शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

नर संसारी उपरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:52 IST

कोणी म्हणेल, नराची जर, जोरू, जमिनीवरील अधिकाराची भावना या आमिषासाठी अधिक जबाबदार आहे. तशी ती असेलही, पण नीट विचार करता, यातील जर वा जमिनीवरील अधिकाराची भावना फार विकसित अवस्था दाखविते.

- डॉ. नीरज देवकोणी म्हणेल, नराची जर, जोरू, जमिनीवरील अधिकाराची भावना या आमिषासाठी अधिक जबाबदार आहे. तशी ती असेलही, पण नीट विचार करता, यातील जर वा जमिनीवरील अधिकाराची भावना फार विकसित अवस्था दाखविते. प्रथमत: जोरूवरील अधिकार आला असला पाहिजे आणि जोरूवरील हा अधिकार सर्वप्रथम एखाद्या अतिशय बुद्धिमान व संवेदनशील स्त्रीनेच पुढे आणला असावा. यामागे तिची जोडून अन् जुळवून घेण्याची नैसर्गिक स्त्रैण भावना व इतर नरांपासून स्वसंरक्षणाची गरज, याच बाबी मुख्य असाव्यात, असो!स्त्रिया जशा संसारात रममाण होतात, तसे पुरुष होत नाहीत, असा सरसकट आरोप बहुतेक स्त्रियांकडून होत असतो. एवढेच नव्हे, तर पुरुष फारसे जबाबदारीने वागत नाहीत, असेही त्यांचे म्हणणे असते. स्त्रियांच्या या आरोपात तथ्य नसते, असे म्हणणे अशास्त्रीयच ठरेल. जेव्हा शास्त्रीयतेची गोष्ट निघते, तेव्हा साहजिकच प्रश्न उभा राहतो, असे का बरे असावे? पुरुषप्रधान म्हणविल्या जाणाºया संसारात पुरुषच असा उपरा अन् बेजबाबदार का सापडावा?पटत नाही? बघा नं! पुरुषप्रधान संसारात मातृप्रेमाची महती वर्णन करणाºया आईवरील खंडोगणती कविता पानोपानी आढळत असताना, पित्यावरील एखाद-दुसरी कविता अपवादाने आढळावी, हे त्याचे संसारातील उपरे, परकेपण नाही, तर काय दर्शविते?मला वाटते, याचे मूळ पुरुषाच्या पूर्वेतिहासात अर्थात, नरत्वात पडलेले असावे. पशुत्वाकडे वा कधी-कधी पाशवी वृत्तीकडे पाहावे, तसे नरत्वाकडे पाहिले जाते, हीन लेखले जाते. पुरुषाचे नरत्वच त्याला संसारापासून दूर सरकवत असते.तुम्ही नीट बघा! मनुष्यप्राणी वगळता विश्वातील सारी प्राणिसृष्टी केवळ आई व पिल्लांनीच भरलेली तुम्हाला आढळेल. अपवाद एखाद-दुसºया कसरीसारख्या कृमी-किटकाचा. गाय-वासरू, हरिणी-पाडस, सिंहीण-शावक अगदी चिमणी व चिमणीचे पिल्लू अशा जोड्या तुम्हाला कथा-कहाण्यातूनही पाहायला मिळतील.अगदी डझनभर पिल्लांचा भार डुकराच्या मदतीशिवाय समर्थपणे वाहणारी डुकरीण, पिल्लाला पोटाशी कवळून या झाडावरून त्या झाडावर अलगद वावरणारी माकडीण वा पिल्लाला पोटाच्या पिशवीत ठेवून उड्या मारत जाणारी कांगारू माता तुमच्या नजरेसमोर तरळून जाईल. आपल्या पिल्लाला चोचीने दाणा भरविणारी चिमणीही तुम्हाला आठवेल, तर बोक्यापासून आपल्या पिल्लाला वाचवून नेणारी मांजरसुद्धा नित्याचीच वाटेल.मला सांगा, कधी कुत्रा व कुत्र्याचे पिल्लू सोबत जाताना तुम्ही पाहिलेय का? बैल आणि वासरू, घोडा अन् शिंगरू खेळीमेळीने रमतगमत जाताना तुम्ही कधी पाहिलेय का? नाही, आपण ही कल्पनाच नाही करू शकत. आपल्याला ती कल्पनाही हास्यास्पद वाटते. अहो, मनुष्यप्राण्याचे तान्हे तर सोडूनच द्या, पण वर्षभराचे बाळही केवळ एकट्या पित्यासोबत कोठे दूर एकटे जात असेल, तर ही कल्पनाही आपल्याला करवत नाही आणि तसे दिसले, तर आपण विचारात पडतो, आईविना हे बाळ राहील कसे? बहुतेक वेळा तर आपण नरापासून त्याच्याच पिल्लाला वाचवित असतो. प्राणिसृष्टीत नर जसा दाता असतो, तसाच संहारकही असतो. त्याची नजर मादीवर केवळ उपभोगातूनच पडते. नराच्या नरत्वाचा हा त्रास केवळ मादीलाच जाणवतो, असे नाही, तर तिच्या पिल्लांना अन् इतर नरांनाही जाणवत असतो. मानवी नारीला नराच्या पशुत्वाचा एकविसाव्या शतकात होणारा त्रास ध्यानात घेतला, तर त्या काळी होणारा त्रास कितीतरी भयानक असावा, याचा सहज अंदाज बांधता येतो.समस्त प्राणिसृष्टीतील तुरळक अपवाद वगळता, इतर सगळे नर, संसारातील जबाबदारीतून पूर्णपणे मुक्त असताना, हुशार व धूर्त म्हणविणारा मानवी नर संसारात कसा गुरफटला असावा? मला वाटते, नराला संसारात गुंतविण्याचे अप्रतिम कसब एखाद्या कुशाग्र ललनेनेच केले असावे.यासाठी तिने व तिला वश नरांनी समस्त नरजातीला अनेक आमिषे दिली असली पाहिजेत. ‘बघ, ही तुझी हक्काची बायको आहे. ही आता तुझी एकट्याचीच राहील. तू तिचा मालक असशील. ती तुझे नाव लावील. तिच्यापासून होणारी मुले तुझाच वंश चालवितील. आणि हो, तुला एकट्याने नाही राहावे लागणार, ही व हिची मुले तुझीच सेवा करतील. मादीला जसा मातेचा दर्जा निसर्गत: मिळाला, तसा तुला - नराला पित्याचा लाभेल,’ अशी एक ना अनेक आमिषे दिली गेलेली आढळतात. अगदी आरंभीच्या काळात तर ‘तू एक नाही, तर अनेक बायका करू शकतोस’ अशीही लालूच त्याला दिली गेली असेल. या बदल्यात त्याने फक्त तिचे अन् तिच्या पिल्लांचे संरक्षण व पालन पोषण करायचे, एवढेच ठरलेले असावे.मानवी नराला इतर प्राण्यांहून थोडी अधिक बुद्धिमत्ता असल्याने व तो बराच भावनिक असल्याने, त्यानेही विचार केला असावा. तिच्या कथनांत तथ्यांश तर आहेच. जर ती म्हणते, तसे मी केले तर माझाच फायदा होणारा आहे. माझे संख्याबळ वाढेल. संख्याबळ वाढेल, तसे माझे सेवक व सामर्थ्यही वाढेल. बरे तशी जबाबदारी फारशी नाही अन् तो तिच्या आमिषाला बळी पडला असावा.कोणी म्हणेल, नराची जर, जोरू, जमिनीवरील अधिकाराची भावना या आमिषासाठी अधिक जबाबदार आहे. तशी ती असेलही, पण नीट विचार करता, यातील जर वा जमिनीवरील अधिकाराची भावना फार विकसित अवस्था दाखविते. प्रथमत: जोरूवरील अधिकार आला असला पाहिजे आणि जोरूवरील हा अधिकार सर्वप्रथम एखाद्या अतिशय बुद्धिमान व संवेदनशील स्त्रीनेच पुढे आणला असावा. यामागे तिची जोडून अन् जुळवून घेण्याची नैसर्गिक स्त्रैण भावना व इतर नरांपासून स्वसंरक्षणाची गरज, याच बाबी मुख्य असाव्यात, असो!सारांशत: माता नैसर्गिक असते, तर पिता नैसर्गिकपेक्षा सामाजिकच अधिक असतो. समाजीकरणाची ही संकल्पना उत्तरोत्तर विकसित होत, पुढे-पुढे जाणारी असली, तरी कधी-कधी जबाबदारी टाळण्यातून म्हणा वा संसारातील हलगर्जी वागण्यातून म्हणा, पित्यातील नैसर्गिक नर उसळी मारून वर येत असावा.(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत.)