शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 08:05 IST

राज्याचा नवा शैक्षणिक आराखडा पाहिला की, आपली खरी इयत्ता समजते.

शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान आपल्या व्यवस्थांना कधी येईल, ते समजत नाही. नवनव्या मलमपट्ट्या दिल्या जातात, पण मूलगामी विचार करण्याची तयारी कोणाचीच नसते. वरवरच्या मलमपट्ट्या म्हणजे धोरण नव्हे. राज्याचा नवा शैक्षणिक आराखडा पाहिला की, आपली खरी इयत्ता समजते. माणूसपणाचा गाव समजावा, स्वतंत्रपणे विचार करता यावा, स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे राहता यावे, छान अभिव्यक्त होता यावे, कृतीच्या दिशेने पावले पडावीत आणि कलेचे बोट पकडून अवघ्या आयुष्याचा आनंदसोहळा साजरा करता यावा, हे शिक्षणाचे खरे प्रयोजन! मुले-मुली तशी घडायला हवीत. पण, एखाद्या ‘क्रॅश कोर्स’च्या थाटात अवघ्या शिक्षण प्रक्रियेकडे पाहिले गेले की काय घडते, त्याचे पुरावे आपल्याला दिसत आहेत.

दीर्घकालीन दृष्टी नसेल तर आणखी वेगळे ते काय होणार? तेच होणार, जसा राज्याचा नवा शैक्षणिक आराखडा आहे! केंद्राने २०२० मध्ये लागू केलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीच्या दृष्टीने, राज्याच्या शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) नुकताच राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ चा (एससीएफ-एसई) अंतिम मसुदा जाहीर केला. मे महिन्यात जाहीर झालेल्या पहिल्या मसुद्यानंतर त्यावर टीका होत होती, तशी ती आताही होत आहे. या अंतिम मसुद्यातील काही मुद्यांवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. या आराखड्याचा पहिला मसुदा जाहीर झाला, तेव्हा त्यातील अनेक मुद्दे आक्षेपार्ह झाले होते. त्यानंतर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना असे जाहीर करावे लागले होते की, संबंधित घटकांशी चर्चा करून नवा मसुदा तयार करण्यात येईल. त्यानुसार अंतिम मसुदा बनवण्यात आला. त्याला सुकाणू समितीने मंजुरी दिली. मात्र, हा अंतिम मसुदाही वादग्रस्त ठरला आहे. त्याला काही कारणे आहेत. पहिल्या मसुद्याप्रमाणेच या मसुद्यातही इंग्रजी या विषयाची वर्गवारी ‘परदेशी भाषा’ या सदरात केली आहे.

वास्तविक देशाच्या राज्यघटनेने इंग्रजी ही अधिकृत भाषा म्हणून मान्य केली आहे. तरीही इंग्रजीला परदेशी भाषा म्हटल्यामुळे वाद निर्माण झाला.  ‘फॉरेन लॅंग्वेजेस’ असे आपण म्हणतो, तेव्हा त्यात इंग्रजी अपेक्षित नसते. आता विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात ‘स्टॅंडर्ड इंग्लिश’ आणि ‘ॲडव्हान्स्ड इंग्लिश’ असे दोन पर्याय देण्यात येतील. ‘स्टॅंडर्ड इंग्लिश’ विषयात नेहमीचे इंग्रजी शिकवले जाईल तर ‘ॲडव्हान्स्ड इंग्लिश’मध्ये मुलांची टोफेल, जीआरई आदी परीक्षांसाठी तयारी करून घेण्यात येईल. मुळात, भाषा अशी शिकवली जाते का? त्या भाषेचे सौंदर्य मुलांना समजायला हवे. त्यांचे त्या भाषेशी नाते जडायला हवे. त्यांना स्वतःला अभिव्यक्त करता यायला हवे. ते सोडून इथे काय तर, ‘टोफेल’ची तयारी! अरे, ही शाळा आहे की गल्लाभरू ‘कोचिंग क्लास’?

यंदा परकीय भाषेमध्ये हिब्रूचाही पर्याय देण्यात आला आहे. त्यासह जर्मन, फ्रेंच, जपानी, स्पॅनिश, चायनीज, पर्शियन आणि अरबी भाषांचा पर्याय आहे. हिंदी पहिलीपासून असेल. मराठी मातृभाषा असलेल्या मुलांनी पहिलीपासून हिंदी का शिकायची आणि मुळात अशा घडत्या वयात किती भाषांना तोंड द्यायचे? उद्याच्या स्पर्धेसाठी मुलांना तयार करण्याच्या नादात, मुलांना आपण रेसचे घोडे करतो आहोत, हेच आपल्या धोरणकर्त्यांना कळत नाही. पहिलीपासून ‘शेती’ या विषयाचा अंतर्भाव आता केला जाणार आहे. या निर्णयाचे मात्र स्वागत करायला हवे. मुलांचे मातीशी नाते घट्ट व्हावे, यासाठी शेती अभ्यासक्रमात हवीच. पण, ती फक्त दोन-चार मार्कांपुरती नको. अवघे ‘ॲग्रीकल्चर’ मुलांना समजायला हवे. अकरावी-बारावीसाठी तब्बल चाळीस विषय नऊ गटांमध्ये विभागले आहेत. त्यातून आठ विषय निवडावे लागतील. पर्याय आहेत, हे चांगले आहे. हा नवा आराखडा पुढच्या वर्षापासून प्रत्यक्षात येईल. गणित आणि विज्ञान या विषयांसाठी ‘एनसीईआरटी’ने मान्यता दिलेली पाठ्यपुस्तके राज्य बोर्डाच्या शाळांतही देण्यात येतील. इतिहास आणि भूगोलाचा अभ्यासक्रम बराचसा पूर्वीसारखाच असेल. पण काही प्रमाणात ‘एनसीईआरटी’ने मान्यता दिलेला अभ्यासक्रम समाविष्ट केला जाईल. कारण काय? - तर, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी अधिक चांगल्याप्रकारे तयार करणे!  शिक्षणाचे हे असे ‘व्यापक’ प्रयोजन असेल तर काय बोलायचे? माणूस घडवणे वगैरे शिक्षणाचे प्रयोजन असायला हवे, असे आजवर म्हटले जात होते. त्या सगळ्या अफवा निघाल्या तर!

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा