शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - जे खळांची !

By admin | Updated: March 27, 2017 00:20 IST

कृष्णाने गीता सांगितली. ती आपल्यातल्या अर्जुनाला. आपण कायम किंकर्तव्यमूढ असतो तेव्हा ती वाचावी गीता

कृष्णाने गीता सांगितली. ती आपल्यातल्या अर्जुनाला. आपण कायम किंकर्तव्यमूढ असतो तेव्हा ती वाचावी गीता. सध्याचा कालखंड हा गीता अभ्यासावी असाच आहे. गीतेचा भावानुवाद ज्ञानेश्वरांनी केला. तो करताना ज्ञानदेवांनी गीता फुलवली. पण ज्ञानेश्वर आणि श्रीकृष्ण यात फरक म्हटलाच तर कृतीचा आहे. कृष्ण म्हणतो ‘ततो युद्धाय युज्यस्व’! युद्ध कर ‘हतो वा प्राप्तसी स्वर्गं जित्वा वा मोक्ष्यसे महीम्’। म्हणजे मार किंवा मर । त्याला माणसाच्या अस्तित्वावर शंका आहे. पण ज्ञानेश्वर तसे करीत नाहीत. त्यांचे अमर महाकाव्य ‘पसायदान’ यात ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मीरति वाढो ।। आणि दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्य पाहो ।। म्हणजे ज्ञानदेव जिंकण्यासाठी युद्ध कर म्हणत नाहीत. म्हणजे दृष्ट झाला तरी त्याला जवळ करून त्याची दृष्टता दूर कर, त्याची सत्कार्यात गती वाढव, तिथे मैत्र जिवांचे महत्त्वाचे. म्हणून तर दुरितांमधला अंधकार दूर व्हावा. विश्वाने स्वधर्माचा सूर्य पहावा हा स्वधर्म म्हणजे हिंदू, बौद्ध, शीख, इस्लाम नाही. हा स्वत:चा धर्म जो सूर्य पाहतो. म्हणजे माणसाला मारून तू राजा झालास तर ते राज्य तुला लाभणार नाही. त्यापेक्षा माणसातील माणूसपण जागं करणं महत्त्वाचं आहे ! सर्व संतांचं आयुष्य हे दुरित नष्ट करण्याचं आहे. ज्ञानदेवांनी कुणाही दृष्टाला मारून टाका म्हटलं नाही. माणसातलं वाईटपण दूर करा. माणूस वाईट नसतोच. त्याची एखादी कृती त्याला क्रूर, गुन्हेगार बनवते. तो क्षण टाळायला हवा. हे टाळण्याचं अनुसंधान संत असतात. म्हणून संतांची संगती हवी ! आपण माणसाला बदलू शकत नाही, त्याला आहे तसा सर्व गुणदोषांसकट सांभाळणे, स्वीकारणे, बदलवणे हेच आपल्या हातात. मला याबाबत बिभीषण महत्त्वाचा वाटतो. महाबलाढ्य रावणाशी संयमाने, विचाराने बोलणारा बिभीषण खूप वेगळा वाटतो. समाजात असे खूप बिभीषण असतात. त्यांना रावणांना बदलायचं असतं. पण ते बदलत नाहीत. ते आपलाच शेवट करून घेतात. तो शेवटही साधा नसतो. ती सुरुवातही साधी नसते. ही व्यंकटी सांडणं सोपं नाही. भल्याभल्यांना ते जमत नाही. जमलं नाही म्हणून तर आपल्याकडे रामायण, महाभारत ही केवळ आर्ष महाकाव्य नाहीत तर तो एक वाक्प्रचार आहे. ‘तुला हे महाभारत माहीत नाही’, हे म्हणताना खूप काही घडलेलं असतं. म्हणजे महाभारत वेगळेच, पण ते आयुष्याचे होते. आपण कसे असतो आणि कसे असावे यातील अंतर म्हणजे जगणे असते. हा मधला मजकूर वाचता यायला हवा. आपण म्हणतो खरे की मी असा, तसा पण तुकाराम म्हणतात तसा अनुभव प्रमाण असतो. बघा ना, ज्ञानेश्वरांनी तारुण्याच्या उंबरठ्यावरच जगाचा निरोप घेतला, तुकाराम संसार करीत जगला म्हणजे संसार केला पेक्षा झाला म्हणावा, पण दोघांनी जगाचे तत्त्वज्ञान मांडले. हे तत्त्वज्ञानच पसायदानात सार रूपाने आहे. या ओळीच्या आशेवरच सगळे सुजन माणसं वाईटाचं वाईटपण नष्ट होईलच असं समजून जगत असतात. आपणही या ओवीला सांभाळू या !किशोर पाठक