शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मुरुगन पुन्हा ‘जिवंत’

By admin | Updated: July 8, 2016 04:37 IST

लोकशाहीतील सरकार भले लोकांचेच असले तरी लोकाना विश्वास आणि भरवसा मात्र सरकारपेक्षा न्यायालयांचाच का वाटतो याचा आणखी एक दाखला आता उपलब्ध झाला आहे.

लोकशाहीतील सरकार भले लोकांचेच असले तरी लोकाना विश्वास आणि भरवसा मात्र सरकारपेक्षा न्यायालयांचाच का वाटतो याचा आणखी एक दाखला आता उपलब्ध झाला आहे. तमीळ लेखक पेरुमल मुरुगन यांनी २०११मध्ये त्याच भाषेत एक कादंबरी लिहिली. पण तेव्हां काहीच झाले नाही. तीन वर्षांनी याच कादंबरीचे इंग्रजी भाषांतर ‘वन पार्ट आॅफ वुमन’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाले व हलकल्लोळ माजला. कादंबरीत तामिळनाडूच्या ग्रामीण भागातील एका निपुत्रिक जोडप्याचे कथानक चित्रीत करण्यात आले आहे. या जोडप्याला अपत्य व्हावे म्हणून त्याच्या घरचे लोकच त्यास अर्धनारीनटेश्वराच्या मंदिराच्या रथयात्रोत्सवात सहभागी होण्यास भाग पाडतात. त्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणे असे असते की, उत्सवाच्या रात्री कोणतेही (अनोळखी) स्त्री-पुरुष शय्यासोबत करु शकतात! मुरुगन यांनी कादंबरीच्या माध्यमातून केलेल्या या वर्णनापायी आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत तामिळनाडूतील तिरुचेंगोड आणि कोंगूनाडू पट्ट्यातील लोकानी प्रचंड गोंधळ घालायला सुरुवात केली. कादंबरीवर बंदी लागू करण्याची मागणी केली आणि मुरुगन यांना जीव नकोसा करुन टाकला. तितकेच नव्हे तर मुरुगन यांच्यावर फौजदारी स्वरुपाचा खटलादेखील दाखल केला गेला. साहजिकच त्यामुळे व्यथित झालेल्या व मूलत: एक शिक्षक असलेल्या मुरुगन यांनी ‘मी मरण पावलो आहे’ असे स्वत:च जाहीर करुन टाकले. त्यांचे असे जाहीर करणे देशभर खळबळ माजवून गेले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी तळमळणाऱ्या देशभरातील बव्हंशी लेखक-साहित्यिक-कार्यकर्ते यांनी मुरुगन यांना जीव नकोसा करणाऱ्यांना धारेवर धरले. सरकारने अर्थातच झुंडीसमोर हात टेकले वा शरणागती पत्करली. पण आता चेन्नई न्यायालयाने मुरुगन यांना पूर्णपणे दोषमुक्त केले आहे. एखाद्या लेखकाची कृती समाजातील विशिष्ट वर्ग वा गटाला अश्लील, बीभत्स, अनैतिक किंवा धर्मभावना दुखावणारी वाटली म्हणजे संपूर्ण समाजाच्या नजरेत ती तशीच असू शकत नाही, असा निवाडा उच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. मुरुगन यांच्या कादंबरीवर घेण्यात आलेला आक्षेप तर पूर्ण निराधार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाचा हा निवाडा ऐकल्यानंतर मुरुगन यांनी आपण पुन्हा जिवंत होत असल्याचे आता जाहीर केले आहे. अर्थात या एका निकालाने देशभर पसरलेले आणि कोणत्याही कलाकृतीच्या विरोधात आक्षेप घेऊन बंदीची मागणी करणारे व त्याच्याच जोडीला हातात कायदा घेणारे सुधारतील असे नाही. पण त्यांना चपराक बसायला हरकत नाही.