शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

संकुचित मानसिकता

By admin | Updated: June 30, 2017 00:07 IST

जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या भारताने विकासाची अनेक क्षेत्रे पादक्रांत केली असली तरी येथील सामाजिक आणि आर्थिक विषमतेची दरी

जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या भारताने विकासाची अनेक क्षेत्रे पादक्रांत केली असली तरी येथील सामाजिक आणि आर्थिक विषमतेची दरी मात्र तीळमात्रही कमी झालेली दिसत नाही. उलट ती अधिक वाढतच जात असल्याचे अलीकडच्या काळात घडलेल्या अनेक घटनांमधून प्रतिबिंबित होते. विविधतेने नटलेला देश अशी भारताची संपूर्ण जगात ओळख आहे. हे वैविध्य म्हणजे या देशाचा अनमोल दागिना आहे. परंतु त्या दागिन्यालाच डाग लावण्याचे दुष्कृत्य काही असंवेदनशील मंडळी करीत आहेत. लिंग, वर्ण, वेशभूषा यावरून होणारे भेदभाव अद्यापही थांबलेले नाहीत. गेल्या आठवड्यात घडलेल्या तीन घटनांवरुन याची प्रचिती यावी. पहिली घटना आहे राजधानी दिल्लीतील. येथील एका गोल्फ क्लबमध्ये मेघालयातील पारंपरिक वेशभूषा परिधान करून आलेल्या तायलीन लिंगडोह नामक महिलेस ‘तुमची वेशभूषा मोलकरणीसारखी दिसते’, असे अत्यंत अपमानास्पद कारण पुढे करून क्लबबाहेर काढण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. तायलन या काही स्वत:हून तेथे गेल्या नव्हत्या तर क्लबच्याच एका सदस्याने त्यांना आमंत्रित केले होते. हा केवळ तायलीन अथवा मेघालयाचा अपमान नसून साऱ्या देशाची मान यामुळे शरमेने खाली झुकली आहे. आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो पण त्यांच्या विचारांच्या नाही हेच यावरून अधोरेखित होते. दुर्दैव हे की ईशान्येकडील लोकांसाठी हा काही नवा अनुभव नाही. यापूर्वीही दिल्लीसह देशाच्या इतर काही भागात ईशान्येतील विद्यार्थ्यांवर हल्ले झाले आहेत. हरियाणातील अशाच एका घटनेने महिला सबलीकरणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. राज्य शासनातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या मासिकाच्या मुखपृष्ठावर घुंघट घेतलेल्या एका महिलेचे छायाचित्र प्रकाशित झाले असून ही राज्याची ओळख असल्याचे मोठ्या अभिमानाने नमूद करण्यात आले आहे. भाजपाशासित राज्यातील मंत्र्यांनीही या घुंघट प्रथेचे समर्थन करुन आपल्या संकुचित मानसिकतेचा परिचय दिला आहे. देशाने शिक्षण आणि प्रगतीची दारे उघडून विकासाची कास धरली असताना असल्या प्रतिगामी विचार प्रवाहांनी त्याला खीळ बसणार हे निश्चित आहे. हरियाणात तर शासकीय यंत्रणेने असंवेदनशीलतेची परिसीमाच गाठली. दौसा जिल्ह्यात केंद्र सरकारच्या योजनेतून स्वस्त धान्य घेणाऱ्या कुटुंबांच्या घरांच्या भिंतींवर चक्क ‘मी गरीब आहे. मी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत धान्य घेतो’ असे रंगविण्यात आले आहे. देशाच्या विविध भागात घडलेल्या या घटना प्रत्येक व्यक्तीस आत्मचिंतनास भाग पाडणाऱ्या आहेत.