शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

श्रमदानाचे सार्थक

By admin | Updated: June 26, 2016 04:01 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा काळ हा ५ जूनला संपला. भाग घेणाऱ्या ११६ गावांमध्ये मोजमापाचे काम सुरू झाले. काही गावांत तर इतक्या प्रचंड प्रमाणावर काम झाले होते की, झालेल्या

- सत्यजीत भटकळसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा काळ हा ५ जूनला संपला. भाग घेणाऱ्या ११६ गावांमध्ये मोजमापाचे काम सुरू झाले. काही गावांत तर इतक्या प्रचंड प्रमाणावर काम झाले होते की, झालेल्या कामांचे मोजमाप करण्यास रात्रंदिवस काम करावे लागले. त्यांपैकी एकाने आम्हाला सांगितले, दहा दिवस अधिक श्रमदान करायला सांगितले असते तरी आम्ही ते आनंदाने केले असते; पण, या मोजमाप प्रक्रियेने आम्हाला पार थकवून काढले. गावांनी दिलेले मोजमाप मग वॉटर कप टीमने प्रमाणित केले व त्या आधारावर आघाडीच्या ९ गावांची यादी तयार करण्यात आली. परीक्षक मंडळाने मग या ९ गावांचा दौरा सुरू केला. त्यांचा निर्णय पुढील दिवसांत होईल, परंतु सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे ते पाण्यानी भरून गेलेल्या सर्व उपचारांवर. ज्यामुळे अनेक वर्षे कोरड्या पडलेल्या विहिरी पाण्याने भरत आहेत. हे पाणी खऱ्या अर्थाने ग्रामस्थांनी आपल्या श्रमदानातून कमावले आहे. हे दृश्य पाहून फक्त विहीर नव्हे, तर डोळेही पाण्याने भरून येतात. ‘सत्यमेव जयते - वॉटर कप’चा हा पहिला टप्पा प्रायोगिक तत्त्वावर फक्त तीन जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तालुक्यात घेण्यात आला. तो प्रयोग या कारणाने म्हणावा लागेल, कारण सामाजिक प्रश्नाला लोकचळवळीच्या माध्यमातून सोडवण्याचा तो एक प्रयत्न होता. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ‘पानी फाउंडेशन’ने, म्हणजेच वॉटर कप स्पर्धेच्या आयोजकांनी कोणत्याही गावाला फंड किंवा अनुदान दिले नाही. शासनाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मदत दिली; तसेच अनेक खाजगी संस्थांनी व व्यक्तींनी कुठे पैशांची तर कुठे मशीन उपलब्ध करून मदत दिली. सरकार आणि खासगी संस्थांनी ही मदत आपापल्या नियमानुसार त्यांनी स्वत: निवडलेल्या गावांना पोहोचवली. म्हणजे फंडिंगची कोणतीही हमी नसतानाही गावांनी प्रचंड प्रमाणात स्पर्धेत भाग घेतला, श्रमदान केले यामुळे अनेक गावे आता पाणीदार झाली आहेत. या प्रयत्नातून काही गोष्टी सिद्ध झाल्या आहेत, ज्यातून आपण काही निष्कर्ष काढू शकतो.पहिला निष्कर्ष- ग्रामीण जनता आपल्या दोन हाताने काम करून आपले जीवन घडवायला तयार आहे. एकदा का त्यांचा निश्चय पक्का झाला की मग ते काम पूर्णत्वाकडे नेतीलच.दुसरा निष्कर्ष- लोकांना कामासाठी तयार करण्यासाठी आपण पूर्ण भर हा फक्त कामावर देणे खूप गरजेचे आहे. ‘तोंड बंद काम चालू’ हे ब्रीदवाक्य महत्त्वाचे आहे. तिसरा निष्कर्ष- पाण्याचे काम असो किंवा इत्तर कोणतेही रचनात्मक काम असो त्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळाल्यास, लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. लोकांतच काम करण्यासाठी एक नेतृत्व तयार होते.चौथा निष्कर्ष- आपल्या देशात दातृत्व जिवंत आहे. स्पर्धेच्या काळात अनेक स्वयंसेवी संस्थांनी व व्यक्तींनी सढळ हस्ते स्पर्धक गावांना थेट मदत पोहोचवली. कुठे एस.टी. कर्मचाऱ्यांनी जाऊन गावात दिवसभर श्रमदान केले तर कुठे ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या पेन्शनचे थोडेथोडके पैसेही दिले.थोडक्यात काय तर हे सर्व पाहून ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ टीमला खूप बळ मिळाले आहे. पावसानंतर पुढच्या टप्प्यात हीच स्पर्धा ३० तालुक्यांत घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. लोकांचा सहभाग असाच राहिला तर काही वर्षांतच आपण दुष्काळमुक्त आणि समृद्ध महाराष्ट्र पाहू.

(लेखक प्रसिद्ध दिग्दर्शक असून, पानी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)