शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 07:04 IST

शेती शाश्वत टिकली पाहिजे व कर्जमाफीशिवाय शेतकऱ्याला समृद्ध होता आले पाहिजे, अशी पावले उचलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेती शाश्वत टिकली पाहिजे व कर्जमाफीशिवाय शेतकऱ्याला समृद्ध होता आले पाहिजे, अशी पावले उचलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत. त्यासाठीच्या ठोस उपाययोजना मात्र अद्याप राज्यासमोर आलेल्या नाहीत. शेतकऱ्यांसाठी एक गोंडस योजना सरकारने गतवर्षी जाहीर केली. ‘मागेल त्याला शेततळे’. पण, यासाठी सरकारने केवळ ५० हजार रुपये दिल्याने शेततळे मंजूर होऊनही शेतकरी ते करायला तयार नाहीत, असे चित्र आहे. ५० हजारात शेततळ्याचे खोदकामदेखील होत नाही, असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. शेतकऱ्यांची अशीच फसगत महावितरणने केली आहे. शेती सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम गरज आहे ती विजेची. मात्र, शेतकऱ्यांना वीजजोडच मिळायला तयार नाहीत. शेतकरी वीज चोरी करतात म्हणून महावितरणने ‘महावितरण आपल्या दारी’ ही योजना आखली होती. या योजनेत महावितरणने घरोघर जाऊन शेतकऱ्यांकडून वीज मागणीचे कोटेशन भरून घेतले. पुढे मात्र भ्रमनिरास केला. पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोड दिले नाहीत. वीज मिळाली नसल्याने ओरड सुरू झाली. त्यावर महावितरणने शक्कल लढवत आकडे टाकून वीज घेण्यास सांगितले. या आकड्यांचे बिलही आकारणे सुरू आहे. पण, या आकड्यांमुळे अनेक शेतकरी आपल्या जीवाशी खेळत आहेत. या आकड्यांमुळे ना नवीन शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळते ना पूर्वीपासून नियमित वीजजोड घेतलेल्या शेतकऱ्यांना. अनेक रोहित्रांवरील भार त्यामुळे वाढला आहे. या योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी निधीचा प्रस्ताव सरकार दरबारी पडून आहे. इन्फ्रा १ व इन्फ्रा २ या अशाच महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्यातील कामे सध्या सुरु आहेत. मात्र, ग्रामीण भागापर्यंत गरजेइतक्या पायाभूत सुविधा उभारण्यात महावितरणला अद्याप यश आलेले नाही. भाजप सरकारकडूनही शेतकऱ्यांचा असा छळवाद सुरूच आहे. पूर्वीच्या आघाडी सरकारने तर राज्य भारनियमनमुक्त दाखविण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेती पंपांची बिले चक्क वाढवून लावली, असे एक प्रकरण महावितरणचेच निवृत्त अधिकारी दिवाकर ओरणे यांनी उघड केले आहे. तीन एच.पी.ची जोडणी असणाऱ्या शेतकऱ्याला पाच एच.पी.चे बिल दिले गेले. अशी सुमारे ५ ते ६ हजार कोटींची बिले वाढवून लावली असा आरोप आहे. अजित पवार व सुनील तटकरे ऊर्जामंत्री असताना हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. हा घोटाळा न्यायालयातही पोहोचला आहे.