शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

मनाचिये गुंथी - संतांचे बहुश्रुत लेखकु

By admin | Updated: June 3, 2017 00:19 IST

हिमालयाच्या निसर्गरम्य परिसरात व्यासमुनींना समाजाच्या सर्व थरांना मार्गदर्शक वाटेल असे महाभारत हे महाकाव्य लिहिण्याची स्फूर्ती

हिमालयाच्या निसर्गरम्य परिसरात व्यासमुनींना समाजाच्या सर्व थरांना मार्गदर्शक वाटेल असे महाभारत हे महाकाव्य लिहिण्याची स्फूर्ती झाली म्हणतात. त्यांच्या तरल प्रतिभेचा वेग लेखणीपेक्षा अधिक तीव्र होता. एक श्लोक लिहावा तर शंभर श्लोक त्यांच्या मनात उसळी घेत असत. त्यांनी बुद्धिदात्या गणेशाला लेखकु होण्याची विनंती केली. लिहित्या श्लोकाचा अर्थ लक्षात आल्यानंतरच पुढचा श्लोक लिहायचा असा त्यांचा क्रम सुरू झाला. त्यामुळे महर्षी व्यासांना चिंतन करायला वेळ मिळू लागला.वारकरी पंथातील बहिणाबार्इंनी वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक इतिहास जसा अभंगातून लिहून ठेवला, तशाच प्रकारे कोणकोण कोणाचे अभंग लिहून ठेवण्याचे काम करीत होता, त्याचा आदरपूर्वक उल्लेख नोंदवून ठेवला आहे. स्वत: ज्ञानदेवांनी आपले लेखकु म्हणून ‘सच्चिदानंद बाबा आदरे लेखकु जाहला’ असे गौरवपूर्वक सांगितले आहे. बहिणाबाई म्हणतात, ‘ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दा! चिदानंद बाबा लिही त्यास.’ ‘निवृत्तीचे बोल लिहिले सोपाने। मुक्ताईची वचने ज्ञानदेवे।। चांगयाचा लिहिणार शामा तो कासार। परमानंद खेचर लिहित होता।। सावत्या माळ्याचा काशिबा गुरव। कर्म्याचा (कर्ममेळा) वसुदेव काईत होता।। चोखामेळ्याचा अनंतभट्ट अभ्यंग। म्हणोनी नामयाचे जनीचा पांडुरंग।’ ही वारकरी संतांच्या समतामयी वागण्याची एक साक्ष आहे असे म्हणायला हवे. महीपतींनी जे तुकारामचरित्र लिहिले आहे त्यामध्ये ‘संतांजी तेली जगनाड्या देख। जो तुकयापाशी होता लेखक’ असे वर्णन केले आहे. चाकणला जन्मलेले संताजी हे त्यांचे वडील भिवाशेट यांच्याबरोबर संत तुकारामांच्या कीर्तनाला गेले आणि प्रभावित होऊन त्यांचेच टाळकरी, मित्र व शिष्य झाले. संत तुकोबांचे काव्य जतन करण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. संत वाङ्मयाच्या अभ्यासक डॉ. आरती कुळकर्णी यांनी ‘संत तुकारामांची शिष्य परंपरा’ या लेखात म्हटले आहे की, संताजींच्या तीन पिढ्यांनी तुकोबांचे काव्य जतन करण्याचे बहुमोल ऐतिहासिक कार्य केले आहे. गजानन विजय ग्रंथाचे कर्ते संत दासगणू महाराज यांचे लेखकु संत छगनकाका यांची तीव्र स्मरणशक्ती आणि अमोघ पाठांतर याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. अधिकारी सत्पुरुष अनंत दामोदर आठवले यांचे वडीलही संत दासगणू महाराजांच्या लेखनिकाची महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे वाचनात आले आहे. संतांचे लेखन समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याचे आणि मानवविकासाला हातभार लावण्याचे हे अमोल कार्य करणाऱ्या व्यक्तीही असाधारणच होत्या. लोककल्याणाच्या तळमळीने संतांनी केलेले सखोल, प्रदीर्घ आणि रसाळ जीवन-चिंतन समाजासाठी अक्षरबद्ध करून ठेवणाऱ्यांविषयीची कृतज्ञता या चार शब्दांत कशी मावणार?- डॉ. सौ. प्रज्ञा आपटे -