शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

‘मेकिंग आॅफ पंढरीची वारी’

By admin | Updated: January 31, 2015 04:45 IST

गुरू ठाकूर यांचे शब्द, अजय-अतुलच्या संगीताचे सूर व टाळ-मृदंगाची साथ राजपथावर घुमली आणि ‘पंढरीच्या वारी’ने प्रजासत्ताकदिनी लाखो

रघुनाथ पांडे -

तुला साद आली, तुझ्या लेकराची, अलंकापुरी आज भारावली..वसा वारीचा घेतला पावलांनी,आम्हा वाळवंटी तुझी सावली..गुरू ठाकूर यांचे शब्द, अजय-अतुलच्या संगीताचे सूर व टाळ-मृदंगाची साथ राजपथावर घुमली आणि ‘पंढरीच्या वारी’ने प्रजासत्ताकदिनी लाखो दर्शकांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले. देहू ते पंढरपूर हा २०५ किलोमीटरचा प्रवास ५० फूट लांब, १४ फूट रुंद व १६ फूट उंच अशा मोजक्या जागेत चित्ररथातून मांडणे नक्कीच आव्हान होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने हे आव्हान लीलया पेलले आणि विठ्ठलाच्या पदस्पर्शाने राजपथच नव्हे, तर अवघा देश भारावला. सहा गोल रिंगणांपैकी एक रिंगण, डोईवर तुळस घेतलेली वारकरी महिला, कोरलेल्या डोंगरावर वारकऱ्यांच्या ३०० प्रतिमा, ज्ञानेश्वर- तुकोबारायांची लोभस मूर्ती, माउली व सेवकाचे दोन अश्व, इंद्रायणीकाठचे मंदिी.. सारेच मंत्रमुग्ध! माती, फायबर ग्लास व प्लास्टर आॅफ पॅरीसने या कलाकृती अवतरल्या होत्या. ही कलाकृती कोठली, त्यामागील कारणे आणि वारी म्हणजे काय हे वर्णन निवेदक करत होते, तेव्हा उपस्थित लाखो भारतीयांची टाळ्यांची साथ होती. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्रासह गुजरातेतील केंद्रीय मंत्र्यांनी आसनावरून उठून या चित्ररथाला दाद दिली.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहुणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना वारीची माहिती दिली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही बारकावे सांगितले.. तेव्हाच ही कलाकृती देश डोक्यावर घेईल याचा अदमास आला होता. झालेही तसेच.! पांडुरंगाच्या पंढरीच्या वारीने देशात पहिला क्रमांक मिळवला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा हा गौरव आहे. हा विषय धार्मिक असल्याचा समज होता, त्यामुळे संरक्षण विभागाच्या संकल्पना निवड समितीने त्यातील अनेक बारकावे तपासल्यावर या संकल्पनेत जीव ओतायला चार महिने लागले. दिल्लीत येऊन कलाकृती निर्मितीसाठी कष्ट पडतात, ते कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे, नृत्यदिग्दर्शक संतोष भांगरे, सांस्कृतिक कला संचालक अजय अंबेकर, सहसंचालक मनोज सानप या साऱ्यांनी घेतले आणि मुत्सद्देगिरीच्या राजकीय कंगोऱ्यांनी जगाचे लक्ष वेधलेल्या प्रजासत्ताकाच्या यंदाच्या सोहळ्यावर ‘वारी’च्या यशाने मराठी मुद्रा कोरली गेली. दहा वर्षांची तीन मुले या वारीत होती. दिल्लीतील थंडी मी-मी म्हणत असताना हे सारेच सराव अनवाणी पायाने करायचे. एक-दोन नव्हे तब्बल १५ दिवस सकाळी सात वाजतापासून त्यांनी सराव केला. कडाक्याच्या थंडीची सवय पायाला व्हावी व वारकऱ्यांच्या भावनेला कोणत्याही स्थितीत तडा जाऊ नये म्हणून तंतोतत परिणाम साधणारे कष्ट त्यांनी उपसले. त्याचे चीज झाले!!गडकरींची झणझणीत दही मिसळ!नितीन गडकरींचे आदरातिथ्य प्रसिद्ध आहे. बिल व मिलिंडा गेट्स यांनाही त्यांनी दही मिसळ, पोहे, मक्याचे वडे खाऊ घातले. गडकरींच्या पत्नी कांचन यांनी तयार केलेले हे पदार्थ गेट्स दांपत्यानी हाश हुश करीत खाल्लेही!! जगाच्या पाठीवर आपली नाममुद्रा कोरणाऱ्या या दांपत्यासंदर्भातील हा प्रसंग आठवण्याचे कारण म्हणजे यंदा बिल दांपत्याला भारत सरकारने पद्मभूषण किताब जाहीर केला. हे दांपत्य भारतात अनेकदा आले. राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या भेटीही घेतल्या. सरकारी योजनांसाठी अब्जावधींची मदत केली. पण त्यांच्या दातृत्वाची कदर गडकरींनी केली. पंतप्रधानांनी जेव्हा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या जागतिक पातळीवरील नावांची चर्चा केली, तेव्हा गडकरींनी गेट्स दांपत्याचे नाव सुचविले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोसला गेले होते. तिथे गेट्स फाउंडेशनने महाराष्ट्रात पुणे येथे काही उपक्रम सुरू करण्यासाठी पाऊल उचलले.. आणि विकासाची नवी खिडकी किलकिली झाली. पण सुरुवात होती नागपुरी झणझणीत दही मिसळपासून.