शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

संकुचित मानसिकता

By admin | Updated: June 30, 2017 00:07 IST

जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या भारताने विकासाची अनेक क्षेत्रे पादक्रांत केली असली तरी येथील सामाजिक आणि आर्थिक विषमतेची दरी

जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या भारताने विकासाची अनेक क्षेत्रे पादक्रांत केली असली तरी येथील सामाजिक आणि आर्थिक विषमतेची दरी मात्र तीळमात्रही कमी झालेली दिसत नाही. उलट ती अधिक वाढतच जात असल्याचे अलीकडच्या काळात घडलेल्या अनेक घटनांमधून प्रतिबिंबित होते. विविधतेने नटलेला देश अशी भारताची संपूर्ण जगात ओळख आहे. हे वैविध्य म्हणजे या देशाचा अनमोल दागिना आहे. परंतु त्या दागिन्यालाच डाग लावण्याचे दुष्कृत्य काही असंवेदनशील मंडळी करीत आहेत. लिंग, वर्ण, वेशभूषा यावरून होणारे भेदभाव अद्यापही थांबलेले नाहीत. गेल्या आठवड्यात घडलेल्या तीन घटनांवरुन याची प्रचिती यावी. पहिली घटना आहे राजधानी दिल्लीतील. येथील एका गोल्फ क्लबमध्ये मेघालयातील पारंपरिक वेशभूषा परिधान करून आलेल्या तायलीन लिंगडोह नामक महिलेस ‘तुमची वेशभूषा मोलकरणीसारखी दिसते’, असे अत्यंत अपमानास्पद कारण पुढे करून क्लबबाहेर काढण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. तायलन या काही स्वत:हून तेथे गेल्या नव्हत्या तर क्लबच्याच एका सदस्याने त्यांना आमंत्रित केले होते. हा केवळ तायलीन अथवा मेघालयाचा अपमान नसून साऱ्या देशाची मान यामुळे शरमेने खाली झुकली आहे. आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो पण त्यांच्या विचारांच्या नाही हेच यावरून अधोरेखित होते. दुर्दैव हे की ईशान्येकडील लोकांसाठी हा काही नवा अनुभव नाही. यापूर्वीही दिल्लीसह देशाच्या इतर काही भागात ईशान्येतील विद्यार्थ्यांवर हल्ले झाले आहेत. हरियाणातील अशाच एका घटनेने महिला सबलीकरणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. राज्य शासनातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या मासिकाच्या मुखपृष्ठावर घुंघट घेतलेल्या एका महिलेचे छायाचित्र प्रकाशित झाले असून ही राज्याची ओळख असल्याचे मोठ्या अभिमानाने नमूद करण्यात आले आहे. भाजपाशासित राज्यातील मंत्र्यांनीही या घुंघट प्रथेचे समर्थन करुन आपल्या संकुचित मानसिकतेचा परिचय दिला आहे. देशाने शिक्षण आणि प्रगतीची दारे उघडून विकासाची कास धरली असताना असल्या प्रतिगामी विचार प्रवाहांनी त्याला खीळ बसणार हे निश्चित आहे. हरियाणात तर शासकीय यंत्रणेने असंवेदनशीलतेची परिसीमाच गाठली. दौसा जिल्ह्यात केंद्र सरकारच्या योजनेतून स्वस्त धान्य घेणाऱ्या कुटुंबांच्या घरांच्या भिंतींवर चक्क ‘मी गरीब आहे. मी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत धान्य घेतो’ असे रंगविण्यात आले आहे. देशाच्या विविध भागात घडलेल्या या घटना प्रत्येक व्यक्तीस आत्मचिंतनास भाग पाडणाऱ्या आहेत.