शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीशी लग्न?- नको! ‘लिव्ह इन’च उत्तम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2024 07:48 IST

कामातलं सातत्य, तीच कंपनी, असं लग्नासारखं नातं न ठेवता, वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे अनुभव असं ‘लिव्ह-इन रिलेशन’ हे तरुणांना मान्य आहे!

- डॉ. भूषण केळकर

‘लिन्क्डइन’चा ताजा अहवाल सांगतो, की सध्या भारतामधील दहापैकी नऊ कर्मचारी सध्या असलेली नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत. विशेषतः रशिया-युक्रेन युद्ध, मध्यपूर्वेतील चिघळलेली स्थिती आणि आयटीमध्ये कोविडच्या काळात झालेली अधिक भरती या पार्श्वभूमीवर हे निरीक्षण थोडं आश्चर्यजनक आहे खरं!!

परंतु एक नक्की : आताचा मध्यमवर्ग ‘वर्क लाइफ बॅलन्स’ला पगारापेक्षा जास्त महत्त्व देतो. ३७% लोक हे पगारवाढ या मुद्द्याने, तर ४२ टक्के लोक वर्क लाइफ बॅलन्स/कामाचं ठिकाण आणि एकूण तासांमधली लवचीकता या कारणाने नोकरी बदलू पाहत आहेत!! अगदी आता-आतापर्यंत, केवळ दहा-वीस टक्के जास्त पगारासाठी अनेक वेळा नोकरी बदलली जात होती, पण गेल्या काही वर्षांत मध्यम वर्ग विस्तारला आहे. IT मधीलच नव्हे तर ITeS आणि अन्य क्षेत्रातही वृद्धी झाल्याने लोकांच्या हातात खर्चण्यासाठी अधिक पैसा उपलब्ध आहे आणि त्यामुळे पगार किंवा मोबदला ही गोष्ट महत्त्वाची असली तरी ‘सर्वांत महत्त्वाची’ उरली नाही आणि मध्यमवर्ग विस्तारून ‘उच्चमध्यम वर्ग’ नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढला आहे, हे वास्तव आहे!

मासलो (Maslow) या तज्ञाने गरजांची उतरंड मांडली त्यामध्ये अन्न-वस्त्र-निवारा या भौतिक गरजा प्राथमिक होत्या (आता त्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी पण आली आहे, हा गमतीचा मुद्दा सोडा!). त्या उतरंडीत एकूण पाच पायऱ्या आहेत, त्यातील दुसरी गरज आहे सुरक्षितता. उच्च मध्यमवर्गीयांच्या या दोन्ही पातळ्या सहज पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी पातळी म्हणजे कौटुंबिक-सामाजिक गरजा आणि चौथी पातळी म्हणजे सेल्फ एस्टीम किंवा स्वतःचा हुंकार, यांचा विचार आता उच्च मध्यमवर्गीय अधिक करतो आहे. उत्पन्नाबरोबर आनंद आणि समाधान हे नक्कीच वाढत जातं, परंतु एका बिंदूपर्यंतच! त्या बिंदूच्या पुढे उत्पन्न वाढलं तरी समाधानामध्ये फारसा फरक पडत नाही! हीच स्थिती उच्च मध्यमवर्गीयांची आलेली आहे! आयुष्यातील सुख आणि समाधान हे पैशापलीकडे असतं, याची वाढती जाणीव ही या बदलाच्या गाभ्याशी असलेली महत्त्वाची गोष्ट!

सध्याचा जमाना हा गिग इकॉनॉमीचा  आहे. म्हणजे एखादी कंपनी, त्याचा ब्रँड, त्याच्याबद्दलचं ममत्व किंवा लॉयल्टी यासाठी काम करण्याचे दिवस खरं तर केव्हाच संपले. नवे तरुण कर्मचारी आता प्रकल्प किंवा प्रोजेक्ट बेस्ड आणि अस्थायी स्वरूपाचं (टेम्पररी) काम  करणार आहेत. सध्या सोशल मीडियामुळे अनेक लोकांना ते नोकरी शोधत नसले तरीसुद्धा आपणहून नोकरी बदलाबाबत विचारणा होत आहे. याला ‘करिअरप्रेन्यूअर’ अशी संज्ञा सुद्धा नव्याने प्रचलित झाली आहे.या पुढील घटक जो याच्यामध्ये महत्त्वाचा आहे तो म्हणजे नवीन शिकलेलं कौशल्य किती काळ उपयुक्त राहील याचा काळ.

‘हाफ लाइफ’ ही संज्ञा हे सांगते की, गोष्ट अर्धी होण्यासाठी किती वेळ लागेल. ‘डेलोइट’ या प्रख्यात कंपनीचा अभ्यास असा सांगतो की, आजच्या नवीन शिकलेल्या कौशल्याचं हाफ लाइफ हे पाच वर्षांपेक्षाही कमी आहे ! म्हणजे जे तुम्ही आज नव्याने म्हणून शिकाल ते अजून पंधरा वर्षांमध्येच रद्दबातल असेल आणि म्हणजेच नवनवीन शिकत राहणं हा एकमेव उपाय यापुढच्या काळामध्ये कामात टिकण्यासाठी शिल्लक राहील. या वास्तवाची उत्तम जाणीव चांगलीच विस्तारत चालल्यामुळेही वेगवेगळ्या ठिकाणी अनुभव घेणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभव घेणं याकडे कल वाढत आहे!! 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंडस्ट्री ४.० याच्यामुळे विशेषतः ChatGPT सारख्या तंत्रज्ञानामुळे, एकजिनसी काम जे होतं ते आता यंत्र किंवा तंत्रज्ञान करत आहे.  तोच तोपणाबद्दलचा कंटाळाही वाढला आहे कारण यंत्र बरीच कामं करू लागली आहेत, आणि म्हणूनही ‘कुछ हटके’ शोधण्याकडे कल वाढतोय. एकूणच काय तर ‘पैशासाठी नोकरी’ करण्यापेक्षा ‘अनुभव समृद्धीसाठी’ काम करणं याकडे लोकांचा कल वाढत आहे. कंपनी मधील ‘वर्क कल्चर’ हा भाग महत्त्वाचा होत चालला आहे हे नक्की! आपल्याला आयुष्यात नक्की काय हवं आहे, याबाबत विचार करण्याची रीत आणि या प्रश्नाच्या उत्तरांचे पर्याय, असं सारंच बदलताना दिसतं आहे. तरुण पिढीमध्ये वेगाने नोकरी बदलण्याचा ताजा ट्रेण्ड या नव्या शोधाचाच निदर्शक आहे, असं नक्कीच म्हणता येऊ शकेल.

काही प्रमाणामध्ये ‘जेन झी’ किंवा ‘जेन अल्फा’ यांचं ‘इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन’ हे मानसशास्त्रीय मुद्देसुद्धा महत्त्वाचे ठरतात. ‘आय वॉन्ट टू लिव्ह लाइफ’ या तत्त्वांनी जगणारी नवीन पिढी उदयाला आलेली आहे! कोविडच्या काळामध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ची सवलत, त्यासाठीची अत्यावश्यक लवचिकता देण्यात आली होती ती तरुण लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली. भारतात  उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही आता पूर्वीइतकी दुर्मीळ गोष्ट उरलेली नाही. हेच बघा ना, भारतात एकूण टूथब्रश जेवढे विकले जातात त्यापेक्षा जास्ती मोबाइल फोन्स विकले जातात! कामातलं सातत्य, तीच कंपनी, असं लग्नासारख नातं न ठेवता, वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे अनुभव असं ‘लिव्ह-इन रिलेशन’ हे आता सहज मान्य तर झालं आहेच पण त्याचं प्रमाण वाढतं आहे. ‘न्यू नॉर्मल’ जे म्हणतात, ते हेच!

टॅग्स :jobनोकरी