शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मेक इन फडणवीस

By admin | Updated: February 8, 2016 03:35 IST

हा आठवडा मुंबई, महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मेक इन इंडिया’चा पहिला सप्ताह मुंबईत होतोय

हा आठवडा मुंबई, महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मेक इन इंडिया’चा पहिला सप्ताह मुंबईत होतोय. भरगच्च कार्यक्रम असतील. जगभरातील अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी, गुंतवणूकदार, वाणिज्य व व्यापारमंत्रीही येताहेत. हा सप्ताह आयोजित करण्याचा पहिला मान महाराष्ट्राला देऊन पंतप्रधानांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विशेष विश्वास टाकला आहे. महाराष्ट्राला जगासमोर दमदारपणे सादर करण्याची फडणवीस यांनाही संधी मिळत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्रात गुंतवणुकीची तयारी दर्शविलेल्या उद्योगांच्या प्रतिनिधींची एक परिषद राज्य सरकार एक महिन्यानंतर घेणार आहे. मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय परवा सांगत होते, की ही फॉलोअप अ‍ॅक्शन असेल. सरकार आणि प्रशासन असे हातात हात घालून चालू पाहत आहेत.महाराष्ट्र साधनसंपन्न आहे. अनेक बाबतीत आजही देशात नंबर वन आहे. बाहेरून हे चित्र चांगले दिसते पण आतून तसे नाही. विदर्भ, मराठवाडा, कोकणच्या बऱ्याचशा भागाला औद्योगिक विकासाचा हवा तसा स्पर्श झालेला नाही. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक परिसरातच महाराष्ट्रातील ९० टक्के उद्योग एकवटलेले आहेत. विदर्भ, मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यांमधील परिस्थिती भयावह आहे. पाण्यासाठी येत्या काही दिवसांत खून पडतील की काय अशी भीती आहे. बेरोजगारांची मोठी फौज या भागात आहे. इंडिया विरुद्ध भारत असा आपल्या देशात संघर्ष असल्याचे शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी सांगायचे. आजच्या महाराष्ट्राचीही तीच खंत असून, विदर्भाचे असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ती दूर होण्याची अपेक्षा आहे. मेक इन इंडियांतर्गत मेक इन विदर्भ, मराठवाडा अन् कोकणचा ठरायला हवा. या भागांमध्ये विकासाची गंगा आणण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले तर ते एका अर्थाने ‘मेक इन फडणवीस’देखील असेल. त्यांच्या नेतृत्वावरील लोकांचा विश्वास वाढेल. मेक इन महाराष्ट्रसाठी केवळ औद्योगिक गुंतवणूक महत्त्वाची नाही; राज्य भ्रष्टाचारमुक्त करणेही तितकेच जरुरी आहे. सिंचन, सार्वजनिक बांधकाम आणि वन खात्याला परस्पर निधीवाटपाचे असलेले अधिकार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रद्द करीत पारदर्शकतेच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकले आहे. वखार महामंडळातील वाहतूक दर घोटाळे, एफडी घोटाळे, शिष्यवृत्ती घोटाळे, शासकीय रुग्णालयांमधील अन्नधान्य पुरवठ्यात घोटाळे असे एकामागून एक घोटाळे समोर येत आहेत. हे घोटाळे रोखण्याबरोबरच ते भविष्यात होऊ नयेत यासाठी पारदर्शक धोरणे फडणवीस सरकारने आणणे अपेक्षित आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांची तशी मानसिकता दिसते. आदिवासी, आरोग्य, शिक्षण अशा खात्यांनीही पुढे आले पाहिजे. जाता जाता : १) परभणी तालुक्यातील ठोळा गावातून परवा कॉम्रेड गणपत भिसे या अवलिया कार्यकर्त्याचा फोन आला. सांगत होता की ठोळा गावात लिंबाबाई उफाडे या महिलेचे प्रेत दोन दिवसांपासून पडून आहे कारण ती मातंग समाजाची आहे आणि या समाजासाठी गावात मसणवटा नाही. आधी एका खासगी पण पडिक जमिनीवर अंत्यसंस्कार करायचे ते लोक पण जमीनमालकाने आता मनाई केली आहे. मातंग समाजाला सरकारी जागा मसणवटासाठी दिली तर गावात दंगल होईल, असा इशारेवजा ठराव ग्रामसभेने केला आहे. त्यामुळे या समाजाचे हाल मरणानंतरही संपेनात. गणपतकडून हे ऐकताना मन सुन्न झालं. राज्यातील असंख्य गावांमध्ये जातीपातींच्या स्मशानभूमी वेगवेगळ्या आहेत. १७ हजार गावांमध्ये दलितांच्या स्मशानभूमीचे वांधे असल्याचा अहवाल आलाय. बाबासाहेब! आम्हाला माफ करा. घटनेने आम्हाला समानता दिली पण माणसांच्या मनातील जात काही जात नाही हो! दलितांसाठी ‘मेक इन मसणवटा’ कधी होईल ते पाहायचे!!२) विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक अ‍ॅड. मधुकरराव (मामा) किंमतकर सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. ८ तारखेला बायपास आहे. हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेलो तर विदर्भ विकासासाठी राज्यपालांच्या निदेशांमध्ये काय काय असावे याची वीस पानांची नोट दिली. म्हणाले, ही मुख्यमंत्र्यांना तत्काळ द्या. बायपासला सामोरे जातानाही मामा विदर्भाला हृदयातून बायपास होऊ देत नाहीत हे बघून डोळ्याच्या कडा पाणावल्या.- यदु जोशी