शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

मातृभूमी

By admin | Updated: July 2, 2016 05:43 IST

मातृभूमीविषयीचे विलक्षण, उत्कट प्रेम हा माणसाचा एक लक्षणीय विशेष आहे.

मातृभूमीविषयीचे विलक्षण, उत्कट प्रेम हा माणसाचा एक लक्षणीय विशेष आहे. आपला देश, तेथील संस्कृती, वेशभूषा, भाषा, परंपरा याची ओढ, याचा अभिमान रामायणापासून तर सावरकर साहित्यापर्यंत अक्षुण्णपणे व्यक्त होत आला आहे. अठ्ठावीस युरोपियन देशांच्या युनियनशी नाते तोडण्याचा जो निर्णय ब्रिटनने घेतला त्यामागे हे एक कारण असू शकते. मातृभूमीच्या प्रेमाची भावना तेथे प्रबळ झाली असावी. आज विज्ञान-तंत्र-यंत्र युगात जे सर्व विशेषांचे सपाटीकरण होते आहे त्याच्यापेक्षा ह्या घडामोडी वेगळ्या आहेत.भूमाता, मातृभूमी, ‘मदर अर्थ’ ही माणसाला प्राणाहून प्रिय असते. ‘भूमि: पुत्रोहं पृथिव्य:’ भूमी ही माझी माता आहे आणि मी पृथ्वीचा पुत्र, पृथ्वीचा अंश आहे असे ऋग्वेद सांगतो. या भूमातेशी आतड्याचे नाते असल्याने शेतीसाठी जमीन खोदणे, नांगरणे म्हणजे तिला जखमी करणे असे अनेक आदीम जाती मानतात.जॉन स्टाइनबेकच्या ‘दि ग्रेप्स आॅफ रॅथ’मध्ये ओक्लेहोमाचे रहिवासी आजोबा, वडील आणि नातू जगण्याच्या शोधात दुसरीकडे जायला निघतात. पण ‘हा प्रदेश कसाही असला तरी तो माझा प्रदेश आहे’ ही भावना त्यांच्या मनातून कधीही जात नाही. जी.ए. कुळकर्णींच्या ‘ठिपका’ कथेतील धनगर कुटुंबातला रामण्णाही असाच आहे. दुष्काळाने उद्ध्वस्त, उजाड झालेला तो प्रदेश सोडून सारे जातात. मात्र रामण्णा दुसरीकडे रुजायला जाण्याचे साफ नाकारतो. पर्ल बकच्या ‘गुड अर्थ’ मधील वँग लुंगची कथा अशीच मनाच्या घालमेलीची आहे. व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘काळी आई’ कथेतील अप्पा याला अपवाद नाहीत.हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राने वलयांकित, आसेतू हिमाचल आणि जगन्नाथपुरी ते द्वारका असणारी सुजला, सुफला असणारी आमची मातृभू श्यामल शेतजमिनीतून सोने निपजवते. गंगा-यमुना ते तापी-भीमा नद्यांच्या तीरावर या समृद्ध संस्कृतीचे जतन-वर्धन झाले. परकी आक्रमणांना, परकी साम्राज्याला परतवून लावण्यासाठी किती देशभक्त हसत फासावर चढले. ‘तुजसाठी मरण ते जनन’ या उदात्त विचाराने एका पिढीचे जीवन उजळून निघाले होते.मातृभूमीविषयीचा हा अभिमान कवी सुरेश भट यांनी फार वेगळ्या संदर्भात व्यक्त केला. हे मायभू! तुझे मी पांग फेडीन. मात्र माझी व्यक्तिगत व्यथा सांगून मी कधीही केविलवाणेपणा स्वीकारणार नाही. आज मातृभूमीसाठी स्वत:चे कर्तव्य चोखपणे पार पाडणाऱ्या व्यक्तींची देशाला गरज आहे. धनदौलतीच्या हव्यासाने परदेशात धाव घेणाऱ्यांपेक्षा देशात राहून स्वाभिमानाने श्रम करणाऱ्यांची गरज आहे. संवेदनशीलतेने मातृभूमीवर प्रेम करणाऱ्यांची राष्ट्राला आस आहे.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे