शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

मराठीचा गौरव

By admin | Updated: February 9, 2015 01:36 IST

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाला आणि अवघ्या महाराष्ट्रातून जी आनंदाची लाट निर्माण झाली तिला सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाला आणि अवघ्या महाराष्ट्रातून जी आनंदाची लाट निर्माण झाली तिला सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. एखाद्या सर्वश्रेष्ठ साहित्य पुरस्काराचा आनंद साहित्य, लेखन या प्रक्रियेशी फारसा संबंध नसणाऱ्या मराठी माणसांनीही मनमुराद उपभोगावा हे नेमाडे यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्यानंतर सर्वांनाच अनुभवायला मिळाले. मराठी मनाचे सांस्कृतिक एकजीनसीपण समोर आणणाऱ्या फारच थोड्या घटना इतिहासात घडलेल्या आहेत. ज्ञानपीठ हे निमित्त घडले नसते तरी भालचंद्र नेमाडे हा मराठी अस्मितेचा मानबिंदू कायम राहिला असताच. नेमाडे मानतात त्याप्रमाणे साहित्य लेखन ही सांस्कृतिक हस्तक्षेपाची, जबाबदारीने करावयाची कृती आहे. समाजसंस्कृती, जगणं आणि लेखन या तीनही घटकांच्या अभिन्नत्वाचा पुरस्कार नेमाडेंनी वारंवार केला आहे. देशीयतेचा पुरस्कार करताना, देशी याचा अर्थ त्या-त्या भूमीशी जोडलेले असणे, प्रत्येक मानवी समूहाची आपली स्वत:ची संस्कृती असणे, माणसाला किंवा साहित्याला आपल्या भूमीवरच, आपल्या भाषिक समूहातच डौलाने उभे राहता येते, अशी किती तरी विधाने नेमाडे यांनी केलेली आहेत. पण त्यासोबत, बाहेरील प्रभाव आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला देशीकरण म्हणतात, असंही ते म्हणतात. यातून देशीवादाची व्याप्ती लक्षात येते. नेमाडेंनी त्यांचा देशीवाद बहुजन जाणिवेच्या अंगाने मांडून मराठी समीक्षेला एक नवा आयाम दिला आहे. एकोणीसशे पंचाऐंशीनंतरची मराठी साहित्य समीक्षा सतत नेमाड्यांच्या लेखनाभोवती फिरत राहिली आहे. हे त्यांच्या टोकाच्या टीकाकारांनाही मान्य करावे लागते. सर्जनात्मक, समीक्षणात्मक आणि वैचारिक लेखनाच्या पातळीवर नेमाडे हे कोणाला इच्छा असूनही टाळता न येणारे अपरिहार्य लेखक आहेत. भालचंद्र नेमाडे यांचा साहित्य लेखनाचा अर्धशतकाचा प्रवास पूर्ण झाला आहे. कोसला (१९६३) ते हिंदू (२०११) अशा या प्रदीर्घ कालखंडाच्या पोटात नेमाडे यांची समीक्षा, कादंबरी लेखन, कविता, संशोधनात्मक लेखन, संपादने असा पसारा पांगलेला आहे. एखाद्या लेखकाचा अतिशय परिपक्व असा अर्धशतकाचा एवढा लक्षवेधी आणि पृथगात्म प्रवास अपवादालाच पाहायला मिळतो. त्यांच्या लेखनाने या समग्र काळाला कवेत घेऊन प्रभावित केले आहे. अनुभवाला आणि भाषेला थेटपणानं भिडण्यापासून, आपल्या मुळांचा शोध घेणं ही प्रक्रिया लेखनाच्या पातळीवर स्वत:सह, आपल्या भूतभविष्यवर्तमानासह उत्खनन करून समोर ठेवणे, हे नेमाड्यांनी त्यांच्यानंतर येणाऱ्या समग्र लेखक कलावंतांसाठी करून ठेवलेले मोठे ऐतिहासिक काम आहे. दु:खाचा अंकुश असो सदा मनावर, चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोटं असोत, लक्षात राहात नाहीत बिचारी, असं म्हणणारा हा थोर लेखक ज्ञानपीठाचा भरीव आनंद मनात साठवूनही म्हणूनच कोणत्याही पुरस्काराच्या चौकटीत तोलता येत नाही. या चौकटीला समृद्ध करून मराठी मनाला आणि एकूणच बिनचेहऱ्याला त्याची ओळख करून देणारा हा सांगवीचा पांडुरंग कधीचाच चिरंजीव झाला आहे.