शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

निरोप

By admin | Updated: June 30, 2016 05:46 IST

आमुचा रामराम घ्यावा़़़ असं म्हणणाऱ्या तुकोबांचा आपण कधीतरी निरोप घेऊ शकू का?

आजोबांची काकडारती ऐकणं वृषालीला खूप आवडायचं आजोळी तिचा दिवस पहाटे सुरू व्हायचा तो आर्त स्वरातील भूपाळी, भजनं, आरती ऐकत, नव्हे अनुभवत़ विशेषत: शेवटी आजोबा घ्यायचे तो ‘सद्गुरूंचा निरोप’प्रेमात राम रमतो,प्रेमाला मोल ना जगामाजी हाचि निरोप गुरूंचा,गुरूरायाला तहान प्रेमाची॥वृषुच्या मनात यायचं हा निरोप देतोय कोण? तेही सद्गुरूच नव्हेत का? अन् घेणारे आजोबा? त्यांच्यातही सद्गुरूंचा अंश नाही का? निरोप खरंच घेता येतो? तिच्या मनात ‘गीतरामायणातलं’ गीत गुंजू लागलं़़़ निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता ॥ खरंच आहे़ आपणही विचार केला तर आपल्या लक्षात येतं़़़ आम्ही जातो आपुल्या गावाआमुचा रामराम घ्यावा़़़ असं म्हणणाऱ्या तुकोबांचा आपण कधीतरी निरोप घेऊ शकू का? तुका काय फक्त देह होता, देहूला जगून गेलेला? का विदेही तुका आकाशाएवढा होता़़़ नि म्हणून तो आजही आहेच़़़़ तो असणारच आहे? त्याची वाणी ‘अभंग’ नाही का? काही जण म्हणतात ‘आपण प्रत्येक वेळी भेटतो तेव्हा नव्यानंच भेटतो. खरं आहे. कारण जीवनातील अनुभव आपल्याला सतत नवीन बनवत असतात़ पण ऋणानुबंध म्हणून काही असतंच की! ऋणानुबंधाच्या गाठीत मोठी तुष्टता, मोठा आनंद असतो़’ साधूसंतांचे ऋणानुबंध साऱ्या मानवजातीशीच नव्हे तर वृक्ष-वल्ली-वनचरे अशा सर्वांशीच असतात़ ‘जे जे भेटे भूत। ते मानिजे भगवंत’ किंवा ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणणारे ज्ञानोबा कधी कुणाचा निरोप घेऊ शकतील का? म्हणूनच नाही का त्यांनी ‘संजीवन समाधी’ घेतली? ते गेले नाहीतच़ त्यांचा निरोप कसा घ्यायचा? एक मात्र आहे़ निरोप म्हणजे संदेश़़़़ शिकवण़ ही संतांची शिकवण ‘एक तरी ओवी अनुभवावी’ यासाठी सांगायची़़़ त्यांची पत्रं वाचायची नि त्यातला निरोप सांगायचा़ त्यासाठी केलं जाणारं ‘निरूपण’ हाच संतांचा निरोप असतो़ तोच त्या पंढरीच्या विठूचाही निरोप असतो़ तो बाहेरून कुणी आणत नाही़ आतूनच ऐकू येतो़ मग ‘पावले चालती पंढरीची वाट’़ आषाढी-कार्तिकी हे केवळ निमित्त असतं़ या वाटेवरचे सारे केवळ ‘वारीकरी’ नसतात तर ‘वारकरी’ असतात़ अहंकारावर वार करणारे! या दृष्टीनं पू़ गोंदवलेकर महाराजांचा निरोप स्पष्ट आहे़़़़ अभिमान शत्रु मोठा,सर्वांना जाचतो सुखाशेने । हाचि निरोप गुरूंचा,मारावा तो समूळ नामाने॥ हे नाम हीच ज्ञानदेवांची संजीवन समाधी आहे़ ‘समाधि साधन संजीवन नाम’ हाच माऊलीचा निरोप आहे़ शेवटी एवढंच लक्षात ठेवू या,अवघे जीवन नामार्पणमस्तु -रमेश सप्रे