शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाची प्रेरणा गतिमान, एखाद्या व्यक्तीचे अवयव काढून दुस-या व्यक्तीवर यशस्वी रोपण करणे आता शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:59 IST

अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे हे ज्याला अवयवाची कमतरता आहे किंवा एखादे व्यंग आहे त्यालाच कळू जाणे. माणसाला एखादा अवयव कमी अथवा निकामी असेल तर अपंग म्हटले जाते.

अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे हे ज्याला अवयवाची कमतरता आहे किंवा एखादे व्यंग आहे त्यालाच कळू जाणे. माणसाला एखादा अवयव कमी अथवा निकामी असेल तर अपंग म्हटले जाते. अपंग शब्द झेलत त्याला रोजचे जगणेही नकोसे वाटते. यावर मात करण्यात विज्ञानाला यश आले असून एखाद्या व्यक्तीचे अवयव काढून दुस-या व्यक्तीवर यशस्वी रोपण करणे आता शक्य झाले आहे. सोलापूरसारख्या ग्रामीण भागात गेल्या सहा महिन्यात दोन देहाचे अवयदान करण्यात आल्याने सोलापूरने मोठमोठ्या आणि प्रगत शहरांना मागे टाकले आहे. अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे यासाठी सोलापुरात प्रभावीपणे जनजागृती सुरू आहे. सोलापूरच्या अश्विनी सहकारी ग्रामीण रुग्णालयात सहा महिन्यांपूर्वी डॉ. संदीप होळकर व समन्वयक प्रिया पवार यांनी एका ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांना अवयदानाचे महत्त्व सांगून अवयवदान करण्यास प्रवृत्त केले होते आणि त्यातून पार्थ शिवकुमार कोळी या उस्मानाबादच्या युवकाचे सहा अवयव काढण्यात आले. त्याच्या डोळ्यामुळे दोघा अंधांना दृष्टी मिळाली. पुण्यातील एकाचे हृदय धडधडले. मूत्रपिंड निकामी झालेल्या दोघांचे जीव वाचले. लिव्हरचा उपयोग एकाचा जीव वाचण्यासाठी उपयोगी पडला. वास्तविक १९७७ साली मुंबईत पहिली अवयवप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यामानाने सोलापूर ५० वर्षे मागे असताना सहा महिन्यात दोघा जणांचे अवयदान घडवून आणून काही जणांचे प्राण वाचवण्यात इथल्या डॉक्टर आणि समाजसेवकांना यश आले आहे. वास्तविक अपघात किंवा मेंदूवर उपचार करणाºया विविध इस्पितळात अधून मधून ब्रेन डेड झालेले रुग्ण आढळतात. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर हतबल नातेवाईक अंत्यविधी उरकून मोकळे होतात. ज्याचे ब्रेन डेड झाले आहे त्या देहाचा उपयोग केवळ आता नष्ट करण्यापलीकडे नसतोच. तो देहसुध्दा १० ते १२ जणांचे प्राण वाचवू शकतो. त्यांच्या रूपाने आपल्या जीवलगांना आपण पाहू शकतो हे पटवून दिल्यामुळे नातेवाईक अवयवदानासाठी पुढे येऊ लागले आहेत, हे सोलापूरच्या घटनेतून दिसून येते. आयुष्यभर विद्यादान करणाºया सोलापुरातल्या ७० वर्षीय शिक्षिकेने मृत्यूनंतरही विद्यार्थ्यांसाठी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने आठ दिवसापूर्वी त्यांचे देहदान करण्यात आले. या देहाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी व्हावा, हीच प्रेरणा यातून मिळाली असून ही चळवळ देशभर गतिमान झाली तर अनेकांचे जीव वाचतील. सरकारनेही याबाबत धोरण निश्चित केले पाहिजे.