शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

‘मेकिंग आॅफ पंढरीची वारी’

By admin | Updated: January 31, 2015 04:45 IST

गुरू ठाकूर यांचे शब्द, अजय-अतुलच्या संगीताचे सूर व टाळ-मृदंगाची साथ राजपथावर घुमली आणि ‘पंढरीच्या वारी’ने प्रजासत्ताकदिनी लाखो

रघुनाथ पांडे -

तुला साद आली, तुझ्या लेकराची, अलंकापुरी आज भारावली..वसा वारीचा घेतला पावलांनी,आम्हा वाळवंटी तुझी सावली..गुरू ठाकूर यांचे शब्द, अजय-अतुलच्या संगीताचे सूर व टाळ-मृदंगाची साथ राजपथावर घुमली आणि ‘पंढरीच्या वारी’ने प्रजासत्ताकदिनी लाखो दर्शकांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले. देहू ते पंढरपूर हा २०५ किलोमीटरचा प्रवास ५० फूट लांब, १४ फूट रुंद व १६ फूट उंच अशा मोजक्या जागेत चित्ररथातून मांडणे नक्कीच आव्हान होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने हे आव्हान लीलया पेलले आणि विठ्ठलाच्या पदस्पर्शाने राजपथच नव्हे, तर अवघा देश भारावला. सहा गोल रिंगणांपैकी एक रिंगण, डोईवर तुळस घेतलेली वारकरी महिला, कोरलेल्या डोंगरावर वारकऱ्यांच्या ३०० प्रतिमा, ज्ञानेश्वर- तुकोबारायांची लोभस मूर्ती, माउली व सेवकाचे दोन अश्व, इंद्रायणीकाठचे मंदिी.. सारेच मंत्रमुग्ध! माती, फायबर ग्लास व प्लास्टर आॅफ पॅरीसने या कलाकृती अवतरल्या होत्या. ही कलाकृती कोठली, त्यामागील कारणे आणि वारी म्हणजे काय हे वर्णन निवेदक करत होते, तेव्हा उपस्थित लाखो भारतीयांची टाळ्यांची साथ होती. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्रासह गुजरातेतील केंद्रीय मंत्र्यांनी आसनावरून उठून या चित्ररथाला दाद दिली.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहुणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना वारीची माहिती दिली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही बारकावे सांगितले.. तेव्हाच ही कलाकृती देश डोक्यावर घेईल याचा अदमास आला होता. झालेही तसेच.! पांडुरंगाच्या पंढरीच्या वारीने देशात पहिला क्रमांक मिळवला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा हा गौरव आहे. हा विषय धार्मिक असल्याचा समज होता, त्यामुळे संरक्षण विभागाच्या संकल्पना निवड समितीने त्यातील अनेक बारकावे तपासल्यावर या संकल्पनेत जीव ओतायला चार महिने लागले. दिल्लीत येऊन कलाकृती निर्मितीसाठी कष्ट पडतात, ते कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे, नृत्यदिग्दर्शक संतोष भांगरे, सांस्कृतिक कला संचालक अजय अंबेकर, सहसंचालक मनोज सानप या साऱ्यांनी घेतले आणि मुत्सद्देगिरीच्या राजकीय कंगोऱ्यांनी जगाचे लक्ष वेधलेल्या प्रजासत्ताकाच्या यंदाच्या सोहळ्यावर ‘वारी’च्या यशाने मराठी मुद्रा कोरली गेली. दहा वर्षांची तीन मुले या वारीत होती. दिल्लीतील थंडी मी-मी म्हणत असताना हे सारेच सराव अनवाणी पायाने करायचे. एक-दोन नव्हे तब्बल १५ दिवस सकाळी सात वाजतापासून त्यांनी सराव केला. कडाक्याच्या थंडीची सवय पायाला व्हावी व वारकऱ्यांच्या भावनेला कोणत्याही स्थितीत तडा जाऊ नये म्हणून तंतोतत परिणाम साधणारे कष्ट त्यांनी उपसले. त्याचे चीज झाले!!गडकरींची झणझणीत दही मिसळ!नितीन गडकरींचे आदरातिथ्य प्रसिद्ध आहे. बिल व मिलिंडा गेट्स यांनाही त्यांनी दही मिसळ, पोहे, मक्याचे वडे खाऊ घातले. गडकरींच्या पत्नी कांचन यांनी तयार केलेले हे पदार्थ गेट्स दांपत्यानी हाश हुश करीत खाल्लेही!! जगाच्या पाठीवर आपली नाममुद्रा कोरणाऱ्या या दांपत्यासंदर्भातील हा प्रसंग आठवण्याचे कारण म्हणजे यंदा बिल दांपत्याला भारत सरकारने पद्मभूषण किताब जाहीर केला. हे दांपत्य भारतात अनेकदा आले. राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या भेटीही घेतल्या. सरकारी योजनांसाठी अब्जावधींची मदत केली. पण त्यांच्या दातृत्वाची कदर गडकरींनी केली. पंतप्रधानांनी जेव्हा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या जागतिक पातळीवरील नावांची चर्चा केली, तेव्हा गडकरींनी गेट्स दांपत्याचे नाव सुचविले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोसला गेले होते. तिथे गेट्स फाउंडेशनने महाराष्ट्रात पुणे येथे काही उपक्रम सुरू करण्यासाठी पाऊल उचलले.. आणि विकासाची नवी खिडकी किलकिली झाली. पण सुरुवात होती नागपुरी झणझणीत दही मिसळपासून.