शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

आई आणि व्यसन

By admin | Updated: January 17, 2015 00:46 IST

आईने नऊ महिने सोसावं आणि मुलाने व्यसनानं नासवावं. गुटखा, दारू, तंबाखू, धूम्रपान करून आईकडून मिळालेल्या शरीर नावाच्या साक्षात्काराची नासाडी करावी हा मातृदेवतेचा अपमान आहे,

विजयराज बोधनकर - आईने नऊ महिने सोसावं आणि मुलाने व्यसनानं नासवावं. गुटखा, दारू, तंबाखू, धूम्रपान करून आईकडून मिळालेल्या शरीर नावाच्या साक्षात्काराची नासाडी करावी हा मातृदेवतेचा अपमान आहे, हे कळायला शुद्धीवर असणे गरजेचे आहे. फुकट मिळालेल्या हृदयाला जेव्हा झटका येतो, तो बरा करायला पाच-सहा लाखांचा झटका पुन्हा मिळतो. तेव्हा घर रडतं. यातून वाचावं म्हणून पूर्ण घर तणावाच्या निवडुंगावर लटकतं... तेव्हा कळते आरोग्याची किमया. शरीर हे गुणतेचे मंदिर आहे. पण व्यसनापायी त्या शरीराचे स्मशान बनविले जाते. गुणतेचा गुंता होतो आणि आत्मा अनंतात विलीन होण्याच्या मार्गावर असतो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यातून वाचला की मग तो योगा, अध्यात्म, प्राणायामाचा स्वीकार करतो. संकटातून माणसाला शहाणपण सुचतं. याची ही प्रत्यक्ष घटना. माझ्या एका जवळच्या नातेवाइकाला गुटख्याचं प्रचंड व्यसन होतं. दिवसाला कित्येक पुड्या तो तोंडात उलट्या करायचा. खूपदा समजविण्याचा प्रयत्न केला. तर त्याचं उत्तर एकच, ‘‘आगे की आगे, एक दिन तो जानाही है!’’ असे पाच-सहा वर्ष निघून गेले. एक दिवस अचानक त्याची छाती भरून आली. हृदयाच्या तीव्र धक्क्याने साहेब कोसळले. हॉस्पिटलमध्ये •भरती केलं. पाच-सहा लाख रुपये डॉक्टरांना कमविण्याची संधी या व्यसनाने प्राप्त करून दिली. कष्टाची पुंजी एका झटक्यात गेली. घर उघड्यावर पडलं. पण हळूहळू तब्येत सुधारत गेली. आता हा नातेवाईक ‘गुटखा सोडा, आयुष्य जोडा!’ असा प्रचार करतोय. आता तो नित्यनेमाने योगा, प्राणायम करतो.. वेळेत जेवतो, झोपतो... सकाळी चालायला जातो... हेच शहाणपण त्याला अगोदरच सुचलं असतं तर? अनेकांना वाटतं जन्म-मरण हे देवाच्या हाती असतं. त्याचं बोलावणं आलं की जावं लागतं. असा विचारच मूर्खपणाचा आहे. स्वत:च्या आरोग्याचं विधिलिखित स्वत:ला लिहिता येऊ शकतं. केव्हा? जेव्हा तो अशी प्रतिज्ञा करेल की, ‘‘हे शरीर आईने दिलेली देणगी असून, या देणगीरूपी शरीराला मी व्यसनाच्या विळख्यात जाऊ न देता काळजीने त्याचे संगोपन करेन व आरोग्यदायी जगण्याचा प्रयत्न करेन!’’ अशा प्रतिज्ञेमुळे आपण सारेच आनंदी होऊन जगू.ज्याला मनाचा गुंता, संकट येण्याअगोदरच सोडविता येतं, त्याला स्वत:चं आयुष्य सुंदरतेने विणता येतं. शरीर हेच खरं मंदिर आहे. योगा, प्राणायाम, चिंंतन, ध्यान आणि समाधान हीच मनाची खरी पूजा व आंघोळही आहे. या सर्व गोष्टींना धन लागत नसून केवळ मन लागतं. म्हणून तुकोबाराया म्हणतात,फजितखोर मना किती तुज सांगोनको लागो कुणा मागे मागे।