शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
4
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
5
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
6
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
7
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
8
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
9
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
10
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
11
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
12
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
13
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
14
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
15
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
16
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
17
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
20
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

अवयवदानाची प्रेरणा गतिमान, एखाद्या व्यक्तीचे अवयव काढून दुस-या व्यक्तीवर यशस्वी रोपण करणे आता शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:59 IST

अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे हे ज्याला अवयवाची कमतरता आहे किंवा एखादे व्यंग आहे त्यालाच कळू जाणे. माणसाला एखादा अवयव कमी अथवा निकामी असेल तर अपंग म्हटले जाते.

अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे हे ज्याला अवयवाची कमतरता आहे किंवा एखादे व्यंग आहे त्यालाच कळू जाणे. माणसाला एखादा अवयव कमी अथवा निकामी असेल तर अपंग म्हटले जाते. अपंग शब्द झेलत त्याला रोजचे जगणेही नकोसे वाटते. यावर मात करण्यात विज्ञानाला यश आले असून एखाद्या व्यक्तीचे अवयव काढून दुस-या व्यक्तीवर यशस्वी रोपण करणे आता शक्य झाले आहे. सोलापूरसारख्या ग्रामीण भागात गेल्या सहा महिन्यात दोन देहाचे अवयदान करण्यात आल्याने सोलापूरने मोठमोठ्या आणि प्रगत शहरांना मागे टाकले आहे. अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे यासाठी सोलापुरात प्रभावीपणे जनजागृती सुरू आहे. सोलापूरच्या अश्विनी सहकारी ग्रामीण रुग्णालयात सहा महिन्यांपूर्वी डॉ. संदीप होळकर व समन्वयक प्रिया पवार यांनी एका ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांना अवयदानाचे महत्त्व सांगून अवयवदान करण्यास प्रवृत्त केले होते आणि त्यातून पार्थ शिवकुमार कोळी या उस्मानाबादच्या युवकाचे सहा अवयव काढण्यात आले. त्याच्या डोळ्यामुळे दोघा अंधांना दृष्टी मिळाली. पुण्यातील एकाचे हृदय धडधडले. मूत्रपिंड निकामी झालेल्या दोघांचे जीव वाचले. लिव्हरचा उपयोग एकाचा जीव वाचण्यासाठी उपयोगी पडला. वास्तविक १९७७ साली मुंबईत पहिली अवयवप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यामानाने सोलापूर ५० वर्षे मागे असताना सहा महिन्यात दोघा जणांचे अवयदान घडवून आणून काही जणांचे प्राण वाचवण्यात इथल्या डॉक्टर आणि समाजसेवकांना यश आले आहे. वास्तविक अपघात किंवा मेंदूवर उपचार करणाºया विविध इस्पितळात अधून मधून ब्रेन डेड झालेले रुग्ण आढळतात. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर हतबल नातेवाईक अंत्यविधी उरकून मोकळे होतात. ज्याचे ब्रेन डेड झाले आहे त्या देहाचा उपयोग केवळ आता नष्ट करण्यापलीकडे नसतोच. तो देहसुध्दा १० ते १२ जणांचे प्राण वाचवू शकतो. त्यांच्या रूपाने आपल्या जीवलगांना आपण पाहू शकतो हे पटवून दिल्यामुळे नातेवाईक अवयवदानासाठी पुढे येऊ लागले आहेत, हे सोलापूरच्या घटनेतून दिसून येते. आयुष्यभर विद्यादान करणाºया सोलापुरातल्या ७० वर्षीय शिक्षिकेने मृत्यूनंतरही विद्यार्थ्यांसाठी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने आठ दिवसापूर्वी त्यांचे देहदान करण्यात आले. या देहाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी व्हावा, हीच प्रेरणा यातून मिळाली असून ही चळवळ देशभर गतिमान झाली तर अनेकांचे जीव वाचतील. सरकारनेही याबाबत धोरण निश्चित केले पाहिजे.