शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठीचा गौरव

By admin | Updated: February 9, 2015 01:36 IST

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाला आणि अवघ्या महाराष्ट्रातून जी आनंदाची लाट निर्माण झाली तिला सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाला आणि अवघ्या महाराष्ट्रातून जी आनंदाची लाट निर्माण झाली तिला सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. एखाद्या सर्वश्रेष्ठ साहित्य पुरस्काराचा आनंद साहित्य, लेखन या प्रक्रियेशी फारसा संबंध नसणाऱ्या मराठी माणसांनीही मनमुराद उपभोगावा हे नेमाडे यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्यानंतर सर्वांनाच अनुभवायला मिळाले. मराठी मनाचे सांस्कृतिक एकजीनसीपण समोर आणणाऱ्या फारच थोड्या घटना इतिहासात घडलेल्या आहेत. ज्ञानपीठ हे निमित्त घडले नसते तरी भालचंद्र नेमाडे हा मराठी अस्मितेचा मानबिंदू कायम राहिला असताच. नेमाडे मानतात त्याप्रमाणे साहित्य लेखन ही सांस्कृतिक हस्तक्षेपाची, जबाबदारीने करावयाची कृती आहे. समाजसंस्कृती, जगणं आणि लेखन या तीनही घटकांच्या अभिन्नत्वाचा पुरस्कार नेमाडेंनी वारंवार केला आहे. देशीयतेचा पुरस्कार करताना, देशी याचा अर्थ त्या-त्या भूमीशी जोडलेले असणे, प्रत्येक मानवी समूहाची आपली स्वत:ची संस्कृती असणे, माणसाला किंवा साहित्याला आपल्या भूमीवरच, आपल्या भाषिक समूहातच डौलाने उभे राहता येते, अशी किती तरी विधाने नेमाडे यांनी केलेली आहेत. पण त्यासोबत, बाहेरील प्रभाव आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला देशीकरण म्हणतात, असंही ते म्हणतात. यातून देशीवादाची व्याप्ती लक्षात येते. नेमाडेंनी त्यांचा देशीवाद बहुजन जाणिवेच्या अंगाने मांडून मराठी समीक्षेला एक नवा आयाम दिला आहे. एकोणीसशे पंचाऐंशीनंतरची मराठी साहित्य समीक्षा सतत नेमाड्यांच्या लेखनाभोवती फिरत राहिली आहे. हे त्यांच्या टोकाच्या टीकाकारांनाही मान्य करावे लागते. सर्जनात्मक, समीक्षणात्मक आणि वैचारिक लेखनाच्या पातळीवर नेमाडे हे कोणाला इच्छा असूनही टाळता न येणारे अपरिहार्य लेखक आहेत. भालचंद्र नेमाडे यांचा साहित्य लेखनाचा अर्धशतकाचा प्रवास पूर्ण झाला आहे. कोसला (१९६३) ते हिंदू (२०११) अशा या प्रदीर्घ कालखंडाच्या पोटात नेमाडे यांची समीक्षा, कादंबरी लेखन, कविता, संशोधनात्मक लेखन, संपादने असा पसारा पांगलेला आहे. एखाद्या लेखकाचा अतिशय परिपक्व असा अर्धशतकाचा एवढा लक्षवेधी आणि पृथगात्म प्रवास अपवादालाच पाहायला मिळतो. त्यांच्या लेखनाने या समग्र काळाला कवेत घेऊन प्रभावित केले आहे. अनुभवाला आणि भाषेला थेटपणानं भिडण्यापासून, आपल्या मुळांचा शोध घेणं ही प्रक्रिया लेखनाच्या पातळीवर स्वत:सह, आपल्या भूतभविष्यवर्तमानासह उत्खनन करून समोर ठेवणे, हे नेमाड्यांनी त्यांच्यानंतर येणाऱ्या समग्र लेखक कलावंतांसाठी करून ठेवलेले मोठे ऐतिहासिक काम आहे. दु:खाचा अंकुश असो सदा मनावर, चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोटं असोत, लक्षात राहात नाहीत बिचारी, असं म्हणणारा हा थोर लेखक ज्ञानपीठाचा भरीव आनंद मनात साठवूनही म्हणूनच कोणत्याही पुरस्काराच्या चौकटीत तोलता येत नाही. या चौकटीला समृद्ध करून मराठी मनाला आणि एकूणच बिनचेहऱ्याला त्याची ओळख करून देणारा हा सांगवीचा पांडुरंग कधीचाच चिरंजीव झाला आहे.