शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:16 IST

अंधारात चिमण्या फडफडतात की कावळे कोकलतात कळत नाही. अंदाज घ्यायचा पाखरांचा. त्यांच्या आवाजाचा आणि मग मार्गक्रमण करायचं.

किशोर पाठकअंधारात चिमण्या फडफडतात की कावळे कोकलतात कळत नाही. अंदाज घ्यायचा पाखरांचा. त्यांच्या आवाजाचा आणि मग मार्गक्रमण करायचं. किंबहुना आपण कोण याचाही अशावेळी अंदाज घ्यावा लागतो. आपण शोधत असतो आपल्यालाच कळत नाही आपण आपण आहोत की अजून कोणी? असं निरर्थक होत जाणं म्हणजे स्वत:ला दिशांच्या स्वाधीन करणं. मग वारा वाहील तसा आपला प्रवास आणि आपण या सर्वात अनोळखी होत जातो स्वत: मग शोधूही लागतो आपल्यालाच. हा शोध विलक्षण असतो. आपण हरवलोत की नाही माहीत नाही. पण आपण आपल्याला सापडत नाही. अखंड शोध चालू असतो. वाटतं की हेच आहोत आपण, पण आपण ते नसतो आणि आपण जे असतो त्यावर विश्वास बसत नाही. आपण तेच आहोत असं जरी कुणी म्हटलं तरी ते खरं वाटत नाही. पुन्हा खरं काय त्याचाही अदमास लागत नाही. ज्याला आपण खरं मानतो त्याला पूर्ण असत्य कुणीतरी म्हणतं. मग खरं काय? हा खऱ्याचा प्रवास खरं तर खडतरच. कारण गवसलेले सत्य स्वीकारायला मन तयार होत नाही आणि असलेल्याचा आपला सातत्याने नकार म्हणूनच आपण ते नाकारतो आणि जे पूर्ण नाकारतो तेच सत्य म्हणून समोर दत्त म्हणून उभं राहतं. आता असा संभ्रम पोकळ अवस्था मनाची होतेच तेव्हा आपण कुठल्या पर्वातून जात असतो? म्हणजे प्रत्येक वयात असे संभ्रम आपल्याला भेडसावतात. लहानपणी आपल्याला गरम तव्याला, ज्योतीला हात लावावासा वाटतो. आई बाबा नाही म्हणतात. वर्गात आपली गृहितके सर नामंजूर करतात. त्यांच्या पद्धतीने विचार करावा लागतो. तरुणपणी एखादीबद्दल आकर्षण वाटते ती आपली पत्नी होऊ शकत नाही. एक मित्र म्हणाला, अति सुंदर स्त्री मला पत्नी म्हणून नको. का तर मला न्यूनगंड येईल. पण असा न्यूनगंड स्त्रियांना येत नाही? एखाद्या अतिशय नाजूक तरुणीला जाडाभरडा, काळा कुळकुळीत धिप्पाड नवरा मिळतो तेव्हा तिला काय वाटत असेल म्हणजे आपण पूर्ण मनाचं, मनासारखं वागू शकत नाही म्हणजे आपल्यावर कुणी बळजबरी केलीच असते असे नाही पण नाही आपण काही करू शकत. चांगला विचार डोक्यात घुसला की पक्का जाऊन बसतो. त्याचा राग येत नाही. आपण त्याचा विचार करतो. संभ्रमाची अवस्था दूर जाऊ लागते. खरंतर संभ्रम काही क्षण का होईना दूर गेलेले असतात आणि नवे संभ्रम निर्माण होण्यापूर्वीचा स्वच्छ प्रकाश असतो तो. ज्यात नक्की चांगलंच वाटतं. कारण संभ्रम नसतात, नवे नसतात आणि जुने संपलेले असतात.