शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

‘ही तर चक्क अघोषित अंतर्गत आणीबाणीच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2016 03:58 IST

पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर झालेल्या हल्ल्याचे अतिरंजित वृत्तांकन केल्याचा ठपका ठेऊन एनडीटीव्ही इंडियावर एक दिवस बंदी घालण्याचा

डॉ. जितेंद्र आव्हाड, (राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते)पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर झालेल्या हल्ल्याचे अतिरंजित वृत्तांकन केल्याचा ठपका ठेऊन एनडीटीव्ही इंडियावर एक दिवस बंदी घालण्याचा ‘सूचना व प्रसारण मंत्रालयाचा’ निर्णय धक्कादायक आणि त्याहून अधिक निषेधार्ह असून हे निश्चितच एका कमजोर व सूडबुद्धीने वागणाऱ्या शासन प्रणालीचे द्योतक आहे. बंदीचा हा आदेशही अशा वेळी आला जेव्हा देशाचे प्रधानसेवक इंडियन एक्स्प्रेस समूहाच्या रामनाथ गोयंका पुरस्कार सोहळ्यात आणीबाणीची कठोर समीक्षा करीत होते. सशक्त लोकशाहीतील सक्षम सरकार कधीच टीकेला व विरोधाला घाबरत नसते. परंतु सध्याचे संघप्रणीत सरकार नेमके याच विरोधाला घाबरून टीका करणाऱ्या प्रत्येकाला बंदीच्या जाळ्यात टाकू पाहात आहे. जणू मोदी सरकार तुरळक प्रमाणात बंदीचं अस्त्र वापरून आणीबाणीच्या लाँग टर्म प्लॅनिंगची लिटमस टेस्टच घेत आहे. अशीच लिटमस टेस्ट नाझी जर्मनीत हिटलरने सुद्धा घेतली होती. वंशवादाच्या वेडानं पछाडलेल्या मानसिकतने तिचा स्वीकार करीत आणीबाणीसाठी रान मोकळे करून दिले होते. भारतातही ही गोष्ट एकदा घडून गेलेली आहे. २५ जून १९७५ रोजी भारतात प्रथमच अंतर्गत आणीबाणी जाहीर होऊन इंदिरा सरकारने जनतेच्या स्वातंत्र्यांवर गदा आणली. आणीबाणी संदर्भातील कायदा बदलून इंदिराजींना अमर्याद काळाकरता पंतप्रधान म्हणून राहाता येईल याची निश्चिती केली गेली. पण प्रसंगाचं भान राखून रोखठोक भूमिका घेणाऱ्या पत्रकारांचा तो काळ होता. इंडियन एक्स्प्रेसच्या रामनाथ गोयंकांनी आणीबाणीचा निषेध करीत अग्रलेखाची जागा कोरी ठेवली. अवाक्षर न काढता इंदिराजींच्या निर्णयाचा ताकदीने विरोध करीत देशवासीयांना योग्य तो संदेश दिला. १९७७ साली आणीबाणी उठवली गेली, निवडणूक जाहीर झाली आणि काँग्रेस व इंदिराजी यांना पराभवाला सामारे जावे लागले, तो इतिहास फार जुना झालेला नाही. जनतेच्या मौलिक स्वातंत्र्यावर गदा आणलेल्या कुणालाही जनतेने कधीच माफ केलेले नाही, हे कदाचित मोदी सरकारला जाणवत नसावे. एनडीटीव्हीवर झालेल्या कारवाईनंतर माध्यम जगतासह सामान्य जगतही ढवळून निघाले आहे. यात ऐरणीवर आलेला मुद्दा म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यमांच्या कार्यक्षेत्रात वाढत चाललेला सरकारी हस्तक्षेप. सध्या संघप्रणीत भाजपा सरकार सत्तेत आहे म्हणून हा विरोध जोमाने होतो आहे, असे मानण्याचे कारण नाही. असेही नाही की याआधी अशा प्रकारची कारवाई कधी झालीच नाही. गेल्या सोळा वर्षात पंचवीसहून अधिक वेळा माध्यमांवर बंदी घालण्याची कारवाई करण्यात आली आहे. यात एंटरटेनमेंट चॅनेल्स सर्वाधिक असली तरी अपवाद ‘जनमत’ या वृत्तवाहिनीचा. त्याचे कारण तिने मध्यरात्रीच्या सुमारास प्रक्षेपित केलेले अश्लील चित्रण. बातमीसाठी बंदी पहिल्यांदाच. म्हणूनच एनडीटीव्हीवरील बंदीचा आम्ही पूर्ण ताकदीने विरोध करतो आहोत. हा विरोध फक्त रविश कुमार व एनडीटीव्हीची भलामण म्हणून नाही. तर कुणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या होणाऱ्या गळचेपीच्या विरोधातील आवाज म्हणून हा विरोध आहे. ब्राह्मणवाद, संघवाद, भगवेकरण यांच्या विरोधात ठाम भूमिका घेणाऱ्या पत्रकारांवर होणाऱ्या बेबंदशाही विरोधात ही भूमिका आहे. पूर्णत: राजकीय हेतूने प्रेरित असलेली ही कृती आहे. जुन्या प्रकरणाचा बदला घेण्याचा हा प्रयत्न आहे. यातील मुद्दा साधा, सरळ व सोपा आहे. चुकीच्या सरकारी धोरणाविरोधात भूमिका घेणाऱ्या माध्यमास टार्गेट करून सरकार जनतेत असलेल्या असंतोषाची चाचपणी करीत आहे. तिचा अंदाज सोशल मीडियावर होत असलेल्या संदेशांच्या देवाणघेवाणीवरुन घेतला जात आहे. सरकारची बाजू न घेणारे देशद्रोही असल्याच्या अविर्भावात वावरणाऱ्या उन्मादी टोळ्या धुडगुस घालीत आहेत. पण म्हणून शांत बसून राहणे हा निव्वळ पळपुटेपणा ठरेल. लोकशाहीत कोणीही अमर नसतं. सदार्वकाळ सत्तेत राहता येत नसतं. सव्वा दोन वर्षांनी पुन्हा निवडणूक आहे. जनतेचं मत पुन्हा तुमच्याच पारड्यात पडेल या फाजील आत्मविश्वासात मोदी सरकारने राहू नये इतकंच... गोवंश हत्याबंदी निवडक प्रदेशात लागू करणे व तिचा राजकीय लाभ घेणे, लव्ह जिहाद, घरवापसी, विरोधकांचा आवाज दाबून टाकणे, जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर खोटे खटले दाखल करणे, मद्रास आयआयटीच्या विद्यार्थ्यांवर निर्बंध लादणे, खुलेआम देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणे तसेच गुजरातेतल्या उनामध्ये दलितांचा छळ करणे अशी अनेक प्रकरणे आणीबाणीच्या दिशेने उघड निर्देश करीतच होती. त्यातच आता हे एनडीटीव्हीचे प्रकरण. देशाला जी स्वप्ने दाखवत नरेंद्र मोदी सत्तेत आले, त्यातील एकही स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. आज देशाची आर्थिक स्थिती २०१४ पेक्षा अनेक टक्क्यांनी खाली घसरली आहे. तरुणांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत. नोकऱ्यांची टक्केवारीही कमी झाली आहे. औद्योगिक क्षेत्रात मंदी आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. जातीय धर्मसंघर्ष वाढत आहेत. या साऱ्याकडील सोकांचे लक्ष विचलीत व्हावे म्हणूनच अघोषित आणईबाणीचे वातावरण तयार करण्याचे काम होते आहे की काय अशी शंका येते.