारक करायचे तर नाट्यगृह, तमाशे, लावणी, कव्वाल्यांचा कार्यक्रम, नौटंकी, गायनाचे कार्यक्रम, कथाकथन आदी ठिकाणीही त्याची सक्ती करायला हवी होती. चित्रपटगृहांपुरताच वेगळा न्याय लावण्याची गरज नव्हती. राष्ट्रगीत वाजवावे वा नाही, हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाने आता चित्रपटगृहांवर सोडला आहे. पण ते लावल्यास उभे राहण्याचे बंधन प्रेक्षकांवर असेल आणि दिव्यांगांना न उभे राहण्याची सवलत आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यात काहीच गैर नाही. केंद्र सरकारनेही राष्ट्रगीताची चित्रपटगृहांत सक्ती नको, ही जी भूमिका (बदलून) घेतली, ती योग्यच म्हणावी लागेल. राष्ट्रगीताबाबत केंद्र सरकारने नियमावली करण्याचे ठरविले आहे. नव्याने नियम करताना या साºया बाबींचा विचार व्हावा. राष्ट्रगीत म्हणणे हाच देशप्रेम वा राष्ट्रभक्तीचा एकमेव निकष असू शकत नाही. राष्ट्रगीताचा मान ठेवणारी मंडळी प्रत्यक्षात गुन्हे करीत असतील, देशविरोधी कारवाया करीत असतील, सरकारचे कर चुकवत असतील, समाजात जातीय व धार्मिक विद्वेष फैलावत असतील आणि फसवणूक करत असतील, तर ते राष्ट्रभक्त असू शकत नाहीत, हे सर्वांनीही लक्षात घ्यायला हवे. भावनेच्या भरात राष्ट्रगीत व राष्ट्रभक्ती यांचे नाते जोडणे ही स्वत:ची व इतरांचीही फसवणूक ठरेल.

टॅग्स :National Anthemराष्ट्रगीत