शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

कोट्यवधीचे शेती उत्पन्न पाण्यात

By admin | Updated: October 5, 2016 03:50 IST

गत चार वर्षांतील दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला प्रारंभीच्या पावसाने दिलासा दिला आणि संकटाचा सामना करीत सोयाबीन,

गत चार वर्षांतील दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला प्रारंभीच्या पावसाने दिलासा दिला आणि संकटाचा सामना करीत सोयाबीन, कापूस, उडीद, ज्वारी बहरलेली असतानाच परतीच्या पावसाने दगा दिला़ तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला़ पेरणी झालेले ७० टक्के खरीप एक तर वाहून गेले वा पाण्यात गेले़ आता पाहाणी होईल़ पंचनामे होतील़ आश्वासने मिळतील़ सरकार मदतही देईल़ प्रश्न आहे तो कोट्यवधीच्या नुकसानीचा आणि प्रत्यक्ष मिळणाऱ्या दोन-चार हजारांच्या मदतीचा़ मराठवाड्यात नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीसह सर्वच जिल्ह्यांत खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा होतो़ एकट्या नांदेड जिल्ह्यात ७ लाख ७७ हजार ५०० एकरांमध्ये सोयाबीन होते़ त्या खालोखाल ६ लाख ३१ हजार ७२० एकरांमध्ये कापूस होतोे़ शिवाय उडीद, ज्वारीचा पेराही मोठा होता़ तुलनेने यंदा पाऊस बरा झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़, परंतु परतीच्या पावसाने पिके तर पाण्यात गेलीच, शिवाय लाखो हेक्टर जमीन खरडून गेली़ एकूण पेरा झालेल्या शेती क्षेत्रापैकी ७० टक्के पेरा क्षतिग्रस्त झाला़ म्हणजेच नांदेड जिल्ह्यात सव्वापाच लाख एकरांवरील सोयाबीन आडवे झाले़ एकरी १० क्विंटल उत्पन्न निघेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता़ त्याला तीन हजार भाव जरी गृहीत धरला तरी एका जिल्ह्यात दीड हजार कोटींचे सोयाबीन उत्पन्न बुडाले आहे़ कापूस, उडीद, ज्वारीचे आणखी वेगळे़ एकंदर अतिवृष्टीने शेतमाल व्यवसायावरही संकट कोसळले असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हाती काही उरले नाही़ अनेकांनी मोठ्या कष्टाने जमीन कसली होती़ कोरड्याठाक पडलेल्या तलावातील, मोठ्या प्रकल्पांमधील गाळाचा उपसा करून खडकाळ जमीन सुपीक केली, मात्र पावसाने काळी माती वाहून गेली़ बळीराजा आशावादीखरीप गेले, आता रबी चांगली येईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे़ त्या आशेवरच येणारा दिवाळ सण गोड करण्याच्या तयारीला शेतकरी लागला आहे़ जणू ओल्या दुष्काळाच्या वेदनेला भरलेल्या जलसाठ्यांची सुखद किनारही आहे़ मराठवाड्यातील धरणे, मध्यम लघुप्रकल्प ६८़१५ टक्के भरले आहेत़ गेल्या वर्षी ते केवळ ८़१३ टक्के इतक्याच जिवंत साठ्याने व्यापले होते़ मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी ७३़२७ टक्के भरले आहे़ निम्न तेरणा, दूधना, मांजरा, माजलगाव धरणेही भरली आहेत़ येलदरीत येवा सुरू आहे़ त्यामुळे केवळ जिल्हा शहरे, तालुक्याचे ठिकाणे व मोठ्या गावांना निव्वळ पेयजलासाठी गेली अनेक वर्षे राखीव असलेली धरणे सिंचनासाठी उपयोगात येतील़ रबीला पाणी मिळेल़ जलसंकटही घोंघावणार नाही़ हा सुखद अनुभव असला तरी शेतकऱ्यांच्या सद्य:स्थितीतील दुरवस्थेकडे दुर्लक्ष करता येणार नाही़ ज्या शेतकऱ्यांनी लाखांत उत्पन्न मिळविले असते, त्यांना हजार अन् शेकड्यावर समाधान मानावे लागते, ही शोकांतिका बदलावी लागेल़ किरकोळ मदत नव्हे, तर भक्कम नुकसान भरपाई मिळाली पाहिजे़ तीही तातडीने़ २४ जण बचावलेमराठवाड्याला दुष्काळाचे नावीन्य नाही़ अतिवृष्टी अन् पुराचे फटके मात्र अभावाने बसतात़ सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अन् आॅक्टोबरच्या प्रारंभाला मराठवाड्याच्या बहुतांश भागात विशेषत: नांदेड व लातूर जिल्ह्यात नद्यांना पूर आले़ शेकडो गावांचा संपर्क तुटला़ हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविले़ धरणांचे दरवाजे उघडले, राज्य मार्ग नव्हे, तर राष्ट्रीय मार्गही २३ तास बंद राहिले़ त्याच वेळी लिंबोटी धरणालगत अन् इतर ठिकाणी उद्भवलेल्या पुरात २४ जण अडकले होते़ जिल्हाधिकारी सुरेश काकाणी तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या महत्प्रयासाने हानी टळली़ मदतीसाठी आलेले हेलिकॉप्टर परतले होते़ धोका वाढला होता़ अशा बिकट स्थितीत सर्वच्या सर्व २४ जण सुखरूप बाहेर आल्याने स्थानिक आपत्ती व्यवस्थापनावरचा विश्वास अधिक बळकट झाला़ - धर्मराज हल्लाळे