शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी मास्तरांच्या शाळेत अखेर नितीशकुमार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 03:00 IST

बिहारी जनमताचा राजरोस अपमान करीत अखेर संधिसाधू नितीशकुमार मोदी गुरुजींच्या शाळेत दाखल झालेत.

सुरेश भटेवरा(राजकीय संपादक, लोकमत)बिहारी जनमताचा राजरोस अपमान करीत अखेर संधिसाधू नितीशकुमार मोदी गुरुजींच्या शाळेत दाखल झालेत. सर्जिकल स्ट्राइक्स व नोटाबंदीचे मानभावीपणे स्वागत केल्यानंतर, विरोधकांची एकजूट फाट्यावर मारीत ज्याप्रकारे रामनाथ कोविंदांना राष्ट्रपतिपदासाठी त्यांनी पाठिंबा दिला, तेव्हा विश्वासघाताचा प्रयोग आज ना उद्या नितीशकुमार हमखास करणार याचा अंदाज राजकीय जाणकारांना आलाच होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला याच स्तंभामधे प्रस्तुत लेखकाने हे भाकीत नमूदही केले होते. प्रत्यक्षात घडलेही तसेच.सत्तेचा आश्रय शोधताना तथाकथित नैतिकतेचा आव आणीत नितीशकुमारांनी आपला डाव साधला. मुखवट्याआडचा चेहरा लपवण्यासाठी निमित्त केले पदत्याग न करणाºया तेजस्वी यादवांचे. खरं तर या कारस्थानी नाटकाची स्क्रिप्ट काही महिन्यांपूर्वी नितीशकुमारांच्या सहकार्यानेच दिल्लीत लिहिली गेली होती. के.सी. त्यागींसारखे शिलेदार भाजपबरोबरचा सत्तेतला पूर्वकाळ अधिक सुखाचा होता, अशी सूचक विधाने करीत, या नाटकाची पार्श्वभूमी तयार करीत होते. सत्तेसाठी लाचारी पत्करीत थेट भाजपच्या गोटात शिरलो तर आपल्या प्रतिमेला तडा जाईल, याचा अंदाज नितीशकुमारांना होता. बिहारच्या महाआघाडीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना एक निमित्त हवे होते. मग लालूप्रसाद व कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांचा भडिमार करीत त्यांना टार्गेट करण्याचे कारस्थान शिजले. भाजपच्या सुशीलकुमार मोदींना कागदपत्रांचा जो दारुगोळा त्यासाठी पुरवला गेला त्यात बिहार सरकारने मोठी भूमिका बजावल्याचा आरोप आता उघडपणे होतो आहे. नाटकाच्या संहितेनुसार नितीशकुमारांच्या राजीनाम्याचा मुहूर्त ठरला तेव्हा पुढची जय्यत तयारी अगोदरच करण्यात आली होती. राजीनामा दिल्यापासून १५ तासांच्या आत नितीशकुमारांनी भाजपच्या पूर्वीच्याच भिडूंना सोबत घेऊन पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.सत्तेच्या राजकारणात झटपट यू टर्न घेण्याबाबत नितीशकुमार किती वाक्बगार आहेत, याचा एक किस्सा या निमित्ताने आठवला. बिहारमधे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नितीशकुमारांच्या जद (यू)ने सपाटून मार खाल्ला. यानंतर जद (यू)चे दोन डझनांहून अधिक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत ही माहिती नितीशकुमारांना समजली. सत्ता आपल्या हातून निसटते आहे, याची जाणीव होताच नितीशकुमारांनी तासभर एका खोलीत स्वत:ला बंदिस्त केले. आपले कट्टर राजकीय विरोधक लालूप्रसादांशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधला व म्हणाले, ‘हम बहुत अकेला महसूस कर रहे है, साथ आ जाईये नां!’ नितीशकुमारांच्या संभाषणाचा राजकीय गर्भितार्थ लालूंना लगेच समजला. दोघांमधे नियमित संवाद त्यानंतर सुरू झाला. त्यातूनच पुढे बिहारच्या महाआघाडीचा जन्म झाला. मोदींच्या देशव्यापी दिग्विजयानंतर याच महाआघाडीने बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला सपशेल भुईसपाट केले. मोदींच्या विरोधात बिहारी जनतेने दिलेला हा निर्णायक कौल होता. देशात विरोधकांसाठी तो आदर्श ठरला. नितीशकुमारांनी मात्र अवघ्या २० महिन्यात या जनादेशाचा अपमान करीत, पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याच्या या प्रयोगात आपली राजकीय विश्वासार्हता मात्र नितीशकुमार कायमची गमावून बसले आहेत. मोदींचे विरोधक त्यांना थेट पंतप्रधानपदाचे दावेदार मानत होते, आता त्याच मोदींचे मांडलिक त्व पत्करून भाजपच्या मांडवात भयग्रस्त व लाचार मुख्यमंत्र्यांच्या रांगेत त्यांना बसावे लागेल. दोन वर्षानंतर पुन्हा लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर आजच्या प्रतिष्ठेने मोदी नितीशकुमारांना वागवतील, याची खात्री कोण देणार? देशाच्या राजकारणात पंतप्रधान मोदींची लोकप्रियता खरोखर दुथडी भरून सर्वत्र वाहात असती तर नितीशकुमारांसाठी लाल गालिचा अंथरून भाजपने त्यांच्यापुढे सत्तेच्या पायघड्या घातल्या नसत्या. गेल्या तीन वर्षात मोदींनी बºयाच निवडणुका जिंकल्या. ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत विरोधी पक्षाची माणसे फोडली. जागोजागी भाजपची सत्ता प्रस्थापित केली. जिथे हा प्रयोग शक्य झाला नाही, तिथे सरकारी यंत्रणांचा धाकदपटशा दाखवला. सूडबुध्दीने धाडी घालून विरोधकांना बदनाम केले. याच काळात भाजपशासित राज्यांमध्ये भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले, त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई करण्याचे सरकारने टाळले. वृत्तवाहिन्यांपासून प्रसारमाध्यमांपर्यंत आज सर्वत्र दहशतीचा माहोल आहे. गोरक्षकांच्या हिंसक जमावाने जिवंत माणसे मारण्याचे प्रयोग चालवले आहेत. बेलगाम व्यवस्था अन् सरकारला विरोध करणाºयांचे आवाज दडपून त्यांना देशद्रोही ठरवण्याचा घाट घातला जातोय.भारताच्या सर्व सीमांवर सध्या तणाव आहे. आत्महत्येचा मार्ग पत्करलेले शेतकरी, विद्यार्थी, दलित, मुस्लीम सारेच समुदाय बेचैन आहेत. कमालीचा असंतोष जनतेत धुमसतो आहे. दोन वर्षात याचे महाकाय लाटेत रूपांतर होऊ शकेल. काल्पनिक आशेपोटी दगडाला शेंदूर लावून देवत्व जरूर बहाल करता येते, मात्र हा देव खोटा आहे असे एकदा सिध्द झाले तर असंतोषाच्या लाटांमधे दगडावरचा शेंदूर उतरायला वेळ लागत नाही. पर्यायी नेतृत्व कोण? हा विषयही अशावेळी गौण ठरतो. कोट्यवधींच्या देशात सक्षम नेतृत्वाचा तोटा थोडाच आहे? नितीशकुमारांना हे वास्तव यथावकाश समजेलच.