शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

मुरुगन पुन्हा ‘जिवंत’

By admin | Updated: July 8, 2016 04:37 IST

लोकशाहीतील सरकार भले लोकांचेच असले तरी लोकाना विश्वास आणि भरवसा मात्र सरकारपेक्षा न्यायालयांचाच का वाटतो याचा आणखी एक दाखला आता उपलब्ध झाला आहे.

लोकशाहीतील सरकार भले लोकांचेच असले तरी लोकाना विश्वास आणि भरवसा मात्र सरकारपेक्षा न्यायालयांचाच का वाटतो याचा आणखी एक दाखला आता उपलब्ध झाला आहे. तमीळ लेखक पेरुमल मुरुगन यांनी २०११मध्ये त्याच भाषेत एक कादंबरी लिहिली. पण तेव्हां काहीच झाले नाही. तीन वर्षांनी याच कादंबरीचे इंग्रजी भाषांतर ‘वन पार्ट आॅफ वुमन’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाले व हलकल्लोळ माजला. कादंबरीत तामिळनाडूच्या ग्रामीण भागातील एका निपुत्रिक जोडप्याचे कथानक चित्रीत करण्यात आले आहे. या जोडप्याला अपत्य व्हावे म्हणून त्याच्या घरचे लोकच त्यास अर्धनारीनटेश्वराच्या मंदिराच्या रथयात्रोत्सवात सहभागी होण्यास भाग पाडतात. त्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणे असे असते की, उत्सवाच्या रात्री कोणतेही (अनोळखी) स्त्री-पुरुष शय्यासोबत करु शकतात! मुरुगन यांनी कादंबरीच्या माध्यमातून केलेल्या या वर्णनापायी आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत तामिळनाडूतील तिरुचेंगोड आणि कोंगूनाडू पट्ट्यातील लोकानी प्रचंड गोंधळ घालायला सुरुवात केली. कादंबरीवर बंदी लागू करण्याची मागणी केली आणि मुरुगन यांना जीव नकोसा करुन टाकला. तितकेच नव्हे तर मुरुगन यांच्यावर फौजदारी स्वरुपाचा खटलादेखील दाखल केला गेला. साहजिकच त्यामुळे व्यथित झालेल्या व मूलत: एक शिक्षक असलेल्या मुरुगन यांनी ‘मी मरण पावलो आहे’ असे स्वत:च जाहीर करुन टाकले. त्यांचे असे जाहीर करणे देशभर खळबळ माजवून गेले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी तळमळणाऱ्या देशभरातील बव्हंशी लेखक-साहित्यिक-कार्यकर्ते यांनी मुरुगन यांना जीव नकोसा करणाऱ्यांना धारेवर धरले. सरकारने अर्थातच झुंडीसमोर हात टेकले वा शरणागती पत्करली. पण आता चेन्नई न्यायालयाने मुरुगन यांना पूर्णपणे दोषमुक्त केले आहे. एखाद्या लेखकाची कृती समाजातील विशिष्ट वर्ग वा गटाला अश्लील, बीभत्स, अनैतिक किंवा धर्मभावना दुखावणारी वाटली म्हणजे संपूर्ण समाजाच्या नजरेत ती तशीच असू शकत नाही, असा निवाडा उच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. मुरुगन यांच्या कादंबरीवर घेण्यात आलेला आक्षेप तर पूर्ण निराधार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाचा हा निवाडा ऐकल्यानंतर मुरुगन यांनी आपण पुन्हा जिवंत होत असल्याचे आता जाहीर केले आहे. अर्थात या एका निकालाने देशभर पसरलेले आणि कोणत्याही कलाकृतीच्या विरोधात आक्षेप घेऊन बंदीची मागणी करणारे व त्याच्याच जोडीला हातात कायदा घेणारे सुधारतील असे नाही. पण त्यांना चपराक बसायला हरकत नाही.