शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

महावितरणचा अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 07:04 IST

शेती शाश्वत टिकली पाहिजे व कर्जमाफीशिवाय शेतकऱ्याला समृद्ध होता आले पाहिजे, अशी पावले उचलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेती शाश्वत टिकली पाहिजे व कर्जमाफीशिवाय शेतकऱ्याला समृद्ध होता आले पाहिजे, अशी पावले उचलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत. त्यासाठीच्या ठोस उपाययोजना मात्र अद्याप राज्यासमोर आलेल्या नाहीत. शेतकऱ्यांसाठी एक गोंडस योजना सरकारने गतवर्षी जाहीर केली. ‘मागेल त्याला शेततळे’. पण, यासाठी सरकारने केवळ ५० हजार रुपये दिल्याने शेततळे मंजूर होऊनही शेतकरी ते करायला तयार नाहीत, असे चित्र आहे. ५० हजारात शेततळ्याचे खोदकामदेखील होत नाही, असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. शेतकऱ्यांची अशीच फसगत महावितरणने केली आहे. शेती सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम गरज आहे ती विजेची. मात्र, शेतकऱ्यांना वीजजोडच मिळायला तयार नाहीत. शेतकरी वीज चोरी करतात म्हणून महावितरणने ‘महावितरण आपल्या दारी’ ही योजना आखली होती. या योजनेत महावितरणने घरोघर जाऊन शेतकऱ्यांकडून वीज मागणीचे कोटेशन भरून घेतले. पुढे मात्र भ्रमनिरास केला. पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोड दिले नाहीत. वीज मिळाली नसल्याने ओरड सुरू झाली. त्यावर महावितरणने शक्कल लढवत आकडे टाकून वीज घेण्यास सांगितले. या आकड्यांचे बिलही आकारणे सुरू आहे. पण, या आकड्यांमुळे अनेक शेतकरी आपल्या जीवाशी खेळत आहेत. या आकड्यांमुळे ना नवीन शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळते ना पूर्वीपासून नियमित वीजजोड घेतलेल्या शेतकऱ्यांना. अनेक रोहित्रांवरील भार त्यामुळे वाढला आहे. या योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी निधीचा प्रस्ताव सरकार दरबारी पडून आहे. इन्फ्रा १ व इन्फ्रा २ या अशाच महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्यातील कामे सध्या सुरु आहेत. मात्र, ग्रामीण भागापर्यंत गरजेइतक्या पायाभूत सुविधा उभारण्यात महावितरणला अद्याप यश आलेले नाही. भाजप सरकारकडूनही शेतकऱ्यांचा असा छळवाद सुरूच आहे. पूर्वीच्या आघाडी सरकारने तर राज्य भारनियमनमुक्त दाखविण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेती पंपांची बिले चक्क वाढवून लावली, असे एक प्रकरण महावितरणचेच निवृत्त अधिकारी दिवाकर ओरणे यांनी उघड केले आहे. तीन एच.पी.ची जोडणी असणाऱ्या शेतकऱ्याला पाच एच.पी.चे बिल दिले गेले. अशी सुमारे ५ ते ६ हजार कोटींची बिले वाढवून लावली असा आरोप आहे. अजित पवार व सुनील तटकरे ऊर्जामंत्री असताना हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. हा घोटाळा न्यायालयातही पोहोचला आहे.