शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाची प्रेरणा गतिमान, एखाद्या व्यक्तीचे अवयव काढून दुस-या व्यक्तीवर यशस्वी रोपण करणे आता शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:59 IST

अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे हे ज्याला अवयवाची कमतरता आहे किंवा एखादे व्यंग आहे त्यालाच कळू जाणे. माणसाला एखादा अवयव कमी अथवा निकामी असेल तर अपंग म्हटले जाते.

अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे हे ज्याला अवयवाची कमतरता आहे किंवा एखादे व्यंग आहे त्यालाच कळू जाणे. माणसाला एखादा अवयव कमी अथवा निकामी असेल तर अपंग म्हटले जाते. अपंग शब्द झेलत त्याला रोजचे जगणेही नकोसे वाटते. यावर मात करण्यात विज्ञानाला यश आले असून एखाद्या व्यक्तीचे अवयव काढून दुस-या व्यक्तीवर यशस्वी रोपण करणे आता शक्य झाले आहे. सोलापूरसारख्या ग्रामीण भागात गेल्या सहा महिन्यात दोन देहाचे अवयदान करण्यात आल्याने सोलापूरने मोठमोठ्या आणि प्रगत शहरांना मागे टाकले आहे. अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे यासाठी सोलापुरात प्रभावीपणे जनजागृती सुरू आहे. सोलापूरच्या अश्विनी सहकारी ग्रामीण रुग्णालयात सहा महिन्यांपूर्वी डॉ. संदीप होळकर व समन्वयक प्रिया पवार यांनी एका ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांना अवयदानाचे महत्त्व सांगून अवयवदान करण्यास प्रवृत्त केले होते आणि त्यातून पार्थ शिवकुमार कोळी या उस्मानाबादच्या युवकाचे सहा अवयव काढण्यात आले. त्याच्या डोळ्यामुळे दोघा अंधांना दृष्टी मिळाली. पुण्यातील एकाचे हृदय धडधडले. मूत्रपिंड निकामी झालेल्या दोघांचे जीव वाचले. लिव्हरचा उपयोग एकाचा जीव वाचण्यासाठी उपयोगी पडला. वास्तविक १९७७ साली मुंबईत पहिली अवयवप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यामानाने सोलापूर ५० वर्षे मागे असताना सहा महिन्यात दोघा जणांचे अवयदान घडवून आणून काही जणांचे प्राण वाचवण्यात इथल्या डॉक्टर आणि समाजसेवकांना यश आले आहे. वास्तविक अपघात किंवा मेंदूवर उपचार करणाºया विविध इस्पितळात अधून मधून ब्रेन डेड झालेले रुग्ण आढळतात. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर हतबल नातेवाईक अंत्यविधी उरकून मोकळे होतात. ज्याचे ब्रेन डेड झाले आहे त्या देहाचा उपयोग केवळ आता नष्ट करण्यापलीकडे नसतोच. तो देहसुध्दा १० ते १२ जणांचे प्राण वाचवू शकतो. त्यांच्या रूपाने आपल्या जीवलगांना आपण पाहू शकतो हे पटवून दिल्यामुळे नातेवाईक अवयवदानासाठी पुढे येऊ लागले आहेत, हे सोलापूरच्या घटनेतून दिसून येते. आयुष्यभर विद्यादान करणाºया सोलापुरातल्या ७० वर्षीय शिक्षिकेने मृत्यूनंतरही विद्यार्थ्यांसाठी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने आठ दिवसापूर्वी त्यांचे देहदान करण्यात आले. या देहाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी व्हावा, हीच प्रेरणा यातून मिळाली असून ही चळवळ देशभर गतिमान झाली तर अनेकांचे जीव वाचतील. सरकारनेही याबाबत धोरण निश्चित केले पाहिजे.