शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

मनाचिये गुंथी - राजहंस माझा निजला

By admin | Updated: February 18, 2017 00:30 IST

कविता, नाटक आणि विनोद या तिन्ही क्षेत्रात सारख्याच वैभवाने तळपणारे राम गणेश गडकरी म्हणजेच भाषाप्रभू गोविंदाग्रज. जेव्हा ते गिरगावच्या

कविता, नाटक आणि विनोद या तिन्ही क्षेत्रात सारख्याच वैभवाने तळपणारे राम गणेश गडकरी म्हणजेच भाषाप्रभू गोविंदाग्रज. जेव्हा ते गिरगावच्या बनाम हॉल लेनमध्ये कृष्णाबाई इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होते तेव्हा एकदा जवळच्या वाडीत एका तान्ह्या बाळाच्या मृत्यूचा प्रसंग त्यांनी नुकताच पाहिला होता. बाळाची नुकतीच बाळंत झालेली पोरवयाची आई, मांडीवरच्या मृत बाळाला उचलू देत नव्हती.‘नुकतेच दूध प्यायलेल्या माझ्या बाळाचा आता कुठे डोळा लागला आहे. तुमच्या गलबल्यानेच कशाला, पायरवाने तो उठेल. तुम्ही म्हणता तसे काही अशुभ घडले असले तरी ज्याला मऊ पाळणा टोचतो त्याचा कोमल देह तुम्ही खाचखळग्यात ठेवणार ही कल्पनाही मला सहन होत नाही. कारण ‘राजहंस माझा निजला’ या जिवाचा ठाव घेणाऱ्या कवितेविषयी गोविंदाग्रज म्हणतात -‘आईच्या प्रत्येक बाळाला, प्रेमाच्या गावात घडलेल्या या करुण प्रसंगाचे मर्म कळेल !’ गडकऱ्यांच्या नाट्यप्रतिभेची जात शेक्सपिअरची होती असे म्हटले जाते, ते अगदी यथार्थ असल्याचा प्रत्यय या कवितेने येतो. हृदयाला पीळ पाडणारा करुण रस, पराकाष्ठेचा विनोद आणि चकित करणारी कल्पकता याचा विलक्षण समन्वय असणाऱ्या गोविंदाग्रजांची ‘राजहंस माझा निजला’ ही शोकरसपूर्ण कविता १९१२ला मनोरंजनमधून प्रसिद्ध झाली. कुसुमावतीबाई देशपांडेंनी ‘पासंग’ (पृ २३) मध्ये नमूद केले आहे की ‘ज्याच्या त्याच्या तोंडी ही कविता असे. घरी-दारी-शाळेत या कवितेचे गुणगुणणे चाले. गोविंदाग्रजांच्या कवितेच्या लोकप्रियतेने काव्यगायनाच्या प्रथेला कितीतरी चालना दिली.’ याच करुणरम्य भावकवितेला मराठीतील पहिल्या ध्वनिमुद्रित कवितेचा मान प्राप्त होतो. विनायक जोशी यांनी (एका दैनिकाच्या) रविवार पुरवणीत स्वरभावयात्रा सदरातील अभ्यासपूर्ण लेखात ही माहिती दिली आहे. त्या काळात रंगभूमी गाजवणारे ललित कलादर्श नाट्यसंस्थेचे नायक, अभिनेते व्यंकटेश बळवंत पेंढारकर यांच्या आवाजात ही ध्वनिमुद्रिका सिद्ध झाली. रंगभूमीवर नाट्यसंगीत गायनाने त्यांनी स्वत:चे युग निर्माण केले होते म्हणतात. मूळ १८ कडवी असणाऱ्या या कवितेतील निवडक अंशच ध्वनिमुद्रिकेसाठी घेतले असावेत. गडद करुण भाव असणारे हे मराठीतील पहिले भावगीत ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेते. ध्वनिमुद्रिकांचा संग्रह करणाऱ्या एचएमव्हीची रेकॉर्ड अजूनही असल्याचे लेखकाने नोंदवले हे मराठी रसिकांना अमोल वाटते. प्रतिभेचा स्पर्श लाभलेले नादमधुर शब्द, भावपूर्ण आशय, संगीतकाराची स्वरयोजना, गायकाचे सूर यामुळे ‘राजहंस माझा निजला’ हे मराठीतील पहिले ध्वनिमुद्रित भावगीत कालजीवी ठरेल यात शंका नाही.डॉ. सौ. प्रज्ञा आपटे