शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - संतांचे बहुश्रुत लेखकु

By admin | Updated: June 3, 2017 00:19 IST

हिमालयाच्या निसर्गरम्य परिसरात व्यासमुनींना समाजाच्या सर्व थरांना मार्गदर्शक वाटेल असे महाभारत हे महाकाव्य लिहिण्याची स्फूर्ती

हिमालयाच्या निसर्गरम्य परिसरात व्यासमुनींना समाजाच्या सर्व थरांना मार्गदर्शक वाटेल असे महाभारत हे महाकाव्य लिहिण्याची स्फूर्ती झाली म्हणतात. त्यांच्या तरल प्रतिभेचा वेग लेखणीपेक्षा अधिक तीव्र होता. एक श्लोक लिहावा तर शंभर श्लोक त्यांच्या मनात उसळी घेत असत. त्यांनी बुद्धिदात्या गणेशाला लेखकु होण्याची विनंती केली. लिहित्या श्लोकाचा अर्थ लक्षात आल्यानंतरच पुढचा श्लोक लिहायचा असा त्यांचा क्रम सुरू झाला. त्यामुळे महर्षी व्यासांना चिंतन करायला वेळ मिळू लागला.वारकरी पंथातील बहिणाबार्इंनी वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक इतिहास जसा अभंगातून लिहून ठेवला, तशाच प्रकारे कोणकोण कोणाचे अभंग लिहून ठेवण्याचे काम करीत होता, त्याचा आदरपूर्वक उल्लेख नोंदवून ठेवला आहे. स्वत: ज्ञानदेवांनी आपले लेखकु म्हणून ‘सच्चिदानंद बाबा आदरे लेखकु जाहला’ असे गौरवपूर्वक सांगितले आहे. बहिणाबाई म्हणतात, ‘ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दा! चिदानंद बाबा लिही त्यास.’ ‘निवृत्तीचे बोल लिहिले सोपाने। मुक्ताईची वचने ज्ञानदेवे।। चांगयाचा लिहिणार शामा तो कासार। परमानंद खेचर लिहित होता।। सावत्या माळ्याचा काशिबा गुरव। कर्म्याचा (कर्ममेळा) वसुदेव काईत होता।। चोखामेळ्याचा अनंतभट्ट अभ्यंग। म्हणोनी नामयाचे जनीचा पांडुरंग।’ ही वारकरी संतांच्या समतामयी वागण्याची एक साक्ष आहे असे म्हणायला हवे. महीपतींनी जे तुकारामचरित्र लिहिले आहे त्यामध्ये ‘संतांजी तेली जगनाड्या देख। जो तुकयापाशी होता लेखक’ असे वर्णन केले आहे. चाकणला जन्मलेले संताजी हे त्यांचे वडील भिवाशेट यांच्याबरोबर संत तुकारामांच्या कीर्तनाला गेले आणि प्रभावित होऊन त्यांचेच टाळकरी, मित्र व शिष्य झाले. संत तुकोबांचे काव्य जतन करण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. संत वाङ्मयाच्या अभ्यासक डॉ. आरती कुळकर्णी यांनी ‘संत तुकारामांची शिष्य परंपरा’ या लेखात म्हटले आहे की, संताजींच्या तीन पिढ्यांनी तुकोबांचे काव्य जतन करण्याचे बहुमोल ऐतिहासिक कार्य केले आहे. गजानन विजय ग्रंथाचे कर्ते संत दासगणू महाराज यांचे लेखकु संत छगनकाका यांची तीव्र स्मरणशक्ती आणि अमोघ पाठांतर याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. अधिकारी सत्पुरुष अनंत दामोदर आठवले यांचे वडीलही संत दासगणू महाराजांच्या लेखनिकाची महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे वाचनात आले आहे. संतांचे लेखन समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याचे आणि मानवविकासाला हातभार लावण्याचे हे अमोल कार्य करणाऱ्या व्यक्तीही असाधारणच होत्या. लोककल्याणाच्या तळमळीने संतांनी केलेले सखोल, प्रदीर्घ आणि रसाळ जीवन-चिंतन समाजासाठी अक्षरबद्ध करून ठेवणाऱ्यांविषयीची कृतज्ञता या चार शब्दांत कशी मावणार?- डॉ. सौ. प्रज्ञा आपटे -