शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

मराठीचे सक्षमीकरण की दयामरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:16 IST

मराठी भाषा ही महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ या कायद्यान्वये राज्याची राजभाषा आहे. प्रतिवर्षी दि. २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन शासन स्तरावर आणि विविध संस्थांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.

- शांताराम दातारमराठी भाषा ही महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ या कायद्यान्वये राज्याची राजभाषा आहे. प्रतिवर्षी दि. २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन शासन स्तरावर आणि विविध संस्थांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनाच्या आदल्याच दिवशी म्हणजे, २६ फेब्रुवारीला राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. राज्यपालांचे अभिभाषण सुरू झाल्यावर, मराठी अनुवाद ऐकण्याची व्यवस्था न झाल्याने सभागृहात एकच गोंधळ झाला. विरोधकांनी सरकारने जाणूनबुजून मराठी अवमान केला, असा आरोप करत, मध्यवर्ती सभागृहात घोषणाबाजी केली व शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभागृहाची माफी मागावी लागली. ही घटना मराठी भाषा गौरव दिनाच्या आदल्याच दिवशी घडते, ही बाब राजभाषा मराठीचे दुर्दैवाचे फेरे अद्यापही संपलेले नाहीत, हे दर्शविते.राजभाषा मराठी दिवा तेवत ठेवायचा की, तो विझवायचा, याचा राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी गंभीरपणे विचार करण्याइतपत मराठी भाषेचे वास्तव चिंताजनक आहे. मराठी भाषा या राज्याचा पाया आहे आणि मराठी भाषेशिवाय महाराष्टÑ राज्याच्या अस्तित्वाला अर्थ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना भाषेवरील फारसीचे आक्रमण थोपविण्यासाठी फारसी शब्दांच्या जागी अनेक मराठी शब्द आणले. मराठी भाषेचा सन्मान वाढविला. त्या छत्रपतींच्या महाराष्टÑात मराठी भाषेची दुर्दशा व्हावी, हे राजकीय पक्षांनी लक्षात घेऊन, आता तरी या राज्याची मराठीपणाची ओळख पुसली जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या सद्यस्थितीचा विचार करण्यापूर्वी, भाषावर प्रांतरचना व महाराष्टÑ नावाचे मराठी राज्य निर्मिती, याबद्दल ऊहापोह करणे आवश्यक आहे.आपल्या देशात १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचना करण्यात आली. त्या वेळेस मराठी भाषेचे महाराष्टÑ राज्य नाकारण्यात आले व महाराष्टÑ व गुजरात मिळून एक द्वैभाषिक राज्य निर्माण करण्यात आले. त्यामुळे महाराष्टÑात असंतोषाचा वणवा पेटला. आचार्य अत्रे यांच्यासह अनेक साहित्यिक, तसेच एस. एम. जोशी, कॉ. डांगे, प्रबोधनकार ठाकरे इत्यादींनी मुंबईसह संयुक्त महाराष्टÑासाठी या आंदोलनाचे नेतृत्व केले. हे आंदोलन सतत ४ वर्षे सुरू होते. त्यामध्ये १०६ धारातीर्थी झाले आणि केंद्र सरकारला नमते घेऊन, १९५९ मध्ये द्वैभाषिक राज्याचा प्रयोग मागे घेऊन, मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ निर्माण करण्याचा निर्णय करावा लागला. या निर्णयानुसार, १ ते १९६०ला मराठी भाषेचे महाराष्टÑ राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे मराठी भाषेचे महाराष्टÑ राज्य आपणास सहजासहजी मिळालेले नाही. भाषावार प्रांतरचनेच्या सूत्रानुसार, १ मे १९६० ला अस्तित्वात आलेल्या राज्याचा पायाच मराठी असल्यामुळे, मराठी भाषेचे संरक्षण संवर्धन आणि विकास करणे, याची मराठी भाषिकांची जबाबदारी आहे. त्यापेक्षा अधिक जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यांचे ते कर्तव्यच आहे.महाराष्टÑ राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १३ फेब्रुवारी १९६०ला विदर्भात, सावरगाव डुकरे येथे झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या भाषणात कोणतीही भाषा टिकण्यासाठी ती ज्ञान-विज्ञानाची भाषा झाली पाहिजे, असे प्रतिपादन केले होते. त्याची दखल यशवंतराव चव्हाण यांच्या नंतरच्या राज्यकर्त्यांनी घेतली नाही. ही बाब दि. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्ताने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी, असा ठराव विधान परिषदेत मांडला. त्यावरून स्पष्ट होते, मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी उपाययोजनेबाबत विधान परिषदेत चर्चा झाली असती, तर फार बरे झाले. कारण त्या चर्चेत मराठी भाषेच्या समग्र विकासाचे संदर्भ १९६४ पासून वेळोवेळी कोणत्या उपाययोजना केल्या, हे तरी शासनकर्त्या पक्षाला व विरोधी पक्षाला समजले असते. त्यामुळे शासनाने मराठीचे संवर्धन व विकास यासाठी वेळोवळी केलेल्या उपाययोजना आणि त्यावर कार्यवाही याबाबत ऊहापोह करणे आवश्यक आहे.मराठीला ज्ञान-विज्ञानाची भाषा करण्यासाठी विद्यापीठांनी लक्ष घातले असते आणि राज्य शासनाने त्याबाबत राज्यातील विद्यापीठांकडे वेळोवेळी विचारणा केली असती, तर मराठी ज्ञानभाषा करण्याबाबत ठराव विधान परिषदेत, सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत दि. २७ फेब्रुवारीला मांडावा लागला नसता. मराठी ज्ञान-विज्ञानाची भाषा होण्यासाठी राज्य शासन आता तातडीने पावले उचलेले अशी आशा करणे भाग आहे.राजभाषा मराठीचा वापर राज्य शासनाची कार्यालये, महामंडळे, शासन पुरस्कृत उपक्रम, महापालिका, नगरपालिका इ. ठिकाणी प्रभावीपणे होण्यासाठी राजभाषा अधिनियमातील कलम ६ अन्वये नियम करणे आवश्यक होते, ते अद्यापही झालेले नाही. राज्यातील केंद्रीय कार्यालयांमध्ये म्हणजे टेलिफोन, बँका इत्यादी कार्यालयांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठीतून कामकाज होत नाही. कारण राज्यांतील केंद्रीय कार्यालयांना भेट देऊन तपासणी करण्याबाबत शासनाकडे यंत्रणाच नाही.मराठी भाषेचे महाराष्टÑ राज्य अस्तित्वात आले, त्या घटनेस येत्या १ मे रोजी ५८ वर्षे पूर्ण होतील. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे १९६२ मध्ये संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेल्यानंतर, सत्तेवर आलेल्या काँगे्रससह एकाही पक्षाने मराठी भाषेचे संवर्धन व विकास याकडे गंभीरपणे पाहिले असते, तर हा लेख लिहिण्याची वेळ आली नसती. मराठी भाषेचे संवर्धन व विकास याकडे यापूर्वीच्या सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे, परंतु विद्यमान शासनाचा कार्यकाळ ३ वर्षांचा होऊन गेला, तरीही ते प्रश्न तसेच राहावेत, हेच राजभाषा मराठीचे दुर्दैव आहे. (लेखक हे मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :marathiमराठी