शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

मनाचिये गुंथी - जे खळांची !

By admin | Updated: March 27, 2017 00:20 IST

कृष्णाने गीता सांगितली. ती आपल्यातल्या अर्जुनाला. आपण कायम किंकर्तव्यमूढ असतो तेव्हा ती वाचावी गीता

कृष्णाने गीता सांगितली. ती आपल्यातल्या अर्जुनाला. आपण कायम किंकर्तव्यमूढ असतो तेव्हा ती वाचावी गीता. सध्याचा कालखंड हा गीता अभ्यासावी असाच आहे. गीतेचा भावानुवाद ज्ञानेश्वरांनी केला. तो करताना ज्ञानदेवांनी गीता फुलवली. पण ज्ञानेश्वर आणि श्रीकृष्ण यात फरक म्हटलाच तर कृतीचा आहे. कृष्ण म्हणतो ‘ततो युद्धाय युज्यस्व’! युद्ध कर ‘हतो वा प्राप्तसी स्वर्गं जित्वा वा मोक्ष्यसे महीम्’। म्हणजे मार किंवा मर । त्याला माणसाच्या अस्तित्वावर शंका आहे. पण ज्ञानेश्वर तसे करीत नाहीत. त्यांचे अमर महाकाव्य ‘पसायदान’ यात ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मीरति वाढो ।। आणि दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्य पाहो ।। म्हणजे ज्ञानदेव जिंकण्यासाठी युद्ध कर म्हणत नाहीत. म्हणजे दृष्ट झाला तरी त्याला जवळ करून त्याची दृष्टता दूर कर, त्याची सत्कार्यात गती वाढव, तिथे मैत्र जिवांचे महत्त्वाचे. म्हणून तर दुरितांमधला अंधकार दूर व्हावा. विश्वाने स्वधर्माचा सूर्य पहावा हा स्वधर्म म्हणजे हिंदू, बौद्ध, शीख, इस्लाम नाही. हा स्वत:चा धर्म जो सूर्य पाहतो. म्हणजे माणसाला मारून तू राजा झालास तर ते राज्य तुला लाभणार नाही. त्यापेक्षा माणसातील माणूसपण जागं करणं महत्त्वाचं आहे ! सर्व संतांचं आयुष्य हे दुरित नष्ट करण्याचं आहे. ज्ञानदेवांनी कुणाही दृष्टाला मारून टाका म्हटलं नाही. माणसातलं वाईटपण दूर करा. माणूस वाईट नसतोच. त्याची एखादी कृती त्याला क्रूर, गुन्हेगार बनवते. तो क्षण टाळायला हवा. हे टाळण्याचं अनुसंधान संत असतात. म्हणून संतांची संगती हवी ! आपण माणसाला बदलू शकत नाही, त्याला आहे तसा सर्व गुणदोषांसकट सांभाळणे, स्वीकारणे, बदलवणे हेच आपल्या हातात. मला याबाबत बिभीषण महत्त्वाचा वाटतो. महाबलाढ्य रावणाशी संयमाने, विचाराने बोलणारा बिभीषण खूप वेगळा वाटतो. समाजात असे खूप बिभीषण असतात. त्यांना रावणांना बदलायचं असतं. पण ते बदलत नाहीत. ते आपलाच शेवट करून घेतात. तो शेवटही साधा नसतो. ती सुरुवातही साधी नसते. ही व्यंकटी सांडणं सोपं नाही. भल्याभल्यांना ते जमत नाही. जमलं नाही म्हणून तर आपल्याकडे रामायण, महाभारत ही केवळ आर्ष महाकाव्य नाहीत तर तो एक वाक्प्रचार आहे. ‘तुला हे महाभारत माहीत नाही’, हे म्हणताना खूप काही घडलेलं असतं. म्हणजे महाभारत वेगळेच, पण ते आयुष्याचे होते. आपण कसे असतो आणि कसे असावे यातील अंतर म्हणजे जगणे असते. हा मधला मजकूर वाचता यायला हवा. आपण म्हणतो खरे की मी असा, तसा पण तुकाराम म्हणतात तसा अनुभव प्रमाण असतो. बघा ना, ज्ञानेश्वरांनी तारुण्याच्या उंबरठ्यावरच जगाचा निरोप घेतला, तुकाराम संसार करीत जगला म्हणजे संसार केला पेक्षा झाला म्हणावा, पण दोघांनी जगाचे तत्त्वज्ञान मांडले. हे तत्त्वज्ञानच पसायदानात सार रूपाने आहे. या ओळीच्या आशेवरच सगळे सुजन माणसं वाईटाचं वाईटपण नष्ट होईलच असं समजून जगत असतात. आपणही या ओवीला सांभाळू या !किशोर पाठक