शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

‘कविता’च्या आठवणींना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 00:30 IST

समाज, गाव आणि कुटुंब काय म्हणते याची जराही तमा न बाळगता सत्य, मग ते कितीही कुरूप, ओंगळ वा लाजिरवाणे का असेना, ते आपल्या लिखाणातून अतिशय उघड्या भाषेत व तशाच सुरात लिहिणारी ही कविता बोलायचीही तशीच.

कविता महाजन या कवयित्रीचे व लेखिकेचे वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षी निधन व्हावे ही गोष्ट साहित्य, समाज आणि सत्य या साऱ्यांविषयीची आस्था असणा-यांना खोलवर दुखविणारी आहे. सत्य पूजनीय असले तरी ते सर्वांना आवडतेच असे नाही. आपल्यातली खूपशी माणसे आणि स्त्रियादेखील असत्याच्या आधाराने जगत असतात. आपण सुखी असल्याचा खोटा आव चर्येवर बाळगणारी आणि मनातून कमालीची दु:खी असणारी अनेक माणसे आपण पाहिलीही असतात. त्यांच्याविषयीचे सत्य सांगणे वा त्याची चर्चा करणे हेच मग आपण असभ्य व असामाजिक मानत असतो. स्पष्टच सांगायचे तर ज्यावर बोलणे आवश्यक त्यावर बोलणे टाळणे यावरच आपल्या सभ्यतेचे इमले उभे असतात. परिणामी आपल्यातील संवादही काही सांगण्याऐवजी काहीतरी दडविण्यासाठीच चालू असतात. या ढोंगीपणावर आसूड ओढून सत्याविषयी सांगण्याची जिद्द बाळगणारी व ती बाळगताना समाजाने चोरून जपलेली असत्ये ओरबाडून काढणारी कविता महाजन ही त्याचमुळे अनेकांच्या प्रेमाचा तर अनेकांच्या रोषाचा विषय होती. ‘ब्र’ या आपल्या कादंबरीत समाजातील गरीब स्त्रियांचे होणारे श्रीमंती शोषण, ते करणाºया संभावितांच्या मान्यवर संस्था आणि समाज व सरकार यांची त्या साºयांकडे संथपणे पाहण्याची वृत्ती याविषयी ज्या पोटतिडकीने तिने लिहिले तो प्रकार सगळ्या सहृदय वाचकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. ज्यांना आपण साधू, संत, महात्मे, सेवाधर्मी आणि बाबा वा बापू म्हणतो त्यांचे पाय केवढ्या चिखलाने आणि घाणीने बरबटले आहेत हे ती ज्या धिटाईने सांगते ते वाचले की एवढ्या काळात तिचा दाभोलकर वा गौरी लंकेश का झाले नाही, असाच प्रश्न आपल्याला पडतो. तिने ‘भिन्न’ लिहिली तेव्हाही भल्याभल्यांची झोप उडाली. आपल्या अवतीभवतीच नव्हे तर शेजारी चालणारे, जराशा अंधाराच्या आडोशात कसले जीवन उभे आहे, माणसांच्या आणि स्त्रियांच्याही वासना केवढ्या बलशाली आहेत आणि त्या वासनांना स्त्री-वेश्याच नव्हे तर पुरुष-वेश्याही कशा गरजेच्या वाटत आहेत याची तिने केलेली चर्चा डोळे विस्फारणारी व आपल्यालाच आपले अज्ञान सांगणारी आहे. आपण बरे आणि आपले घर बरे असे समजणारे व बाहेरचे जग शक्यतोवर अपरिचित राखणारे मग बर्ट्रांड रसेल ‘वेश्या हीच समाजातील सभ्य स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण करणारी खरी राखणदार असते’ असे का म्हणतो ते वाचून हादरतात. मात्र वास्तव तेच आहे आणि कविताचा भर समाजातील या कुरूपपणाचे दर्शन समाजाला घडवून देण्यावर आहे. तिने कविता लिहिल्या, कादंबºया व ललित असे सारेच लिहिले. ती आणखी जगली असती तर तिने तस्लिमालाही मागे टाकले असते. मात्र या बंडखोर लेखिकेचे मन गरिबीच्या व वेदनांच्या सहवासात तळमळणाºया लोकांशी अधिक जुळले होते. प्रस्तुत लेखकासोबत तिने आदिवासी क्षेत्राचा प्रवास केला होता. पनवेल आणि वसईभोवतीच्या सगळ्या बºयावाईट प्रकारांएवढीच ती मुंबईतील विजेच्या खांबाखाली उभ्या असलेल्या पुरुष-वेश्यांशीही परिचित होती. त्यांचे व्यवहार तिने प्रत्यक्ष पाहिले व लिहिले. ते सारेच शहारून टाकणारे आहे. कुठल्याशा कवीच्या प्रेमाचे मनभर वेड घेऊन जगलेल्या आणि उपाशीपोटी गाडीखाली जीव देणाºया एका तरुणीची त्या कवीने केलेली उपेक्षा कविताने जेव्हा जगाला सांगितली तेव्हा सा-याच सभ्य व सुसंस्कृत जगाचे समाधान उद्ध्वस्त होऊन गेले. ज्या नांदेड शहरात तिचा जन्म झाला त्या महापालिकेने तिच्या लिखाणासाठी तिला मानपत्र देऊन सन्मानित केले. त्या वेळचे तिचे भाषण, एका विमान प्रवासातला कविता करकरे आणि तिच्याशी झालेला संवाद आणि काही काळ विश्रांतीसाठी प्रस्तुत लेखकाकडे तिने केलेला मुक्काम या साºया गोष्टी तिचे सरळसाधे मराठवाडेपण लक्षात आणून देणाºया होत्या. तिच्या बोलण्यात तिच्या अडचणी व तिच्यावर गुदरलेले प्रसंग असत. पण त्यात व्यथा वा पश्चात्ताप नसे. हे आणि तिचे निर्भय मन आणि त्याचे हुंकारच तेवढे त्यात असत... कविताच्या असंख्य आठवणींना...

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या