शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘कविता’च्या आठवणींना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 00:30 IST

समाज, गाव आणि कुटुंब काय म्हणते याची जराही तमा न बाळगता सत्य, मग ते कितीही कुरूप, ओंगळ वा लाजिरवाणे का असेना, ते आपल्या लिखाणातून अतिशय उघड्या भाषेत व तशाच सुरात लिहिणारी ही कविता बोलायचीही तशीच.

कविता महाजन या कवयित्रीचे व लेखिकेचे वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षी निधन व्हावे ही गोष्ट साहित्य, समाज आणि सत्य या साऱ्यांविषयीची आस्था असणा-यांना खोलवर दुखविणारी आहे. सत्य पूजनीय असले तरी ते सर्वांना आवडतेच असे नाही. आपल्यातली खूपशी माणसे आणि स्त्रियादेखील असत्याच्या आधाराने जगत असतात. आपण सुखी असल्याचा खोटा आव चर्येवर बाळगणारी आणि मनातून कमालीची दु:खी असणारी अनेक माणसे आपण पाहिलीही असतात. त्यांच्याविषयीचे सत्य सांगणे वा त्याची चर्चा करणे हेच मग आपण असभ्य व असामाजिक मानत असतो. स्पष्टच सांगायचे तर ज्यावर बोलणे आवश्यक त्यावर बोलणे टाळणे यावरच आपल्या सभ्यतेचे इमले उभे असतात. परिणामी आपल्यातील संवादही काही सांगण्याऐवजी काहीतरी दडविण्यासाठीच चालू असतात. या ढोंगीपणावर आसूड ओढून सत्याविषयी सांगण्याची जिद्द बाळगणारी व ती बाळगताना समाजाने चोरून जपलेली असत्ये ओरबाडून काढणारी कविता महाजन ही त्याचमुळे अनेकांच्या प्रेमाचा तर अनेकांच्या रोषाचा विषय होती. ‘ब्र’ या आपल्या कादंबरीत समाजातील गरीब स्त्रियांचे होणारे श्रीमंती शोषण, ते करणाºया संभावितांच्या मान्यवर संस्था आणि समाज व सरकार यांची त्या साºयांकडे संथपणे पाहण्याची वृत्ती याविषयी ज्या पोटतिडकीने तिने लिहिले तो प्रकार सगळ्या सहृदय वाचकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. ज्यांना आपण साधू, संत, महात्मे, सेवाधर्मी आणि बाबा वा बापू म्हणतो त्यांचे पाय केवढ्या चिखलाने आणि घाणीने बरबटले आहेत हे ती ज्या धिटाईने सांगते ते वाचले की एवढ्या काळात तिचा दाभोलकर वा गौरी लंकेश का झाले नाही, असाच प्रश्न आपल्याला पडतो. तिने ‘भिन्न’ लिहिली तेव्हाही भल्याभल्यांची झोप उडाली. आपल्या अवतीभवतीच नव्हे तर शेजारी चालणारे, जराशा अंधाराच्या आडोशात कसले जीवन उभे आहे, माणसांच्या आणि स्त्रियांच्याही वासना केवढ्या बलशाली आहेत आणि त्या वासनांना स्त्री-वेश्याच नव्हे तर पुरुष-वेश्याही कशा गरजेच्या वाटत आहेत याची तिने केलेली चर्चा डोळे विस्फारणारी व आपल्यालाच आपले अज्ञान सांगणारी आहे. आपण बरे आणि आपले घर बरे असे समजणारे व बाहेरचे जग शक्यतोवर अपरिचित राखणारे मग बर्ट्रांड रसेल ‘वेश्या हीच समाजातील सभ्य स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण करणारी खरी राखणदार असते’ असे का म्हणतो ते वाचून हादरतात. मात्र वास्तव तेच आहे आणि कविताचा भर समाजातील या कुरूपपणाचे दर्शन समाजाला घडवून देण्यावर आहे. तिने कविता लिहिल्या, कादंबºया व ललित असे सारेच लिहिले. ती आणखी जगली असती तर तिने तस्लिमालाही मागे टाकले असते. मात्र या बंडखोर लेखिकेचे मन गरिबीच्या व वेदनांच्या सहवासात तळमळणाºया लोकांशी अधिक जुळले होते. प्रस्तुत लेखकासोबत तिने आदिवासी क्षेत्राचा प्रवास केला होता. पनवेल आणि वसईभोवतीच्या सगळ्या बºयावाईट प्रकारांएवढीच ती मुंबईतील विजेच्या खांबाखाली उभ्या असलेल्या पुरुष-वेश्यांशीही परिचित होती. त्यांचे व्यवहार तिने प्रत्यक्ष पाहिले व लिहिले. ते सारेच शहारून टाकणारे आहे. कुठल्याशा कवीच्या प्रेमाचे मनभर वेड घेऊन जगलेल्या आणि उपाशीपोटी गाडीखाली जीव देणाºया एका तरुणीची त्या कवीने केलेली उपेक्षा कविताने जेव्हा जगाला सांगितली तेव्हा सा-याच सभ्य व सुसंस्कृत जगाचे समाधान उद्ध्वस्त होऊन गेले. ज्या नांदेड शहरात तिचा जन्म झाला त्या महापालिकेने तिच्या लिखाणासाठी तिला मानपत्र देऊन सन्मानित केले. त्या वेळचे तिचे भाषण, एका विमान प्रवासातला कविता करकरे आणि तिच्याशी झालेला संवाद आणि काही काळ विश्रांतीसाठी प्रस्तुत लेखकाकडे तिने केलेला मुक्काम या साºया गोष्टी तिचे सरळसाधे मराठवाडेपण लक्षात आणून देणाºया होत्या. तिच्या बोलण्यात तिच्या अडचणी व तिच्यावर गुदरलेले प्रसंग असत. पण त्यात व्यथा वा पश्चात्ताप नसे. हे आणि तिचे निर्भय मन आणि त्याचे हुंकारच तेवढे त्यात असत... कविताच्या असंख्य आठवणींना...

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या