शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

मिली ‘भगत’

By admin | Updated: August 31, 2016 04:40 IST

गोष्ट पाच-सहा महिन्यांपूर्वीची आहे. मराठवाडा दुष्काळाने पिचला होता. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे गावोगाव फिरत होते.

गोष्ट पाच-सहा महिन्यांपूर्वीची आहे. मराठवाडा दुष्काळाने पिचला होता. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे गावोगाव फिरत होते. एका ठिकाणी बोलताना नानाने मुद्दा उपस्थित केला की, महाराष्ट्रातील श्रीमंत देवस्थानांनी दुष्काळग्रस्तांना मदत करावी. या आवाहनाला किती प्रतिसाद मिळाला हे माहीतच आहे. नानाच्या या आवाहनाची आठवण तुळजापूर येथील भवानी मातेच्या दानपेटी घोटाळ्याच्या सीआयडी अहवालानंतर आली. हा गाजलेला देवस्थान घोटाळा आहे. असुरांचे निर्दालन करणारी भवानी घोटाळेबाजांच्या कोंडाळ्यात अडकली. प्रवीण गेडाम या जिल्हाधिकाऱ्याने हा घोटाळा बाहेर काढला. या घोटाळ्याचा तपास अहवाल सांगतो की, ३९ किलो सोने आणि ६ क्विंटल ८ किलो चांदी एवढा ऐवज गडप केला गेला आहे. बाजारभावाने याचे मूल्यांकन ७ कोटी १९ लाख रुपये होते.आपल्याकडे माणसाचे जीवनमान उंचावते की नाही हा प्रश्न असला तरी कोणत्याही देवस्थानांची श्रीमंती झपाट्याने वाढताना दिसते. म्हणूनच अशी देवस्थाने ताब्यात राहावीत असा धनदांडग्यांचा प्रयत्न असतो. सरकारचे नियंत्रण असणाऱ्या सिद्धिविनायक, शिर्डी या देवस्थानांच्या व्यवस्थापन समित्यांवर वर्णी लागण्यासाठी तर साठमारी सुरू असते, म्हणजे श्रीमंत देवस्थानांच्या कमिटीवर जाण्यासाठी सारेच राजकीय भगत उतावीळ असतात. तुळजाभवानी मंदिरातील घोटाळ्यात सीआयडीने ११ आयएएस अधिकारी, ९ उपविभागीय अधिकारी, ९ तहसीलदार, ८ माजी नगराध्यक्ष, १० ठेकेदार, १४ कारभारी आणि १ आमदार अशा ६२ जणांवर ठपका ठेवला आहे. १९९१ ते २००९ या काळातील दानपेटी घोटाळ्याची सुरुवात तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या निर्णयानंतर झाली. दानपेटीचा लिलाव करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मंदिराचे उत्पन्न वाढविणे हा त्यामागचा उद्देश होता, पण रिंग पद्धतीने लिलाव सुरू झाले आणि सर्व संमतीने ते चालले. मंदिराचे उत्पन्न वाढण्याऐवजी या कोंडाळ्याचे वाढले. कारण येथे तर भगतांचीच मिलीभगत झाली होती.तुळजाभवानीच्या केवळ दानपेटीवरच डल्ला मारला गेला नाही, तर इनामी जमिनीसुद्धा अशाच घशात घातल्या आहेत. या देवस्थानाची उस्मानाबाद, बीड, सोलापूर आणि अहमदनगर या चार जिल्ह्यांमध्ये ३८५५ एकर जमीन आहे. यातील ११७१ एकर वाकोजी बुवा मठाला, १९४१ एकर भारतीबुवा मठ, ६९१ एकर प्रकाशनाथ मठ, ५२ एकर हमरोजी बुवा मठ अशी दिली आहे. या मठांच्या महंत, पुजाऱ्यांनी भक्तांना मोफत सेवा, भोजन द्यावे, मंदिराची झाडझुड, नंदादीप आदी व्यवस्थेसाठी निजामाने दिली होती. इनामी जमीन विकता येत नाही, तिला कुळ लागत नाही आणि ती हस्तांतरितही करता येत नाही, असा कायदा असताना २६३ एकर जमिनीचे फेरफार करण्यात आले. ६३ एकर जमिनीला कुळ लागले. काही जमिनी खालसा झाल्या, कारण येथेही मिलीभगत. या प्रकरणात धर्मादाय आयुक्तांनी सेवेकऱ्यांवर ठपका ठेवला. हे प्रकरण आता औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात गेले. परवा याच्या चौकशीची मागणी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात झाली. हे तुळजाभवानीचे प्रकरण महाराष्ट्रात वानगीसारखे आहे. या राज्यात असे देवस्थान नसेल ज्याचा तंटा न्यायालयात गेला नाही. श्रद्धेच्या मांडलेल्या बाजाराचा हा नमुना राज्यभर पाहायला मिळतो. याच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या माध्यमांची कोंडी करण्यासाठी धर्ममार्तंड पुढे येतात, हे सुद्धा पुरोगामी महाराष्ट्र निमूटपणे पाहत असतो. श्रीमंत देवस्थाने, मठ ही केवळ भक्तीची ठिकाणे राहिली नाहीत. पैशापाठोपाठ येथे हितसंबंध आले, रुजले आणि त्याच्या गाठी तयार झाल्या. त्याला राजकीय खतपाणी मिळाले. अशा शक्तिपीठांचा आणि धर्ममार्तंडाचा निवडणुकीत राजकीय पक्षाकडून होणारा वापर आपण पाहतोच. कारण येथेही राजकीय नेते आणि मठाधीशांची मिलीभगत असते. ईश्वराला काय पाहिजे दोन हात आणि तिसरे मस्तक, असे समजणाऱ्यांचा काळ संपला. आता भगत-भोप्यांचा कल्लोळ तेवढा उरला.- सुधीर महाजन