शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

माणूस? सरासरी नऊ तास झोपतो, काम फक्त अडीच - तास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2023 10:25 IST

माणूस दिवसभरात काय काय करतो? साधारण आठ तास गप्पाटप्पा, साडेचार तास मित्र- कुटुंबीयांसाठी, पोटपूजा अडीच तास आणि नटण्या-मुरडण्यात एक तास 

- श्रीमंत माने

कामाने इतके कंटाळलो की थोडी विश्रांती घ्यायला हवी, असे माणूस सहज बोलून जातो; पण खरेच थकवा यावा इतका तो काम करतो का? अनेक जण करतातही; पण सगळेच करत नाहीत. गेल्या १५ नोव्हेंबरला जागतिक लोकसंख्येने ८ अब्जाचा आकडा ओलांडला. या आठ अब्ज लोकांच्या जवळपास वीस वर्षांच्या दैनंदिनीचा अभ्यास केल्यानंतर निघालेला ताजा निष्कर्ष सांगतो, की माणसे सरासरी ९ तास झोपतात आणि केवळ २.६ तास अर्थात १५६ मिनिटे काम करतात. हे धक्कादायक, पण कटुसत्य आहे.

परवा, ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा होईल, तेव्हा प्रामुख्याने लोकसंख्येची वाढ, पोट भरण्यासाठी त्यांचा आटापिटा पर्यावरणाचा असमतोल, दुष्काळ व महापुराची संकटे, संकटात शेती यावर चर्चा होईल. यंदा या चर्चेत कॅनडातील माँट्रियल येथील मॅकगिल विद्यापीठाच्या संशोधकांनी काढलेल्या आणि प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसने महिनाभरापूर्वी प्रकाशित केलेल्या निष्कर्षाची भर पडेल तब्बल १४५ देशांमधील लोकांचा २००० ते २०१९ अशा वीस वर्षांचा महाप्रचंड डेटा यासाठी संशोधकांनी वापरला. त्या देशांतील शासकीय अशासकीय संस्थांचे सर्वेक्षण, तसेच रोजगार मंत्रालयाची कामाच्या तासांची आकडेवारी एकत्र केली गेली. 

आठ अब्ज लोकांच्या तब्बल १९० अब्ज मानवी तासांचे विश्लेषण व वर्गीकरण करण्यात आले. पृथ्वीच्या परिवलनानुसार, वेगवेगळ्या देशांमधील लोकांच्या कामाच्या, झोपण्याच्या वेळा गृहीत धरण्यात आल्या. त्यात आढळले, की वैश्विक मानव सरासरी ९.१ तास विश्रांती घेतो किंवा झोपतो. निद्रानाशाचा त्रास असलेल्यांना हे धक्कादायक वाटेल; पण या अभ्यासात नवजात अर्भकांपासून सगळ्या जिवंत माणसांचा समावेश आहे. झोपेसाठी १ तास खर्च होण्याची दोन कारणे पहिले, झोप सगळ्यांनाच घ्यावी लागते आणि मोठी माणसे कमी झोपतात, तर लहान मुले १२ ते १६ तास झोपतात. त्यामुळे माणसांची सरासरी झोप नऊ तासांच्या पुढे गेली. माणूस दिवसाचा सरासरी एक तृतीयांश वेळ बोलणे चालणे, सार्वजनिक ठिकाणी घालवतो. त्याचे ४.६ तास वाचन, टीव्ही पाहणे, खेळ, मित्रमंडळी, कुटुंबीयांसोबत जातात. या वेळेत कुणी चित्रे रेखाटतात, संगीताचा रियाझ किंवा खेळांचा सराव करतात. 

स्वयंपाक करणे व भोजन यासाठी जाणारा वेळ अडीच तास आहे. वैयक्तिक स्वच्छता, स्नान, कपडे व नटणे-मुरडणे यात १.१ तास जातो. धुणीभांडी, घर व अंगणाच्या साफसफाईसाठी ०.८ तास लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे नोकरी कामधंद्यासाठी सरासरी २.६ तास इतकाच वेळ दिला जातो. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देश तरुण आहे, की वृद्ध यावर तिथला कार्यक्षम वयोगट ठरतो. भारतासारखे मोजके अपवाद वगळता जगातील अनेक देशांचे सरासरी वय खूप अधिक असल्याने कष्ट करणाऱ्यांची संख्याही कमी आहे. कुणी असा विचार करील, की नोकरी किंवा उपजीविकेच्या आधी शिक्षण, ज्ञानार्जन करावे लागते. त्यासाठी अधिक वेळ दिला जात असेल. हा अंदाजही चुकीचा ठरला. जगभरातील माणसांचा शिक्षणासाठी दिला जाणारा सरासरी वेळ केवळ १.१ तास इतकाच आहे.

माणसाचे स्वतःचे घर, त्यासाठी सामानाची जुळवाजुळव, अशी अनेकांची मिळून घरबांधणी, गावे व शहरे विस्तारत जात असताना उभ्या राहणाऱ्या वसाहती, त्यांच्या अवतीभोवतीच्या पायाभूत सुविधा, रस्ते- रेल्वे- विमानतळ या वाहतुकीच्या साधनांचा विकास हे सारे किती अवाढव्य वाटते; पण त्यासाठी खर्च होणारे मानवी श्रमाचे तास मात्र खूपच किरकोळ आहेत. या सगळ्या कामांसाठी खर्च होणारा सरासरी वेळ घरादाराच्या साफसफाई इतकाच म्हणजे अवघा ०.८ तास आहे. याचा अर्थ असा नाही, जगभर या वेळांचे नियोजन समान आहे. जग सगळ्या प्रकारच्या विषमतेने व्यापले आहे. आर्थिक विषमता त्यात मुख्य. हा अभ्यास सांगतो, की पैशाच्या व्यवहारात श्रीमंत देशांमधील लोक गरीब देशांमधील लोकांपेक्षा तब्बल दीड तास अधिक घालवतात, तर त्याच श्रीमंत देशातील लोकांना अन्नधान्य पिकविण्यासाठी अवघी पाच मिनिटे लागतात. त्या तुलनेत गरीब, विकसनशील देशांमधील लोक शेतीवर अधिक अवलंबून असल्याने त्यांचा सरासरी एक तास शेतीच्या कामात खर्च होतो.