शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीचे शेती उत्पन्न पाण्यात

By admin | Updated: October 5, 2016 03:50 IST

गत चार वर्षांतील दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला प्रारंभीच्या पावसाने दिलासा दिला आणि संकटाचा सामना करीत सोयाबीन,

गत चार वर्षांतील दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला प्रारंभीच्या पावसाने दिलासा दिला आणि संकटाचा सामना करीत सोयाबीन, कापूस, उडीद, ज्वारी बहरलेली असतानाच परतीच्या पावसाने दगा दिला़ तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला़ पेरणी झालेले ७० टक्के खरीप एक तर वाहून गेले वा पाण्यात गेले़ आता पाहाणी होईल़ पंचनामे होतील़ आश्वासने मिळतील़ सरकार मदतही देईल़ प्रश्न आहे तो कोट्यवधीच्या नुकसानीचा आणि प्रत्यक्ष मिळणाऱ्या दोन-चार हजारांच्या मदतीचा़ मराठवाड्यात नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीसह सर्वच जिल्ह्यांत खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा होतो़ एकट्या नांदेड जिल्ह्यात ७ लाख ७७ हजार ५०० एकरांमध्ये सोयाबीन होते़ त्या खालोखाल ६ लाख ३१ हजार ७२० एकरांमध्ये कापूस होतोे़ शिवाय उडीद, ज्वारीचा पेराही मोठा होता़ तुलनेने यंदा पाऊस बरा झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़, परंतु परतीच्या पावसाने पिके तर पाण्यात गेलीच, शिवाय लाखो हेक्टर जमीन खरडून गेली़ एकूण पेरा झालेल्या शेती क्षेत्रापैकी ७० टक्के पेरा क्षतिग्रस्त झाला़ म्हणजेच नांदेड जिल्ह्यात सव्वापाच लाख एकरांवरील सोयाबीन आडवे झाले़ एकरी १० क्विंटल उत्पन्न निघेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता़ त्याला तीन हजार भाव जरी गृहीत धरला तरी एका जिल्ह्यात दीड हजार कोटींचे सोयाबीन उत्पन्न बुडाले आहे़ कापूस, उडीद, ज्वारीचे आणखी वेगळे़ एकंदर अतिवृष्टीने शेतमाल व्यवसायावरही संकट कोसळले असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हाती काही उरले नाही़ अनेकांनी मोठ्या कष्टाने जमीन कसली होती़ कोरड्याठाक पडलेल्या तलावातील, मोठ्या प्रकल्पांमधील गाळाचा उपसा करून खडकाळ जमीन सुपीक केली, मात्र पावसाने काळी माती वाहून गेली़ बळीराजा आशावादीखरीप गेले, आता रबी चांगली येईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे़ त्या आशेवरच येणारा दिवाळ सण गोड करण्याच्या तयारीला शेतकरी लागला आहे़ जणू ओल्या दुष्काळाच्या वेदनेला भरलेल्या जलसाठ्यांची सुखद किनारही आहे़ मराठवाड्यातील धरणे, मध्यम लघुप्रकल्प ६८़१५ टक्के भरले आहेत़ गेल्या वर्षी ते केवळ ८़१३ टक्के इतक्याच जिवंत साठ्याने व्यापले होते़ मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी ७३़२७ टक्के भरले आहे़ निम्न तेरणा, दूधना, मांजरा, माजलगाव धरणेही भरली आहेत़ येलदरीत येवा सुरू आहे़ त्यामुळे केवळ जिल्हा शहरे, तालुक्याचे ठिकाणे व मोठ्या गावांना निव्वळ पेयजलासाठी गेली अनेक वर्षे राखीव असलेली धरणे सिंचनासाठी उपयोगात येतील़ रबीला पाणी मिळेल़ जलसंकटही घोंघावणार नाही़ हा सुखद अनुभव असला तरी शेतकऱ्यांच्या सद्य:स्थितीतील दुरवस्थेकडे दुर्लक्ष करता येणार नाही़ ज्या शेतकऱ्यांनी लाखांत उत्पन्न मिळविले असते, त्यांना हजार अन् शेकड्यावर समाधान मानावे लागते, ही शोकांतिका बदलावी लागेल़ किरकोळ मदत नव्हे, तर भक्कम नुकसान भरपाई मिळाली पाहिजे़ तीही तातडीने़ २४ जण बचावलेमराठवाड्याला दुष्काळाचे नावीन्य नाही़ अतिवृष्टी अन् पुराचे फटके मात्र अभावाने बसतात़ सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अन् आॅक्टोबरच्या प्रारंभाला मराठवाड्याच्या बहुतांश भागात विशेषत: नांदेड व लातूर जिल्ह्यात नद्यांना पूर आले़ शेकडो गावांचा संपर्क तुटला़ हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविले़ धरणांचे दरवाजे उघडले, राज्य मार्ग नव्हे, तर राष्ट्रीय मार्गही २३ तास बंद राहिले़ त्याच वेळी लिंबोटी धरणालगत अन् इतर ठिकाणी उद्भवलेल्या पुरात २४ जण अडकले होते़ जिल्हाधिकारी सुरेश काकाणी तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या महत्प्रयासाने हानी टळली़ मदतीसाठी आलेले हेलिकॉप्टर परतले होते़ धोका वाढला होता़ अशा बिकट स्थितीत सर्वच्या सर्व २४ जण सुखरूप बाहेर आल्याने स्थानिक आपत्ती व्यवस्थापनावरचा विश्वास अधिक बळकट झाला़ - धर्मराज हल्लाळे