शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

वजाबाकीच अधिक

By admin | Updated: May 11, 2017 00:21 IST

शतप्रतिशत भाजपाचा नारा देत असताना जनतेने सोपविलेल्या जबाबदारीला शतप्रतिशत न्याय द्यायची भूमिका मात्र भाजपाचे

शतप्रतिशत भाजपाचा नारा देत असताना जनतेने सोपविलेल्या जबाबदारीला शतप्रतिशत न्याय द्यायची भूमिका मात्र भाजपाचे लोकप्रतिनिधी घेत नसल्याचे चित्र प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात दिसून येत आहे. पंचायत ते पार्लमेंट असे भरघोस दान या जिल्ह्याने भाजपाला दिले आहे. परंतु बेरजेच्या राजकारणापेक्षा वजाबाकीचे राजकारण करण्यात भाजपाची मंडळी व्यग्र असल्याने सामान्य जनता भरडली जात आहे. एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय पॅनलच्या ताब्यात जिल्हा बँक आहे. त्यांची कन्या बँकेची अध्यक्ष आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असताना जिल्हा बँकेकडून पुरेसे कर्जवाटप अद्याप झालेले नाही. किसान क्रेडिट कार्ड काही शेतकऱ्यांना देण्यात आले असले तरी बहुसंख्य एटीएमवर अजूनही खडखडाट कायम आहे. आम्ही ५०० कोटींचेच कर्ज वाटप करू शकतो, राज्य शासनाने मदत करावी, अशी भूमिका खडसे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आढावा बैठकीत मांडली. राज्य शासन आणि जिल्हा बँकेच्या संघर्षात शेतकऱ्याचा बळी जात आहे. जळगावचे आमदार सुरेश भोळे हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या महापालिकेला आणखी अडचणीत कसे आणता येईल, याच उद्योगात गुंग आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा फटका बसणाऱ्या मूठभर लिकर लॉबीसाठी भोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहा रस्ते महापालिकेकडे वर्ग केले. या विषयात गतिमान सरकारची अनुभूती जळगावकरांना आली. कारण आमदार भोळे यांनी पत्र दिल्यानंतर अवघ्या २० दिवसांत हे रस्ते महापालिकेकडे वर्ग झाले. हुडको आणि जिल्हा बँकेच्या कर्जाचा डोंगर असलेल्या महापालिकेला या सहा रस्त्यांच्या देखभालीसाठी राज्य शासन एक पैसाही देणार नाही, अशीदेखील अट घातली गेली, हा अक्षरश: कळस होता. जागरूक जळगावकरांनी संघटितपणे याला विरोध केल्यानंतर हा निर्णय रद्द करणे शासनाला भाग पडले. महापालिकेच्या मालकीच्या फुले व्यापारी संकुलाचा गाळेकरार चार वर्षांपासून संपुष्टात येऊनही महापालिकेला वाढीव भाडे तर सोडा; पण नियमित भाडेदेखील मिळालेले नाही. आमदार भोळे यांच्या पत्रामुळे नगरविकास विभागाने वर्षभरापूर्वी ठरावाला स्थगिती दिली. आता उच्च न्यायालयाने शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशीच स्थिती भुसावळात आहे. देशातील गलिच्छ शहर म्हणून बदलौकिक झालेल्या या शहरात आमदार आणि नगराध्यक्ष भाजपाचे आहेत; मात्र गलिच्छतेचा शिक्का शहरावर बसल्यानंतर त्याचे खापर ते पालिकेतील पूर्वसुरींवर फोडत आहे. अडथळे आणि बहाणे सोडून विकासकामांची बेरीज ही मंडळी कधी करतील, असा जनतेला प्रश्न पडला आहे.