शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

दुष्काळग्रस्तांसाठी ममतेचे पूल

By admin | Updated: March 17, 2016 03:55 IST

ममतेचे हे पूल बांधले जावेत आणि त्यातून दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या लाखो जिवांना आधार मिळावा, मायेचे आभाळ मिळावे, हाच खरा माणसाच्या संस्कृतीचा सारांश आहे.

- विजय बाविस्करममतेचे हे पूल बांधले जावेत आणि त्यातून दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या लाखो जिवांना आधार मिळावा,मायेचे आभाळ मिळावे, हाच खरा माणसाच्या संस्कृतीचा सारांश आहे.दुष्काळाच्या अस्मानी संकटाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा डोलाराच कोसळून पडू लागला आहे. जगण्यासाठी महानगरांच्या आसऱ्याला जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. शेतकऱ्यांना बांधकाम मजूर म्हणून काम करावे लागते आहे. दुष्काळामागील कारणे काहीही असोत; आता गरज आहे या साऱ्यांना आसरा देऊन त्यांचे जीवन त्यातल्या त्यात सुसह्य व्हावे म्हणून सर्वांनी मिळून काम करण्याची. मराठवाडा-विदर्भातील अनेक दुष्काळी गावे उठून पुण्याच्या आसऱ्याला आल्याचं चित्र ‘लोकमत’नं मांडलं. मजूर अड्ड्यांवर कामाच्या प्रतीक्षेत तासन् तास बसून राहायचं. काम मिळालं तर ठीक, नाही तर दिवस कसा तरी घालवायचा, असं अनेकांचं जिणं झालं आहे. एखाद्या दिवशी काम मिळालं तर दोनशे-तीनशे रुपये मिळतात; मात्र पुढचे चार-पाच दिवस काम मिळेल, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे या तुटपुंज्या रकमेतच संसाराचा गाडा चालवताना कसरत करावी लागते. तरीही अजून परिस्थिती बरी म्हणायची, पुढचा काळ तर आणखी भीषण आहे. या परिस्थितीत पुण्यासारख्या शहरांची जबाबदारी वाढली आहे. मराठवाड्यातील दुष्काळ असो की भूकंप, पुणेकरांनी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लातूर जिल्ह्यामधील किल्लारी येथे १९९२मध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर हजारो मुलांच्या आयुष्यात काळोख पसरला. त्यावेळी शांतिलाल मुथा यांनी धाव घेतली. पहिल्यांदा या मुलांना आसरा हवा आहे, हे ओळखले. त्यांना घेऊन ते पुण्याला आले. पिंपरीतील एका शाळेत तात्पुरती व्यवस्था केली. त्यानंतर भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून वाघोली येथे शैक्षणिक संकुल उभे केले. या मुलांना केवळ भौतिक सुविधा पुरविल्या इतकेच नव्हे, तर त्यांची मने जाणून घेतली, त्यांच्या दु:खांवर फुंकर घातली. ही सगळी मुले आज स्वत:च्या पायावर उभी आहेत. समाजातील मांगल्याच्या त्यांना मिळालेल्या अनुभूतीने एक चांगला माणूस घडला आहे. त्यामुळे भारतीय जैन संघटनेच्या कार्यात या सर्वांचा आजही सहभाग दिसून येतो. आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांवरही शांतिलालजींनी मायेची पाखर घातली आहे. त्यांना भारतीय जैन संघटनेने शैक्षणिक आधार तर दिलाच; शिवाय पालकांच्या आत्महत्त्यांच्या वेळी मुलांचे वय हा महत्त्वपूर्ण घटक ठरत असल्याने वाघोलीमधील प्रकल्पात मानसिक आरोग्य विभागाची स्थापना केली आणि भावनिक वावटळीत सापडलेल्या मुलांना त्यातून बाहेर काढले. ‘मंथन’ या उपक्रमाद्वारे या मुलांना आवश्यक असे मानसिक बळ देऊन त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याचा व पुढील आयुष्यात प्रगतिपथावर वाटचाल करण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न बीजेएस करीत आहे. राज्याच्या मदतीला जाण्याची पुण्याची ही परंपरा आहे. १९७२च्या दुष्काळातही लाखो दुष्काळग्रस्तांना पुण्याने आधार दिला होता. शेतमजुरांपासून औद्योगिक कामगारांपर्यंत काम करण्यासाठी हजारो जण येथे स्थलांतरित झाले. त्यांची आयुष्ये पुण्याने सावरली. याच काळात पुण्यात स्थलांतरित झालेली दुसरी पिढी आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांच्या नवनिर्माणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीतही पुणे आणि परिसर या दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, हे अनेक उदाहरणांवरून दिसत आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांवर अनेक पुणेकरांनी ममतेची पाखर घातली आहे. ‘लोकमत’ने दुष्काळग्रस्तांची व्यथा मांडल्यावर आमच्याशी संपर्क साधून मदतीचे अनेक हात पुढे आले आहेत. या दुष्काळग्रस्तांच्या निवाऱ्यापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत आणि त्यांच्या रोजगारापासून मानसिक आरोग्यापर्यंत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. ममतेचे हे पूल असेच बांधले जावेत आणि त्यातून दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या लाखो जिवांना आधार मिळावा, मायेचे आभाळ मिळावे, हाच खरा माणसाच्या संस्कृतीचा सारांश आहे.