शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाणार नाही जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 06:28 IST

नाणार प्रकल्पाच्या जमीन संपादनाला स्थगिती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण, स्थानिकांनी प्रखर विरोध करून ती वर्षभरापूर्वी बंद पाडली आहे. जमीन ‘औद्योगिक’ घोषित करण्याचा अध्यादेश सरकार रद्द कधी करणार, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे.

नाणार प्रकल्प स्थगित केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि त्यामुळे विधानसभेच्या गॅलरीत घोषणाबाजी करणाऱ्या नाणारवासीयांचे समाधान झाले असेल, असा जर कुणाचा समज झाला असेल, तर तो चक्क गैरसमज आहे. नाणारच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाकरिता ग्रामस्थांची जमीन संपादित करण्याकरिता ती ‘औद्योगिक’ म्हणून घोषित करण्याचा जो अध्यादेश १८ मे २०१७ रोजी शिवसेनेकडील उद्योग खात्याने काढला आहे, तो रद्द करण्याची रहिवाशांची मागणी होती. मात्र, त्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत प्रकल्प स्थगित केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

लोकांना कात्रजचा घाट दाखवणे, ही बारामतीकरांची खासियत, पण नागपूरकरांनीही ते कसब गेल्या चार वर्षांत बेमालूमपणे अंगीकारल्याचे हे ठळक उदाहरण आहे. नाणारमधील प्रकल्पाकरिता जमिनीची मोजणी करण्याकरिता संबंधित खात्यांचे अधिकारी जेव्हा गतवर्षी तेथे गेले, तेव्हा सर्वच्या सर्व १४ गावांतील लोकांनी पाच दिवस रस्त्यावर उतरून त्यांना कडाडून विरोध केला. जमिनीची मोजणीच झाली नसल्याने भूसंपादन होण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. त्यामुळे प्रकल्पाचे जमीन संपादन रोखण्याचे सर्व श्रेय हे नाणारवासीयांचे असताना जमीन संपादनास स्थगिती देतो, हे मुख्यमंत्र्यांचे विधान त्या आंदोलकांच्या चिकाटीवर बोळा फिरवणारे आहे. जमिनीची मोजणी होत नसल्याने हवालदिल झालेल्या सरकारने गतवर्षी नोव्हेंबर महिन्यातच नाणार प्रकल्पाबाबत तोंडी स्थगिती आदेश दिले होते. कारण, त्या वेळी शिवसेना हा सत्तेतील मित्रपक्ष या विषयावर आक्रमक झाला होता. मात्र, एकीकडे स्थगिती आदेश देताना दुसरीकडे जमिनीच्या दलालांनी गोळा केलेल्या संमतीपत्राच्या आधारे आणखी काही लोकांना प्रकल्पाकरिता राजी करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. वृत्तपत्रे व मीडियातून जाहिरातबाजी व बॅनरबाजी करून प्रकल्पाकरिता अनुकूल वातावरण असल्याचे भासवले जात आहे. रा.स्व. संघाच्या गोतावळ्यातील मंडळींच्या सक्षम फाउंडेशनसारख्या संघटना व सुकथनकर समितीच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रचार सुरू ठेवला आहे. सरकार नाणारला स्थगिती दिल्याची भाषा करत असताना तिकडे पानिपत येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पाहुणचाराकरिता डिसेंबरमध्ये स्थानिकांना घेऊन जाण्याचे आवताण दिले आहे. त्यामुळे सरकारचा हेतू प्रकल्प रद्द करण्याचा अजिबात नसून छुप्या पद्धतीने प्रकल्प रेटण्याकरिता सरकार लोकांवरील दबाव वाढवत आहे.

सरकारची नियत साफ असेल, तर त्यांनी जमीन ‘औद्योगिक ’ घोषित करण्याचा अध्यादेश रद्द केला पाहिजे. ‘नाणार जाणार’ अशा राणाभीमदेवी थाटाच्या घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या. प्रत्यक्षात कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष संघटना व त्याचे अशोक वालम यांच्यासारखे नेते नाणारमधील असंतोष टिकवून ठेवत आहेत, त्यांनी शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना चार हात दूर ठेवले आहे. कारण, एन्रॉनपासून जैतापूरपर्यंत अनेक प्रकल्पांत शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी बजावलेली भूमिका ही स्थानिकांना संशयास्पद वाटत आली आहे. शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे नाणारची जमीन ‘औद्योगिक’ घोषित करणारा अध्यादेश काढतात, प्रारंभी त्याचे समर्थन करतात व कालांतराने त्याच पक्षाचे पक्षप्रमुख विरोधी भूमिका घेतात. मात्र, अध्यादेश रद्द होत नाही, ही दुटप्पी भूमिका लक्षात येत नाही, इतके कोकणातील लोक दूधखुळे नाहीत. त्यामुळे नाणार असो की जैतापूर, या परिसरातील शिवसेनेच्या वर्चस्वाला हादरा बसण्याची भीती निर्माण झाली आहे.

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत युती अपरिहार्य ठरली आहे. साहजिकच, आता मित्रपक्षाचा हात घट्ट पकडून चालण्याकरिता भाजपाने नाणारच्या जमीन संपादनाला स्थगिती देण्याची फसवी घोषणा केली आहे. कोकणी माणसाचा रोजगार मुंबईसारख्या शहरात आहे. मात्र, त्याचे प्रेम त्याचे गाव, तेथील मोकळे आकाश यावर आहे. प्रदूषणकारी उद्योगांनी ते आकाश झाकोळू नये, याकरिता लढण्याची ताकद त्यांच्या मनगटात आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्प