शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

मनाचिये गुंथी - ... कधी होशिल माणूस

By admin | Updated: July 8, 2017 00:14 IST

माणसाच्या मनाचा थांगा लागत नाही. ते अथांग सागरासमान गहन, गूढ आहे. खूप खोल असून

- कौमुदी गोडबोले माणसाच्या मनाचा थांगा लागत नाही. ते अथांग सागरासमान गहन, गूढ आहे. खूप खोल असून त्याचा तळ गाठणं कठीण! अत्यंत चपळ, चंचलदेखील आहे. वाऱ्याचा वेग कमी पडेल इतकं वेगवान आहे. क्षणात आकाशात झेपावतं तर क्षणात जमिनीवर सैर करतं. स्वैरपणानं सैर करणारं मन स्वच्छंदी असतं. आपल्या नादात गिरक्या घेत जातं. आजूबाजूच्या परिसराचा विसर पडून आत्ममग्न होतं. कधी खळखळून हसतं तर कधी खळखळाट करणाऱ्या निर्झरासमान पुढे पुढे झेपावतं! निरागस बालकासमान निर्व्याज होऊन आनंद लुटतं. निराशेला सहजपणानं दूर लोटतं.मनाच्या किती विविध छटा अनुभवायला मिळतात. त्याचे रंग कधी आकर्षक तर कधी भडक! कधी सौम्य आल्हाददायक तर कधी उग्र नको वाटणाऱ्या रंगछटा! रंगांची दुनिया जादूभरी तशीच मनाची दुनिया अनोखी! मन कळायला सोपं आहे का? अत्यंत गुंतागुंतीचं असल्यामुळे समजायला अवघड आहे. ते कशात ... कधी... कसं अडकेल ... गुंतेल त्याचा काही नेम नाही. वस्तूंमध्ये ... माणसांमध्ये... नात्यांमध्ये ते गुंतून जातं. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या मागे मागे जातं. त्याच्या प्राप्तीसाठी तळमळतं. घडणाऱ्या घटनांमध्ये सदैव अडकून राहतं. भ्रमर जसा कमळामध्ये अडकतो ना! माणसाच्या मनाची अवस्था भ्रमरासमान होऊन ते विषयांमध्ये बंदिस्त होऊन जातं.अस्वस्थ, अस्थिर, अशांत मनाची अवस्था मोठी कठीण आणि केविलवाणी होऊन जाते. कलियुगामध्ये याचा उच्चांक गाठलेला दिसतो. शिक्षण आणि संस्काराचा संबंध संपल्यापासून मनं सैरभैर न झाली तर नवल? ते भलतीकडे भरकटत जातं. स्वत:बरोबर समाजाला त्रस्त करतं. वासनांचा भडका उडून विकृती जन्म घेते. शिक्षणातल्या गुणांचा जीवन जगताना, माणूसपण जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी उपयोग होताना दृष्टीस पडत नाही. बहिणाबाई चौधरी लिहितात अरे माणसा माणसा कधी होशिल माणूस?ही ओळ आजच्या काळातील माणसाच्या मनाची अधोगती अधोरेखित करणारी आहे. अशा माणसांच्या मनाला सुयोग्य वळण लागण्यासाठी सात्विकतेची गरज आहे.नको त्या स्थानी... नको त्या भावनेत गुंतल्यानं त्याची फार गुंतागुंत होऊन जाते. मनाचा गुंता हळूवारपणानं सोडवायचा असतो. शब्द, शस्त्र यांचा वापर त्यासाठी केला तर जखमा होण्याची दाट शक्यता! शरीराच्या जखमा लवकर भरून येतात परंतु मनाच्या जखमा भरून येणं कठीण! स्नेहाचं सुंदर मलम लावून प्रेमाची पट्टी लावली की मनाच्या जखमा भरून यायला साह्य होतं. हे अमूल्य कामं असहृदयी, संयमी, सोशिक संत करीत असतात.