शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

दुष्काळग्रस्तांसाठी ममतेचे पूल

By admin | Updated: March 17, 2016 03:55 IST

ममतेचे हे पूल बांधले जावेत आणि त्यातून दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या लाखो जिवांना आधार मिळावा, मायेचे आभाळ मिळावे, हाच खरा माणसाच्या संस्कृतीचा सारांश आहे.

- विजय बाविस्करममतेचे हे पूल बांधले जावेत आणि त्यातून दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या लाखो जिवांना आधार मिळावा,मायेचे आभाळ मिळावे, हाच खरा माणसाच्या संस्कृतीचा सारांश आहे.दुष्काळाच्या अस्मानी संकटाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा डोलाराच कोसळून पडू लागला आहे. जगण्यासाठी महानगरांच्या आसऱ्याला जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. शेतकऱ्यांना बांधकाम मजूर म्हणून काम करावे लागते आहे. दुष्काळामागील कारणे काहीही असोत; आता गरज आहे या साऱ्यांना आसरा देऊन त्यांचे जीवन त्यातल्या त्यात सुसह्य व्हावे म्हणून सर्वांनी मिळून काम करण्याची. मराठवाडा-विदर्भातील अनेक दुष्काळी गावे उठून पुण्याच्या आसऱ्याला आल्याचं चित्र ‘लोकमत’नं मांडलं. मजूर अड्ड्यांवर कामाच्या प्रतीक्षेत तासन् तास बसून राहायचं. काम मिळालं तर ठीक, नाही तर दिवस कसा तरी घालवायचा, असं अनेकांचं जिणं झालं आहे. एखाद्या दिवशी काम मिळालं तर दोनशे-तीनशे रुपये मिळतात; मात्र पुढचे चार-पाच दिवस काम मिळेल, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे या तुटपुंज्या रकमेतच संसाराचा गाडा चालवताना कसरत करावी लागते. तरीही अजून परिस्थिती बरी म्हणायची, पुढचा काळ तर आणखी भीषण आहे. या परिस्थितीत पुण्यासारख्या शहरांची जबाबदारी वाढली आहे. मराठवाड्यातील दुष्काळ असो की भूकंप, पुणेकरांनी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लातूर जिल्ह्यामधील किल्लारी येथे १९९२मध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर हजारो मुलांच्या आयुष्यात काळोख पसरला. त्यावेळी शांतिलाल मुथा यांनी धाव घेतली. पहिल्यांदा या मुलांना आसरा हवा आहे, हे ओळखले. त्यांना घेऊन ते पुण्याला आले. पिंपरीतील एका शाळेत तात्पुरती व्यवस्था केली. त्यानंतर भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून वाघोली येथे शैक्षणिक संकुल उभे केले. या मुलांना केवळ भौतिक सुविधा पुरविल्या इतकेच नव्हे, तर त्यांची मने जाणून घेतली, त्यांच्या दु:खांवर फुंकर घातली. ही सगळी मुले आज स्वत:च्या पायावर उभी आहेत. समाजातील मांगल्याच्या त्यांना मिळालेल्या अनुभूतीने एक चांगला माणूस घडला आहे. त्यामुळे भारतीय जैन संघटनेच्या कार्यात या सर्वांचा आजही सहभाग दिसून येतो. आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांवरही शांतिलालजींनी मायेची पाखर घातली आहे. त्यांना भारतीय जैन संघटनेने शैक्षणिक आधार तर दिलाच; शिवाय पालकांच्या आत्महत्त्यांच्या वेळी मुलांचे वय हा महत्त्वपूर्ण घटक ठरत असल्याने वाघोलीमधील प्रकल्पात मानसिक आरोग्य विभागाची स्थापना केली आणि भावनिक वावटळीत सापडलेल्या मुलांना त्यातून बाहेर काढले. ‘मंथन’ या उपक्रमाद्वारे या मुलांना आवश्यक असे मानसिक बळ देऊन त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याचा व पुढील आयुष्यात प्रगतिपथावर वाटचाल करण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न बीजेएस करीत आहे. राज्याच्या मदतीला जाण्याची पुण्याची ही परंपरा आहे. १९७२च्या दुष्काळातही लाखो दुष्काळग्रस्तांना पुण्याने आधार दिला होता. शेतमजुरांपासून औद्योगिक कामगारांपर्यंत काम करण्यासाठी हजारो जण येथे स्थलांतरित झाले. त्यांची आयुष्ये पुण्याने सावरली. याच काळात पुण्यात स्थलांतरित झालेली दुसरी पिढी आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांच्या नवनिर्माणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीतही पुणे आणि परिसर या दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, हे अनेक उदाहरणांवरून दिसत आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांवर अनेक पुणेकरांनी ममतेची पाखर घातली आहे. ‘लोकमत’ने दुष्काळग्रस्तांची व्यथा मांडल्यावर आमच्याशी संपर्क साधून मदतीचे अनेक हात पुढे आले आहेत. या दुष्काळग्रस्तांच्या निवाऱ्यापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत आणि त्यांच्या रोजगारापासून मानसिक आरोग्यापर्यंत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. ममतेचे हे पूल असेच बांधले जावेत आणि त्यातून दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या लाखो जिवांना आधार मिळावा, मायेचे आभाळ मिळावे, हाच खरा माणसाच्या संस्कृतीचा सारांश आहे.