शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

मनाचिये गुंथी - संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:16 IST

अंधारात चिमण्या फडफडतात की कावळे कोकलतात कळत नाही. अंदाज घ्यायचा पाखरांचा. त्यांच्या आवाजाचा आणि मग मार्गक्रमण करायचं.

किशोर पाठकअंधारात चिमण्या फडफडतात की कावळे कोकलतात कळत नाही. अंदाज घ्यायचा पाखरांचा. त्यांच्या आवाजाचा आणि मग मार्गक्रमण करायचं. किंबहुना आपण कोण याचाही अशावेळी अंदाज घ्यावा लागतो. आपण शोधत असतो आपल्यालाच कळत नाही आपण आपण आहोत की अजून कोणी? असं निरर्थक होत जाणं म्हणजे स्वत:ला दिशांच्या स्वाधीन करणं. मग वारा वाहील तसा आपला प्रवास आणि आपण या सर्वात अनोळखी होत जातो स्वत: मग शोधूही लागतो आपल्यालाच. हा शोध विलक्षण असतो. आपण हरवलोत की नाही माहीत नाही. पण आपण आपल्याला सापडत नाही. अखंड शोध चालू असतो. वाटतं की हेच आहोत आपण, पण आपण ते नसतो आणि आपण जे असतो त्यावर विश्वास बसत नाही. आपण तेच आहोत असं जरी कुणी म्हटलं तरी ते खरं वाटत नाही. पुन्हा खरं काय त्याचाही अदमास लागत नाही. ज्याला आपण खरं मानतो त्याला पूर्ण असत्य कुणीतरी म्हणतं. मग खरं काय? हा खऱ्याचा प्रवास खरं तर खडतरच. कारण गवसलेले सत्य स्वीकारायला मन तयार होत नाही आणि असलेल्याचा आपला सातत्याने नकार म्हणूनच आपण ते नाकारतो आणि जे पूर्ण नाकारतो तेच सत्य म्हणून समोर दत्त म्हणून उभं राहतं. आता असा संभ्रम पोकळ अवस्था मनाची होतेच तेव्हा आपण कुठल्या पर्वातून जात असतो? म्हणजे प्रत्येक वयात असे संभ्रम आपल्याला भेडसावतात. लहानपणी आपल्याला गरम तव्याला, ज्योतीला हात लावावासा वाटतो. आई बाबा नाही म्हणतात. वर्गात आपली गृहितके सर नामंजूर करतात. त्यांच्या पद्धतीने विचार करावा लागतो. तरुणपणी एखादीबद्दल आकर्षण वाटते ती आपली पत्नी होऊ शकत नाही. एक मित्र म्हणाला, अति सुंदर स्त्री मला पत्नी म्हणून नको. का तर मला न्यूनगंड येईल. पण असा न्यूनगंड स्त्रियांना येत नाही? एखाद्या अतिशय नाजूक तरुणीला जाडाभरडा, काळा कुळकुळीत धिप्पाड नवरा मिळतो तेव्हा तिला काय वाटत असेल म्हणजे आपण पूर्ण मनाचं, मनासारखं वागू शकत नाही म्हणजे आपल्यावर कुणी बळजबरी केलीच असते असे नाही पण नाही आपण काही करू शकत. चांगला विचार डोक्यात घुसला की पक्का जाऊन बसतो. त्याचा राग येत नाही. आपण त्याचा विचार करतो. संभ्रमाची अवस्था दूर जाऊ लागते. खरंतर संभ्रम काही क्षण का होईना दूर गेलेले असतात आणि नवे संभ्रम निर्माण होण्यापूर्वीचा स्वच्छ प्रकाश असतो तो. ज्यात नक्की चांगलंच वाटतं. कारण संभ्रम नसतात, नवे नसतात आणि जुने संपलेले असतात.