शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मेट्रो, नगरला इंटरसिटी

By admin | Updated: December 22, 2016 00:09 IST

पुणे ही दोन शहरे इंटरसिटी एक्स्प्रेसने जोडावी या मागणीने अहमदनगर शहरात सध्या जोर धरला आहे. तशी ही मागणी जुनी आहे

अहमदनगर- पुणे ही दोन शहरे इंटरसिटी एक्स्प्रेसने जोडावी या मागणीने अहमदनगर शहरात सध्या जोर धरला आहे. तशी ही मागणी जुनी आहे. पण, सध्या महाराष्ट्राचे सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री असल्याने नगरकरांना अपेक्षा आहेत. पुणे व नगरंच नाही तर मराठवाडा व विदर्भाचाही या मागणीत फायदा असल्याने राज्य व केंद्र या दोघांनीही या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. खुद्द पुणे शहराचाही या पर्यायात मोठा फायदा आहे. रेल्वे तसेच महामार्ग या दोन्ही नकाशांवर अहमदनगर हे मध्यवर्ती शहर आहे. मराठवाडा व विदर्भाचे हे एकप्रकारे प्रवेशद्वार आहे. पुण्याहून विदर्भ व मराठवाड्यात जाताना व्हाया नगरच जावे लागते. नगरला सध्या रेल्वे आहे. मात्र, हा मार्ग म्हणजे पुण्याहून पुणतांबा केल्याचा प्रकार आहे. म्हणजे पुण्याहून औरंगाबादला जायचे म्हटले तर पुणे-दौंड-नगर-मनमाड-औरंगाबाद असा दूरवरचा वेडावाकडा प्रवास करावा लागतो. त्यात अनेक तास वाया जातात. त्यामुळे नगर व औरंगाबादचे प्रवासी रेल्वेच्या नादी लागण्याऐवजी रस्ता वाहतुकीलाच प्राधान्य देतात. नगर-पुणे या दोन शहरांदरम्यान सध्या दररोज सुमारे साडेसातशे एस.टी. बसेस धावतात. ट्रॅव्हल, परराज्यातील बसेस, कार यामार्फत होणारी वाहतूक वेगळी. किमान पंधरा हजार लोक या मार्गावर दररोज प्रवास करतात, असा एक अंदाज आहे. ही सगळी वाहतूक शिक्रापूर ते पुणे या दरम्यान कोंडी करते. यात वेळ, पैसा, इंधन याचा प्रचंड अपव्यय होतो आहे. यास पुणे, नगर, औरंगाबादसह या मार्गाने जाणारे सर्वच प्रवासी वैतागले आहेत. या रस्ता वाहतुकीला रेल्वे हाच एक पर्याय दिसतो. पुणे-नगर हे अंतर बसने १२० तर रेल्वेने १६० किलोमीटर आहे. मात्र, रेल्वेचे अंतर व वेळ कमी करणे शक्य आहे. त्यासाठी पुण-नगर दरम्यानच्या दौंड स्टेशनला पर्याय द्यावा लागेल. पुण्याहून दौंडला रेल्वे आली की ती इंजिन बदलून नंतरच नगरचा रस्ता धरते. यात अर्धा तास वाया जातो. त्यामुळे पॅसेंजर गाडीला नगरला पोहोचायला साडेचार तास, तर मेल गाडीला साडेतीन तास लागतात. पुण्यातून मराठवाडा, विदर्भ व दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांना या दिव्यातून जावेच लागते. त्यासाठी दौंडच्या अलीकडे केडगाव ते काष्टी या दोन गावांदरम्यान आठ किलोमीटरची पर्यायी लाईन टाकली तर दौंडलाच फाटा मिळेल. रेल्वेचे इंजिन बदलण्याचा ताण वाचेल. हे काम मंजूर आहे. ते वेगाने होण्याची गरज आहे. नगरचे खासदार दिलीप गांधी यांनी या संदर्भात नुकतीच रेल्वेमंत्र्यांची भेटही घेतली आहे. हा नवीन मार्ग झाल्यास नगर-पुणे हा प्रवास अडीच तासांवर येईल. पुणे-मनमाड हा रेल्वे मार्ग दुपदरी झाल्यास ही वाहतूक आणखी वेगवान होईल. सध्या नगर-पुणे अशी स्वतंत्र रेल्वेगाडी नाही. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस किंवा पॅसेंजर यांनी प्रवास करावा लागतो. त्यात आरक्षणाची व जागेचीही अडचण असते. त्यासाठी पुणे-सोलापूर या धर्तीवर ‘नगर-पुणे’ ही इंटरसिटी धावली, तर रस्त्यावरील प्रवासी रेल्वेकडे वळतील. या सेवेमुळे पुणे- नगर ही शहरे थेट जोडली जातील. नगरहून रोजगारासाठी पुण्यात स्थलांतरित झालेल्यांना तो मोठा दिलासा ठरेल. औरंगाबादकरांनाही या सेवेचा नगरपर्यंत का होईना लाभ घेता येईल. पुणे शहरात आता मेट्रो येणार आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरांच्या तुलनेत मध्यवर्ती असलेले नगर मात्र मागे पडले. नगरला अद्याप विमानतळ नाही. शिर्डीजवळील विमानतळ लवकरच कार्यान्वित होईल. पण, जिल्ह्याच्या मुख्यालयी विमानतळ नाही. निदान पुणे-नगर अशी रेल्वेसेवा मिळाली तर या शहराला वेग येईल. नगरहून मनमाडऐवजी नेवासा फाटामार्गे औरंगाबादला थेट रेल्वे न्या, अशीही मागणी आहे. पुण्याला मेट्रो देताना शेजारील शहरांचाही विचार करावा लागेल. - सुधीर लंके