शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

परिपक्वतेचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 06:32 IST

सत्ताधाऱ्यांना दुष्काळ नाही, तर हिंदुत्वाचे कार्ड महत्त्वाचे वाटते. ‘सबका साथ, सबका विकास’ हे बोलायला ठीक आहे यावर त्यांचे एकमत झाले आहे. विरोधकांना दुष्काळावर बोलून मते मिळतील असे वाटत नाही. शेतकरी मात्र हतबलतेने सगळे पाहत आहे.

राज्यात २८,५२३ गावांमध्ये भीषण दुष्काळ आहे. धरणांमधला पाणीसाठा एप्रिल महिन्यातच २५ टक्क्यांवर आला आहे. सहा लाख जनावरे चारा छावण्यात आश्रित झाली आहेत. पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ लोकांवर आली आहे. अनेक शहरांमध्ये आठ आठ दिवस पाणी येत नाही. राज्यात नागपूर महसुली विभाग वगळता सर्वत्र टँकर चालू आहेत. खरा दुष्काळ तर मे महिन्यात पाहायला मिळेल.

दुष्काळ दूर करण्याची जबाबदारी असणारे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री मात्र राज्यभर हिंदुत्वाचा पुकारा देत प्रचाराची राळ उडवत गावोगाव फिरत आहेत. ज्यांनी विरोध करायचा, दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरायचे, ते विरोधकही गप्प आहेत. शेतकऱ्यांचे जे व्हायचे ते होवो, आपला मतांचा दुष्काळ कसा दूर होईल याच विवंचनेत सगळे पक्ष आहेत. हे अत्यंत विदारक चित्र आहे. दुष्काळ रोजचाच आहे, निवडणुका जीवन-मरणाचा प्रश्न आहे असे समजून सगळे वागत आहेत. आम्ही शेतकऱ्यांना ४ हजार कोटी दिले; आमची जबाबदारी संपली असे म्हणून सत्ताधारी पळ काढू शकत नाहीत; आणि आम्ही सरकारला कित्येकदा सांगूनही सरकार काहीच करत नाही असे म्हणत विरोधकांचे काम संपत नाही. दुष्काळाच्या विषयावर सगळे एकत्र येऊन पाण्याचा, चाºयाचा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी पुढाकार घेत असल्याचे आश्वासक चित्रही नाही. मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजना आखली, त्याचा प्रचंड गाजावाजा केला, या योजनेमुळे लाखो एकर जमीन पाण्याखाली आल्याचा दावा झाला; मात्र ही योजना जनसहभागातून नाही, तर ठेकेदारांसाठी चालवली गेल्याचा आरोप जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी करत सगळे पितळ उघडे पाडले. आम्ही शेतीचा शाश्वत विकास करू, अशी भाषणे गेल्या पाच वर्षांत बळीराजाने अनेकदा ऐकली; पण त्यादृष्टीने सरकारची पावले पडली नाहीत.

जलसंपदा विभागातर्फे चालू असलेल्या धरणांची कामे पूर्ण करण्यासाठी केलेले नियोजन फसवे ठरले. यापेक्षा अजित पवारांचा कारभार बरा असे जर आता ठेकेदार म्हणत असतील तर या विभागात नेमके काय काम झाले हे शोधणारी श्वेतपत्रिका काढण्याची हिंमत सरकारकडे नाही. शिवसेनेने शेतकºयांचा कैवार घेतल्याचे दाखवले; पण प्रत्यक्षात त्यांनाही दुष्काळापेक्षा हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटल्याने त्यांनी तोच मार्ग पत्करला. आमच्याकडे जलसंपदामंत्र्यांच्या विरोधात गाडीभर पुरावे आहेत असे सांगत राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेनेची ती बैलगाडी पुराव्यानिशी गायब झाली. सत्ताधाऱ्यांची ही अवस्था तर विरोधकांची हतबलता आणखी केविलवाणी. आज जर भाजप-शिवसेना विरोधात असती तर त्यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य डोक्यावर घेतले असते. मंत्र्यांना मतदारसंघात फिरणे मुश्कील केले असते. चालू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमधून सरकारला उत्तरे देता देता नाकीनऊ आले असते एवढा प्रचंड गदारोळ विरोधकांनी घातला असता. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीकडून दुष्काळाच्या प्रश्नावर प्रेसनोट काढणे, पत्रकारांना बाईट देण्यापलीकडे काही होत नाही.

भाजपचे नेते हिंदुत्वाचे कार्ड काढून फिरत आहेत, ‘‘तुम्ही पहिल्यांदा मतदान करणार आहात तर ते पुलवामातील शहिदांसाठी करा,’’ असे भावनिक आवाहन देशाचे पंतप्रधानच करीत आहेत. बळीराजासाठी मतदान करा, असे त्यांनाही म्हणावे वाटले नाही, तेथे त्यांच्या चेल्याचपाट्यांकडून काय अपेक्षा करणार? एकही मंत्री विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक न्यायला तयार नाही, दुष्काळासाठी आम्ही काय केले हे सांगायला तयार नाही, कारण दुष्काळावर केलेली भाषणे मतांमध्ये परावर्तीत होत नाहीत यावर त्यांचा ठाम विश्वास आहे आणि सरकारला दुष्काळावरून कोंडीत पकडल्याने आपल्या मतांची बेगमी होईल असे विरोधकांना वाटत नाही. परिणामी, गावोगावी दुष्काळात होरपळणाºया गरीब शेतकºयांकडे हतबलतेने हे सगळे पाहण्यापलीकडे हाती काही उरलेलेही नाही. सभांना गेले की पैसे मिळतात, रात्रीची जेवणाची सोय होते, एक दिवस पुढे ढकलल्याचे समाधान घेऊन तो दुसºया दिवसाची चिंता करत निरभ्र आकाशाकडे पाहत झोपी जातो आहे. हे चित्र सगळी व्यवस्थाच हतबल झाल्याचे द्योतक आहे.