शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

बाजारात तुरी...

By admin | Updated: February 17, 2016 02:45 IST

स्वतंत्र विदर्भाच्या चर्चेला जोर आलेला असताना मराठवाडाही स्वतंत्र राज्य करावे असा नेहमीप्रमाणे क्षीण आवाज कुठून तरी आला आणि तो हवेतही विरला.

स्वतंत्र विदर्भाच्या चर्चेला जोर आलेला असताना मराठवाडाही स्वतंत्र राज्य करावे असा नेहमीप्रमाणे क्षीण आवाज कुठून तरी आला आणि तो हवेतही विरला. परवा माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह रावांचे स्वीय सचिव पी.व्ही.आर.के. प्रसाद यांनीसुद्धा मराठवाडा स्वतंत्र राज्य असावे असा मुद्दा मांडला होता. एक राज्य म्हणून मराठवाडा आपल्या आर्थिक हिमतीवर उभा राहू शकेल काय हासुद्धा चर्चेचा मुद्दा आहे. कारण विदर्भाप्रमाणे मराठवाड्याकडे खनिज संपत्ती नाही. शेतीची अवस्था वाईट आणि उद्योगाचे रडगाणे तर सर्वत्र. पण मुद्दा असा की, गेल्या दहा वर्षांपासून गाजत असलेला मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तालयाच्या विभाजनाचा मुद्दाच अजून निकालात निघालेला नाही. तेव्हा स्वतंत्र राज्याची चर्चा हास्यास्पद ठरते. हे मुख्यालय नांदेड की लातूर अशी रस्सीखेच अजूनही संपलेली नाही. येथे मराठवाड्याची अस्मिता लोप पावली आणि राजकीय बलाबल आणि राजकीय सुभा असा वाद पुढे आला. यात हडेलहप्पीही पाहायला मिळाली आणि हे सर्व प्रकरण थंडबस्त्यात गेले. आता त्यावर एक मेपर्यंत निर्णय घेऊ असे सरकार म्हणते; पण येथेही राजकीय सोय पाहिली जाईल.२०११ साली जनगणना झाली त्यावेळी मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख होती आणि आता ती दोन कोटी निश्चित असणार. या लोकसंख्येसाठी आवश्यक असलेली पायाभूत सेवा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात विकास पूर्ण झालेला नाही. दळणवळणाच्या क्षेत्रात वेगळी अवस्था नाही. जमिनीच्या तंट्यांचा प्रश्न निकाली काढायचा म्हटले तर मराठवाड्यात असे ८८८२ तंटे महसूल खात्याकडे पडून आहेत. शेतकरी खेट्या घालतात; पण ‘तारीख पे तारीख’ चालू आहे. सुनावणी रखडली आहे. बाकी विकासाच्या गप्पांना कमी नाही. तोंडी लावायला ‘स्मार्ट सिटी’सारखे विषय आहेतच; पण वास्तव मात्र भयानक आहे. अशा परिस्थितीत एक मेपूर्वी सरकारला निर्णय घ्यायचा आहे. हे नवे विभागीय आयुक्तालय कोठे व्हावे यासाठी विलासराव-अशोकराव यांच्यातील राजकीय साठमारी आपण अनुभवली. विलासरावांनी लातूरची घोषणा केली आणि तेथे इमारतही सुसज्ज करून ठेवली. नंतर अशोकरावांनी ते नांदेडला पळविण्याचा घाट घातला. मध्येच परभणीकरांची टूम निघाली. यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने आक्षेप घेण्याचे सुचविले. आक्षेप मागविले आणि सरकारने अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांची एकसदस्यीय समिती स्थापन केली. दांगट यांनी आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. आता सरकार घोषणा करणार काय हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाला बगल देण्यासाठी नवाच मुद्दा पुढे आला, तो नांदेड आणि बीड या दोन जिल्ह्यांचे विभाजन करून किनवट आणि अंबाजोगाई या दोन जिल्ह्यांची निर्मिती करणे. प्रशासकीय सोयीसाठी अशा नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली तर प्रशासकीय यंत्रणा वाढवावी लागेल. त्याच वेळी दोन जिल्ह्यांचे महसुली क्षेत्र कमी होणार आणि महसुली उत्पन्न घटणार. म्हणजे खर्चच वाढणार आहे. ही चर्चा जोर धरीत असतानाच गेल्या महिन्यात प्रधान सचिवांची एक बैठक होऊन जिल्हा विभाजनाचा विषय स्थगित करण्याचा निर्णय झाला, म्हणजे वेगळे विभागीय आयुक्तालय आणि जिल्हा विभाजन हे दोन्ही विषय फाईल बंद झाले.कोणतेही सरकार हे प्रशासनासाठी सोयीचे काय एवढा शुद्ध हेतू ठेवून राज्यकारभार करीत नसते. एखाद्या निर्णयाचा राजकीय लाभ कसा मिळेल याचाच विचार सत्ताधारी पक्ष करतो. दांगट समितीचा अहवाल सरकार स्वीकारणार का हा सध्या कळीचा मुद्दा असला तरी राजकीय प्रभावाचा विचार करता भाजपाला लातूर जिल्ह्यात बस्तान बसविण्यास सोपे दिसते. एक खासदार, एक आमदार येथे आहे. नांदेडचा गड अजून अशोक चव्हाणांनी टिकवून ठेवला आहे. शिवाय या जिल्ह्यात शिवसेनेचा प्रभाव आहे. त्रिकोणाच्या चौथ्या कोनात फडणवीस सरकार कोणता निर्णय घेईल हे अजून दूर असले तरी नव्या विभागीय आयुक्तालयाची गोष्ट अजून तरी ‘बाजारात तुरी’ सारखी आहे.- सुधीर महाजन