शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

परिपक्वतेचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 06:32 IST

सत्ताधाऱ्यांना दुष्काळ नाही, तर हिंदुत्वाचे कार्ड महत्त्वाचे वाटते. ‘सबका साथ, सबका विकास’ हे बोलायला ठीक आहे यावर त्यांचे एकमत झाले आहे. विरोधकांना दुष्काळावर बोलून मते मिळतील असे वाटत नाही. शेतकरी मात्र हतबलतेने सगळे पाहत आहे.

राज्यात २८,५२३ गावांमध्ये भीषण दुष्काळ आहे. धरणांमधला पाणीसाठा एप्रिल महिन्यातच २५ टक्क्यांवर आला आहे. सहा लाख जनावरे चारा छावण्यात आश्रित झाली आहेत. पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ लोकांवर आली आहे. अनेक शहरांमध्ये आठ आठ दिवस पाणी येत नाही. राज्यात नागपूर महसुली विभाग वगळता सर्वत्र टँकर चालू आहेत. खरा दुष्काळ तर मे महिन्यात पाहायला मिळेल.

दुष्काळ दूर करण्याची जबाबदारी असणारे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री मात्र राज्यभर हिंदुत्वाचा पुकारा देत प्रचाराची राळ उडवत गावोगाव फिरत आहेत. ज्यांनी विरोध करायचा, दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरायचे, ते विरोधकही गप्प आहेत. शेतकऱ्यांचे जे व्हायचे ते होवो, आपला मतांचा दुष्काळ कसा दूर होईल याच विवंचनेत सगळे पक्ष आहेत. हे अत्यंत विदारक चित्र आहे. दुष्काळ रोजचाच आहे, निवडणुका जीवन-मरणाचा प्रश्न आहे असे समजून सगळे वागत आहेत. आम्ही शेतकऱ्यांना ४ हजार कोटी दिले; आमची जबाबदारी संपली असे म्हणून सत्ताधारी पळ काढू शकत नाहीत; आणि आम्ही सरकारला कित्येकदा सांगूनही सरकार काहीच करत नाही असे म्हणत विरोधकांचे काम संपत नाही. दुष्काळाच्या विषयावर सगळे एकत्र येऊन पाण्याचा, चाºयाचा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी पुढाकार घेत असल्याचे आश्वासक चित्रही नाही. मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजना आखली, त्याचा प्रचंड गाजावाजा केला, या योजनेमुळे लाखो एकर जमीन पाण्याखाली आल्याचा दावा झाला; मात्र ही योजना जनसहभागातून नाही, तर ठेकेदारांसाठी चालवली गेल्याचा आरोप जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी करत सगळे पितळ उघडे पाडले. आम्ही शेतीचा शाश्वत विकास करू, अशी भाषणे गेल्या पाच वर्षांत बळीराजाने अनेकदा ऐकली; पण त्यादृष्टीने सरकारची पावले पडली नाहीत.

जलसंपदा विभागातर्फे चालू असलेल्या धरणांची कामे पूर्ण करण्यासाठी केलेले नियोजन फसवे ठरले. यापेक्षा अजित पवारांचा कारभार बरा असे जर आता ठेकेदार म्हणत असतील तर या विभागात नेमके काय काम झाले हे शोधणारी श्वेतपत्रिका काढण्याची हिंमत सरकारकडे नाही. शिवसेनेने शेतकºयांचा कैवार घेतल्याचे दाखवले; पण प्रत्यक्षात त्यांनाही दुष्काळापेक्षा हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटल्याने त्यांनी तोच मार्ग पत्करला. आमच्याकडे जलसंपदामंत्र्यांच्या विरोधात गाडीभर पुरावे आहेत असे सांगत राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेनेची ती बैलगाडी पुराव्यानिशी गायब झाली. सत्ताधाऱ्यांची ही अवस्था तर विरोधकांची हतबलता आणखी केविलवाणी. आज जर भाजप-शिवसेना विरोधात असती तर त्यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य डोक्यावर घेतले असते. मंत्र्यांना मतदारसंघात फिरणे मुश्कील केले असते. चालू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमधून सरकारला उत्तरे देता देता नाकीनऊ आले असते एवढा प्रचंड गदारोळ विरोधकांनी घातला असता. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीकडून दुष्काळाच्या प्रश्नावर प्रेसनोट काढणे, पत्रकारांना बाईट देण्यापलीकडे काही होत नाही.

भाजपचे नेते हिंदुत्वाचे कार्ड काढून फिरत आहेत, ‘‘तुम्ही पहिल्यांदा मतदान करणार आहात तर ते पुलवामातील शहिदांसाठी करा,’’ असे भावनिक आवाहन देशाचे पंतप्रधानच करीत आहेत. बळीराजासाठी मतदान करा, असे त्यांनाही म्हणावे वाटले नाही, तेथे त्यांच्या चेल्याचपाट्यांकडून काय अपेक्षा करणार? एकही मंत्री विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक न्यायला तयार नाही, दुष्काळासाठी आम्ही काय केले हे सांगायला तयार नाही, कारण दुष्काळावर केलेली भाषणे मतांमध्ये परावर्तीत होत नाहीत यावर त्यांचा ठाम विश्वास आहे आणि सरकारला दुष्काळावरून कोंडीत पकडल्याने आपल्या मतांची बेगमी होईल असे विरोधकांना वाटत नाही. परिणामी, गावोगावी दुष्काळात होरपळणाºया गरीब शेतकºयांकडे हतबलतेने हे सगळे पाहण्यापलीकडे हाती काही उरलेलेही नाही. सभांना गेले की पैसे मिळतात, रात्रीची जेवणाची सोय होते, एक दिवस पुढे ढकलल्याचे समाधान घेऊन तो दुसºया दिवसाची चिंता करत निरभ्र आकाशाकडे पाहत झोपी जातो आहे. हे चित्र सगळी व्यवस्थाच हतबल झाल्याचे द्योतक आहे.