शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

अवयवदानाची प्रेरणा गतिमान, एखाद्या व्यक्तीचे अवयव काढून दुस-या व्यक्तीवर यशस्वी रोपण करणे आता शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:59 IST

अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे हे ज्याला अवयवाची कमतरता आहे किंवा एखादे व्यंग आहे त्यालाच कळू जाणे. माणसाला एखादा अवयव कमी अथवा निकामी असेल तर अपंग म्हटले जाते.

अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे हे ज्याला अवयवाची कमतरता आहे किंवा एखादे व्यंग आहे त्यालाच कळू जाणे. माणसाला एखादा अवयव कमी अथवा निकामी असेल तर अपंग म्हटले जाते. अपंग शब्द झेलत त्याला रोजचे जगणेही नकोसे वाटते. यावर मात करण्यात विज्ञानाला यश आले असून एखाद्या व्यक्तीचे अवयव काढून दुस-या व्यक्तीवर यशस्वी रोपण करणे आता शक्य झाले आहे. सोलापूरसारख्या ग्रामीण भागात गेल्या सहा महिन्यात दोन देहाचे अवयदान करण्यात आल्याने सोलापूरने मोठमोठ्या आणि प्रगत शहरांना मागे टाकले आहे. अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे यासाठी सोलापुरात प्रभावीपणे जनजागृती सुरू आहे. सोलापूरच्या अश्विनी सहकारी ग्रामीण रुग्णालयात सहा महिन्यांपूर्वी डॉ. संदीप होळकर व समन्वयक प्रिया पवार यांनी एका ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांना अवयदानाचे महत्त्व सांगून अवयवदान करण्यास प्रवृत्त केले होते आणि त्यातून पार्थ शिवकुमार कोळी या उस्मानाबादच्या युवकाचे सहा अवयव काढण्यात आले. त्याच्या डोळ्यामुळे दोघा अंधांना दृष्टी मिळाली. पुण्यातील एकाचे हृदय धडधडले. मूत्रपिंड निकामी झालेल्या दोघांचे जीव वाचले. लिव्हरचा उपयोग एकाचा जीव वाचण्यासाठी उपयोगी पडला. वास्तविक १९७७ साली मुंबईत पहिली अवयवप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यामानाने सोलापूर ५० वर्षे मागे असताना सहा महिन्यात दोघा जणांचे अवयदान घडवून आणून काही जणांचे प्राण वाचवण्यात इथल्या डॉक्टर आणि समाजसेवकांना यश आले आहे. वास्तविक अपघात किंवा मेंदूवर उपचार करणाºया विविध इस्पितळात अधून मधून ब्रेन डेड झालेले रुग्ण आढळतात. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर हतबल नातेवाईक अंत्यविधी उरकून मोकळे होतात. ज्याचे ब्रेन डेड झाले आहे त्या देहाचा उपयोग केवळ आता नष्ट करण्यापलीकडे नसतोच. तो देहसुध्दा १० ते १२ जणांचे प्राण वाचवू शकतो. त्यांच्या रूपाने आपल्या जीवलगांना आपण पाहू शकतो हे पटवून दिल्यामुळे नातेवाईक अवयवदानासाठी पुढे येऊ लागले आहेत, हे सोलापूरच्या घटनेतून दिसून येते. आयुष्यभर विद्यादान करणाºया सोलापुरातल्या ७० वर्षीय शिक्षिकेने मृत्यूनंतरही विद्यार्थ्यांसाठी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने आठ दिवसापूर्वी त्यांचे देहदान करण्यात आले. या देहाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी व्हावा, हीच प्रेरणा यातून मिळाली असून ही चळवळ देशभर गतिमान झाली तर अनेकांचे जीव वाचतील. सरकारनेही याबाबत धोरण निश्चित केले पाहिजे.