शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

मन नियंत्रण

By admin | Updated: March 6, 2017 23:38 IST

अत्यंत प्राचीन काळापासूनच भारतीय संस्कृतीने मनावर खूप सखोल विचार केलेला आहे.

अत्यंत प्राचीन काळापासूनच भारतीय संस्कृतीने मनावर खूप सखोल विचार केलेला आहे. संपूर्ण योगदर्शन मनाची साधना आहे. भारतीय परंपरेत मनाला जे महत्त्व दिलेले आहे, ते या म्हणीनुसार पूर्णपणे स्पष्ट होते.‘मन एव मनुष्याणांकारणं बन्धमोक्षयो:’अर्थातच मन हे मनुष्याच्या बंधनाचे व मोक्षाचे कारण आहे. यामुळेच भारतीय विचारवंतांनी मनावर सर्वसमावेशक भाष्य केलेले आहे. मनाची व्याख्या करताना असे सांगितले की, मन म्हणजे विचार-प्रवाह. हा विचारप्रवाह जसा असेल, त्याचप्रमाणे मनुष्याची वाणी असेल व तसेच त्याचे कर्म असेल. भारतात मनाशी संबंधित जे शास्त्र विकसित झाले आहे, त्यात प्रथम मनाला नियंत्रित करण्याबाबत सांगितले आहे व त्यानंतर त्याच्या पलीकडे जाण्याबाबत सांगितले आहे. मनाला कसे नियंत्रित केले पाहिजे या विषयी जी सर्वात महत्त्वपूर्ण बाब सांगितली आहे, ती आपल्याला श्रीमद्भगवतगीता व पातज्जल योगशास्त्रात पूर्ण स्पष्ट रूपात आढळते. श्रीमद्भगवतगीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संभाषणात अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतो की, मन अत्यंत चंचल व कणखर आहे आणि हेच मन व्यक्तीला हलवून टाकते. जसे वायूला पकडणे कठीण आहे, त्याचप्रमाणे मनावर नियंत्रण मिळविणेसुद्धा अवघड आहे. ‘चन्चलं हि मन:कृष्ण’अर्जुनाच्या या प्रश्नाचे उत्तर भगवान श्रीकृष्ण अत्यंत समर्पक शब्दात दिलेले आहे. तसेच एक मोठे रहस्य उघड केलेले आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की, या चंचल व दुर्निग्रह मनाला नियंत्रित करण्यासाठी अभ्यास व वैराग्याची आवश्यकता आहे. ‘अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्यण च गृह्यते’अर्थातच अभ्यास व वैराग्य या दोघांच्या कार्यानुसार मनाला नियंत्रित करता येतं. अभ्यासाची चर्चा वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे. ज्ञान, भक्ती व कर्म या तीन मार्गाने मनावर नियंत्रण मिळविता येईल. योग या तिन्ही मार्र्गाचे प्रमुख तत्त्व आहे. त्यामुळेच ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोग अशा शब्दांचा उपयोग केला जातो. या सर्व साधनेत मनाच्या नियंत्रणासाठी श्वासाची साधना जास्त महत्त्वपूर्ण मानली गेली आहे.‘चले वाते चलं चित्तंनिश्चले निश्चलं भवेत।’अर्र्थातच जेव्हा श्वास गतिमान होतो, तेव्हा मनही गतिमान असते व जेव्हा श्वास थांबतो तेव्हा मनसुद्धा नियंत्रित होते. वैराग्याद्वारे विषय-वासनाची आसक्ती कमी करून मनावर नियंत्रण करता येते. वैराग्यामुळे मन शांत तसेच स्थिर होते. अध्यात्मिक साधनेचा कळस त्यावेळी गाठता येतो, जेव्हा साधक मनाच्या पलीकडे जाऊन आत्मसाक्षात्कार करतो. हीच परमोच्च आनंदाची स्थिती आहे.-डॉ. भूषणकुमार उपाध्याय