शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणे यांचे ‘टायमींग’

By admin | Updated: November 20, 2015 03:15 IST

राणेंची धाडसी कृती नेहमीच वादग्रस्त तरीही कौतुकास्पद ठरते... पण त्यांचे ‘टायमींग’ चुकते! आता शेतकऱ्यांच्या संघटनांना त्यांनी दिलेली हाक मात्र अचूक टायमिंगची ठरू शकते!

- राजा मानेराणेंची धाडसी कृती नेहमीच वादग्रस्त तरीही कौतुकास्पद ठरते... पण त्यांचे ‘टायमींग’ चुकते! आता शेतकऱ्यांच्या संघटनांना त्यांनी दिलेली हाक मात्र अचूक टायमिंगची ठरू शकते! त्यांच्या हाकेला रघुनाथदादा पाटील यांच्यापासून ते ‘धरणातील पाणीफेम’ भैय्या देशमुख, संजय पाटील-घाटणेकर आणि जिल्ह्या-जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघटनांचे नेते सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतात.नारायण राणे यांचा आक्रमक बाणा, धडाडी आणि त्यांची तशीच कार्यपद्धती महाराष्ट्राला नवी नाही. पण त्यांच्या कृतींचे ‘टायमींग’ मात्र नेहमीच चुकते! त्याची पुरेपूर राजकीय किंमत वेळोवेळी चुकती करण्याची पाळी त्यांच्यावर आली.उदाहरणादाखल अगदी सोनिया गांधी, विलासराव देशमुखांच्या विरोधातील बंडापासून ते थेट अलीकडच्या मुंबईतील वांद्रे पूर्व पोट निवडणुकीतील त्यांच्या पराभवाच्या घटना घ्या. त्यांच्या प्रत्येक कृतीतील धाडस-धडाडी कौतुकास्पद होती, पण ‘टायमींग’ मात्र सपशेल चुकीचेच! आपण म्हणाल राणे, त्यांचा राजकीय प्रवास आणि टायमींग हा विषय अचानक कशासाठी? परवा ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर यांनी पंढरपुरात घेतलेल्या दूध व ऊस परिषदेत ते सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या एका संघटनेच्या व्यासपीठावरील त्यांचा सक्रीय सहभाग हा खरा औत्सुक्याचा विषय होता. फडणवीस सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, प्रशासकीय पातळीवरील उदासीनता, राज्यात २२०० शेतकऱ्यांनी आणि सोलापूर जिल्ह्यात ३२ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्त्या आणि पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणी उजनी धरणात सोडण्यासंदर्भात पेट घेऊ पाहत असलेला वाद या परवलीच्या विषयांवर अपेक्षेप्रमाणे खास राणे शैलीत ते परिषदेत बोलले. त्यांच्या भाषणात खरा कळीचा मुद्दा आला तो राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध संघटनांबद्दलचा! खा. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सदाभाऊ खोत यांना लाल दिव्याच्या गाडीत बसविण्याच्या तयारीत आहे. शरद जोशी यांची संघटना सरकारच्या विरोधात किती आक्रमक बनणार हे कोडे काळच सोडवू शकतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा खरा वाली कोण, या प्रश्नाचे उत्तर सर्वच आघाड्यांवर मेटाकुटीला आलेला शेतकरी शोधतो आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांनी नेमकी नाडी पकडण्याची चतुराई आपल्या भाषणात दाखविली. राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात आवाज उठवावा, अशी हाक देतानाच आपली पूर्ण शक्ती या संघटनांच्या पाठीशी उभी करण्याचा शब्दही त्यांनी दिला. राणेंच्या हाकेला अनेक पदर आहेत. त्याचे राजकीय अर्थ काहीही असले तरी त्यांचे यावेळचे ‘टायमींग’ मात्र अचूक आहे, असेच म्हणावे लागेल. खरीप हंगामाने शेतकऱ्यांना दगा दिला. आता चार-पाच दिवसात अवकाळी पाऊस न पडल्यास रब्बी हंगामही शेतकऱ्यांना रडविण्याच्या बेतात दिसतो.सर्वसामान्य शेतकऱ्याला खात्रीने चार पैसे देणारे पीक म्हणून ऊसाचे महत्त्व आहे. पाण्याअभावी राज्यातील तब्बल ४० टक्के ऊस जळून गेला आहे. यावर्षी राज्यात ५६ साखर कारखान्यांचे धुराडे पेटले. त्यापैकी २४ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत. आज ऊसाच्या दराचे नावही घ्यायला कोणी तयार नाही. अशा वेळेला शेतकऱ्यांचा कैवार घेऊन सरकारशी दोन हात कोण करणार, हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा ठरतो. सरकारमधील खा. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या आक्रमकतेला किती धार असणार, अशा प्रश्नांची उत्तरे शोधत असताना शेतकऱ्यांच्या संघटनांना राणे यांनी अचूक वेळी दिलेली हाक महत्त्वाची वाटते. या हाकेला रघुनाथदादा पाटील यांच्यापासून ते ‘धरणातील पाणीफेम’ भैय्या देशमुख, संजय पाटील-घाटणेकर आणि जिल्ह्या-जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघटनांचे नेते सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतात. तसे घडल्यास एकत्रित येणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघटना व राणेंचे बळ अडचणीतल्या बळीराजासाठी तारणहार ठरेल काय, हे काळच ठरवेल.