शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

घोड्यावर मांड मजबूत हवी

By admin | Updated: May 25, 2015 00:01 IST

यशवंतराव चव्हाण म्हणायचे, तुम्ही जेव्हा घोड्यावर बसता तेव्हा तुमची मांड किती पक्की आहे हे घोड्याला तत्काळ समजते. तुम्ही नवशिके असाल तरीही तुमच्या स्पर्शाने तो घोडा

अतुल कुलकर्णी -

यशवंतराव चव्हाण म्हणायचे, तुम्ही जेव्हा घोड्यावर बसता तेव्हा तुमची मांड किती पक्की आहे हे घोड्याला तत्काळ समजते. तुम्ही नवशिके असाल तरीही तुमच्या स्पर्शाने तो घोडा तुम्हाला उधळून लावू शकतो आणि तुम्ही मुरब्बी घोडेस्वार असाल तर तोच घोडा लगाम हातात न धरताही गपगुमान चालू लागतो. प्रशासनाचेही तसेच आहे. प्रशासनावर तुमची मांड कशी आहे, हे अधिकाऱ्यांना सांगावे लागत नाही. त्यांना ते लगेच कळते. हे आठवण्याचे कारण म्हणजे सात तहसीलदारांचे निलंबन.सभागृह सार्वभौम की नोकरशाही, हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. मंत्रीच श्रेष्ठ आहेत आणि त्यांचे निर्णय अंतिम असतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीरपणे सांगावे लागते, यासारखे दुर्दैव नाही. सहा महिनेही सरकारला पूर्ण झाले नाहीत तर ज्येष्ठ मंत्री-अधिकाऱ्यांमध्ये वाद होऊ लागले आहेत. हे असे का घडते आहे, याचा गंभीरपणे विचार करण्यासाठीचा वेळ कोणाकडेही नाही.तहसीलदारांच्या निलंबनाचा विषय निष्काळजीपणे हाताळला गेला आणि त्यातून मूळ विषय बाजूलाच राहिला आणि सरकारमध्ये समन्वय नाही, सरकार माहिती न घेता निर्णय घेते, अशी प्रतिमा बाहेर गेली. विधानपरिषदेत रेशन धान्याच्या गैरव्यवहाराचा प्रश्न चर्चेला येतो, त्यात १७ अधिकारी निलंबित करण्याची घोषणा होते. ५० वर्षांत हे असले प्रकार असंख्य वेळा घडले आहेत. नैसर्गिक न्यायाच्या विरोधात जाऊन मंत्री सभागृहात निलंबनाच्या घोषणा करू शकत नाहीत असे अधिकारी खासगीत बोलून दाखवत असले तरीही सभागृह सर्वाेच्च आहे आणि तेथे होणाऱ्या घोषणा, दिली जाणारी आश्वासने मान्य केलीच पाहिजेत. या प्रकरणातही ज्यांच्या निलंबनाची घोषणा झाली त्यांचे तत्काळ आदेश काढून चौकशी समिती नेमता आली असती आणि चौकशीत अधिकारी दोषी निघाले नसते तर सरकारच्या नवखेपणावरून दोष देता आला असता. पण तसे घडले नाही.घोषणा झाल्यानंतर महसूल सचिवांनी निलंबनाचे आदेश तत्काळ का काढले नाहीत? विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणा अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केली होती. तशा चौकशीचे आदेश पुरवठा विभागाच्या सचिवांनी लगेच का काढले नाहीत? याची उत्तरे कोण देणार? जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश अवर सचिवांनी कशाच्या आधारे दिले? त्यांना तशा सूचना कोणी दिल्या होत्या? नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाच दिवसांत सगळ्या प्रकाराची चौकशी झटपट कशी पूर्ण केली? त्याचा अहवाल महसूल सचिवांना पाठवून दिल्यानंतर तो दोन आठवडे तसाच का ठेवला गेला? त्याची माहिती महसूलमंत्र्यांना का दिली गेली नाही? गंभीर बाब म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल ६ मे रोजी महसूल सचिवांकडे आला. त्यांनी तो अहवाल एवढे निलंबनाचे आदेश काढेपर्यंत बाहेर का काढला नाही? विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी २० तारखेला बैठक बोलावली. त्या बैठकीतही असा अहवाल आल्याची गोष्ट दडवून का ठेवली गेली? त्या बैठकीनंतर लगेचच सायंकाळी सात तहसीलदारांचे निलंबन कसे केले गेले? - या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत. जर ती दिली नाहीत आणि एखाद्या आमदाराने राज्याचे मुख्य सचिव, महसूल सचिव आणि पुरवठा सचिवांवर हक्कभंग आणला तर त्यातून होणाऱ्या संघर्षाची जबाबदारी कोण घेणार हे देखील कळायला हवे. सरकार नवीन, मंत्री नवीन, अशा घोषणा होतच असतात, त्यात काय विशेष, अशा निष्काळजीपणाच्या अक्ष्यम्य मानसिकतेतून हे सगळे प्रकरण घडले आहे. दुर्दैवाने प्रशासनात गांभीर्याने पाहण्याची वृत्ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. काम झाले तर तुमचे नशीब, नाही झाले तर तुमचे दुर्दैव या वृत्तीने अधिकारी वागत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याची समूळ चौकशी करून सत्य समोर आणलेच पाहिजे. पुढची साडेचार वर्षे नीट चालावीत म्हणून आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी हे करावेच लागेल.