शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

नारायणराव, स्वत:ला जरा जपाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 03:19 IST

पक्षांतराचे फळ नेहमीच पदाच्या रूपाने मिळते असे नाही. खूपदा पक्षांतरितांना कुजवलेही जाते. एखाद्याला दाराबाहेर कुजवत ठेवून त्याला त्याची किंमत कमी करायला लावण्याची हातोटीही भाजपजवळ आहे.

- सुरेश द्वादशीवारपक्षांतराचे फळ नेहमीच पदाच्या रूपाने मिळते असे नाही. खूपदा पक्षांतरितांना कुजवलेही जाते. एखाद्याला दाराबाहेर कुजवत ठेवून त्याला त्याची किंमत कमी करायला लावण्याची हातोटीही भाजपजवळ आहे. अशी कुजणारी माणसेही आता सा-यांच्या चांगल्या परिचयाची आहेत.कर्नाटकचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल एवढी सारी पदे काँग्रेसच्या कृपेने अनुभवलेले एस.एम. कृष्णा हे त्यांची पदे जाताच कासावीस होऊन भाजपमध्ये दाखल झाले. ते भाजपवासी झाल्याची खात्री पटल्यानंतर मात्र त्या पक्षाने आर्थिक अन्वेषण विभागामार्फत त्यांच्या चौकशा करून त्यांच्या जावयाची साडेसहाशे कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. आता कृष्णा अडकले आहेत. भाजपमध्येही त्यांचा जीव आता कासावीस होत असणार आणि काँग्रेसमध्ये परतण्याचे तोंड त्यांना उरले नसणार. काँग्रेस पक्ष सत्तेवरून पायउतार झाला तेव्हा या कृष्णांसारखा विचार करणारे त्याचे अनेक जुने व नवेही पुढारी पक्षांतर करताना दिसले. त्यात मंत्री, प्रदेशाध्यक्ष, खासदार व आमदार तर होतेच शिवाय थेट म्युनिसिपालिटी, सुधार प्रन्यास व सहकारी बँकांचे पुढारीही होते. त्यातल्या काही शहाण्यांनी आपली पोरे भाजपात पाठवली व काँग्रेस पुन्हा कधी सत्तेवर येईल या आशेने त्या पक्षाचा उंबरठा ओलांडला नाही.एक माजी मंत्री तर एकेकाळी म्हणत, ‘माझ्या कातड्याचे जोडे पवारांच्या पायात घातले तरी त्यांचे माझ्यावरील उपकार कमी व्हायचे नाहीत.’ पुढे त्यांनी विलासरावांच्या पायाचे माप घेऊन त्यासाठी आपल्या कातड्याचे जोडे तयार केले. आता गडकºयांच्या मापाचे तसेच जोडे तयार करायला त्यांनी दिल्याची बातमी आहे. ही माणसे एवढी कातडी जमवितात कशी आणि अंगावर वाहतात कशी याचेही मग आपल्याला आश्चर्य वाटावे. शिवाय हे पुढारी सहकुटुंब पक्षांतर करतात. सध्या नारायण राणे त्या वाटेवर आहेत. त्यांनी कधीकाळी ठाकºयांची व सोनिया गांधींची पूजा बांधली. तिचा प्रसाद म्हणून त्यांना मुख्यमंत्रिपद हवे होते. ठाकºयांनी ते दिले, सोनिया गांधींनी ते दिले नाही. आता हा बाणेदार माणूस भाजपच्या वाटेवर आहे. त्यांना एस.एम. कृष्णांची आठवणच तेवढी करून द्यायची.भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. कोणतेही पद तो संघातून भाजपत आलेल्यांखेरीज इतरांना देत नाही. १९६० च्या दशकात त्याच्या जनसंघावताराने दिल्ली महापालिका जिंकली तेव्हा तिचे मेयरपद त्याने दिल्लीचे संघचालक लाला हंसराज गुप्ता यांना दिले. आताचे त्याचे मुख्यमंत्री पाहिले की त्यातही या इतिहासाची पुनरावृत्ती दिसेल. फडणवीस, रमण सिंग, चौहान, आदित्यनाथ, खट्टर ही माणसे संघातून भाजपत आलेली आहेत. त्यामुळे तो पक्ष फडणवीसांची जागा राण्यांना देईल असे समजण्यात हशील नाही आणि दुय्यम दर्जाच्या पदात राण्यांनाही रस नाही.प्रत्येक पक्षाची एक प्रकृती असते. काँग्रेस हा बिनाकुंपणाचा व बिनाभिंतीचा खुला पक्ष आहे. तो साºयांसाठी सारे काही आहे. तो डावा आहे, उजवा आहे आणि डावा-उजवाही (लेफ्ट-राईट) आहे. भाजप हा आतून बंद असलेला व बंद दरवाजाची कुलूपे संघाकडे ठेवलेला पक्ष आहे. त्यात राणे गेले तरी त्यांच्या मागे लागू शकणारा इडीचा ससेमिरा संपणार नाही. अर्थात ते तसे अभिवचन घेतल्यावाचून भाजपत जायचेही नाहीत. पण घटस्थापनेचा मुहूर्त ते तरी कितीकाळ लांबवणार? त्यांच्या मागे लोंबकळणारी माणसे तरी त्याची किती वाट पाहणार? एखाद्याला दाराबाहेर कुजवत ठेवून त्याला त्याची किंमत कमी करायला लावण्याची हातोटीही भाजपजवळ आहे. अशी कुजणारी माणसेही आता साºयांच्या चांगल्या परिचयाची आहेत. राण्यांचे तसे होऊ नये. ‘तो बैलासारखे काम ओढणारा माणूस आहे’ असे सर्टिफिकेट त्यांना बाळासाहेब ठाकºयांनी दिले आहे. दहशत म्हणावी एवढा त्यांचा दरारा कोकणापासून मुंबईपर्यंत राहिला आहे. मात्र त्यानंतर त्यांच्या मागे खडशांसारखी झेंगटे लागली तर मग ते आणखीच अवघड. राण्यांनी फडणवीसांसोबत गुजरातला जाऊन मोदी आणि शाह यांची भेट घेतली. मात्र परतल्यानंतर त्या भेटीची परिणती दोघांनीही सांगितली नाही. तथापि, राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यात कुणाचे नशीब केव्हा फळफळेल हे सांगता येत नाही. शिवाय त्या खेळातली फसवणूकही बदनामी टाळायला बोलून दाखविता येत नाही. म्हणून म्हणायचे, नारायणराव, जरा जपा.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे