शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

वजाबाकीच अधिक

By admin | Updated: May 11, 2017 00:21 IST

शतप्रतिशत भाजपाचा नारा देत असताना जनतेने सोपविलेल्या जबाबदारीला शतप्रतिशत न्याय द्यायची भूमिका मात्र भाजपाचे

शतप्रतिशत भाजपाचा नारा देत असताना जनतेने सोपविलेल्या जबाबदारीला शतप्रतिशत न्याय द्यायची भूमिका मात्र भाजपाचे लोकप्रतिनिधी घेत नसल्याचे चित्र प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात दिसून येत आहे. पंचायत ते पार्लमेंट असे भरघोस दान या जिल्ह्याने भाजपाला दिले आहे. परंतु बेरजेच्या राजकारणापेक्षा वजाबाकीचे राजकारण करण्यात भाजपाची मंडळी व्यग्र असल्याने सामान्य जनता भरडली जात आहे. एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय पॅनलच्या ताब्यात जिल्हा बँक आहे. त्यांची कन्या बँकेची अध्यक्ष आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असताना जिल्हा बँकेकडून पुरेसे कर्जवाटप अद्याप झालेले नाही. किसान क्रेडिट कार्ड काही शेतकऱ्यांना देण्यात आले असले तरी बहुसंख्य एटीएमवर अजूनही खडखडाट कायम आहे. आम्ही ५०० कोटींचेच कर्ज वाटप करू शकतो, राज्य शासनाने मदत करावी, अशी भूमिका खडसे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आढावा बैठकीत मांडली. राज्य शासन आणि जिल्हा बँकेच्या संघर्षात शेतकऱ्याचा बळी जात आहे. जळगावचे आमदार सुरेश भोळे हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या महापालिकेला आणखी अडचणीत कसे आणता येईल, याच उद्योगात गुंग आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा फटका बसणाऱ्या मूठभर लिकर लॉबीसाठी भोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहा रस्ते महापालिकेकडे वर्ग केले. या विषयात गतिमान सरकारची अनुभूती जळगावकरांना आली. कारण आमदार भोळे यांनी पत्र दिल्यानंतर अवघ्या २० दिवसांत हे रस्ते महापालिकेकडे वर्ग झाले. हुडको आणि जिल्हा बँकेच्या कर्जाचा डोंगर असलेल्या महापालिकेला या सहा रस्त्यांच्या देखभालीसाठी राज्य शासन एक पैसाही देणार नाही, अशीदेखील अट घातली गेली, हा अक्षरश: कळस होता. जागरूक जळगावकरांनी संघटितपणे याला विरोध केल्यानंतर हा निर्णय रद्द करणे शासनाला भाग पडले. महापालिकेच्या मालकीच्या फुले व्यापारी संकुलाचा गाळेकरार चार वर्षांपासून संपुष्टात येऊनही महापालिकेला वाढीव भाडे तर सोडा; पण नियमित भाडेदेखील मिळालेले नाही. आमदार भोळे यांच्या पत्रामुळे नगरविकास विभागाने वर्षभरापूर्वी ठरावाला स्थगिती दिली. आता उच्च न्यायालयाने शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशीच स्थिती भुसावळात आहे. देशातील गलिच्छ शहर म्हणून बदलौकिक झालेल्या या शहरात आमदार आणि नगराध्यक्ष भाजपाचे आहेत; मात्र गलिच्छतेचा शिक्का शहरावर बसल्यानंतर त्याचे खापर ते पालिकेतील पूर्वसुरींवर फोडत आहे. अडथळे आणि बहाणे सोडून विकासकामांची बेरीज ही मंडळी कधी करतील, असा जनतेला प्रश्न पडला आहे.