शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - जे खळांची !

By admin | Updated: March 27, 2017 00:20 IST

कृष्णाने गीता सांगितली. ती आपल्यातल्या अर्जुनाला. आपण कायम किंकर्तव्यमूढ असतो तेव्हा ती वाचावी गीता

कृष्णाने गीता सांगितली. ती आपल्यातल्या अर्जुनाला. आपण कायम किंकर्तव्यमूढ असतो तेव्हा ती वाचावी गीता. सध्याचा कालखंड हा गीता अभ्यासावी असाच आहे. गीतेचा भावानुवाद ज्ञानेश्वरांनी केला. तो करताना ज्ञानदेवांनी गीता फुलवली. पण ज्ञानेश्वर आणि श्रीकृष्ण यात फरक म्हटलाच तर कृतीचा आहे. कृष्ण म्हणतो ‘ततो युद्धाय युज्यस्व’! युद्ध कर ‘हतो वा प्राप्तसी स्वर्गं जित्वा वा मोक्ष्यसे महीम्’। म्हणजे मार किंवा मर । त्याला माणसाच्या अस्तित्वावर शंका आहे. पण ज्ञानेश्वर तसे करीत नाहीत. त्यांचे अमर महाकाव्य ‘पसायदान’ यात ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मीरति वाढो ।। आणि दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्य पाहो ।। म्हणजे ज्ञानदेव जिंकण्यासाठी युद्ध कर म्हणत नाहीत. म्हणजे दृष्ट झाला तरी त्याला जवळ करून त्याची दृष्टता दूर कर, त्याची सत्कार्यात गती वाढव, तिथे मैत्र जिवांचे महत्त्वाचे. म्हणून तर दुरितांमधला अंधकार दूर व्हावा. विश्वाने स्वधर्माचा सूर्य पहावा हा स्वधर्म म्हणजे हिंदू, बौद्ध, शीख, इस्लाम नाही. हा स्वत:चा धर्म जो सूर्य पाहतो. म्हणजे माणसाला मारून तू राजा झालास तर ते राज्य तुला लाभणार नाही. त्यापेक्षा माणसातील माणूसपण जागं करणं महत्त्वाचं आहे ! सर्व संतांचं आयुष्य हे दुरित नष्ट करण्याचं आहे. ज्ञानदेवांनी कुणाही दृष्टाला मारून टाका म्हटलं नाही. माणसातलं वाईटपण दूर करा. माणूस वाईट नसतोच. त्याची एखादी कृती त्याला क्रूर, गुन्हेगार बनवते. तो क्षण टाळायला हवा. हे टाळण्याचं अनुसंधान संत असतात. म्हणून संतांची संगती हवी ! आपण माणसाला बदलू शकत नाही, त्याला आहे तसा सर्व गुणदोषांसकट सांभाळणे, स्वीकारणे, बदलवणे हेच आपल्या हातात. मला याबाबत बिभीषण महत्त्वाचा वाटतो. महाबलाढ्य रावणाशी संयमाने, विचाराने बोलणारा बिभीषण खूप वेगळा वाटतो. समाजात असे खूप बिभीषण असतात. त्यांना रावणांना बदलायचं असतं. पण ते बदलत नाहीत. ते आपलाच शेवट करून घेतात. तो शेवटही साधा नसतो. ती सुरुवातही साधी नसते. ही व्यंकटी सांडणं सोपं नाही. भल्याभल्यांना ते जमत नाही. जमलं नाही म्हणून तर आपल्याकडे रामायण, महाभारत ही केवळ आर्ष महाकाव्य नाहीत तर तो एक वाक्प्रचार आहे. ‘तुला हे महाभारत माहीत नाही’, हे म्हणताना खूप काही घडलेलं असतं. म्हणजे महाभारत वेगळेच, पण ते आयुष्याचे होते. आपण कसे असतो आणि कसे असावे यातील अंतर म्हणजे जगणे असते. हा मधला मजकूर वाचता यायला हवा. आपण म्हणतो खरे की मी असा, तसा पण तुकाराम म्हणतात तसा अनुभव प्रमाण असतो. बघा ना, ज्ञानेश्वरांनी तारुण्याच्या उंबरठ्यावरच जगाचा निरोप घेतला, तुकाराम संसार करीत जगला म्हणजे संसार केला पेक्षा झाला म्हणावा, पण दोघांनी जगाचे तत्त्वज्ञान मांडले. हे तत्त्वज्ञानच पसायदानात सार रूपाने आहे. या ओळीच्या आशेवरच सगळे सुजन माणसं वाईटाचं वाईटपण नष्ट होईलच असं समजून जगत असतात. आपणही या ओवीला सांभाळू या !किशोर पाठक