शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

महावितरणचा अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 07:04 IST

शेती शाश्वत टिकली पाहिजे व कर्जमाफीशिवाय शेतकऱ्याला समृद्ध होता आले पाहिजे, अशी पावले उचलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेती शाश्वत टिकली पाहिजे व कर्जमाफीशिवाय शेतकऱ्याला समृद्ध होता आले पाहिजे, अशी पावले उचलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत. त्यासाठीच्या ठोस उपाययोजना मात्र अद्याप राज्यासमोर आलेल्या नाहीत. शेतकऱ्यांसाठी एक गोंडस योजना सरकारने गतवर्षी जाहीर केली. ‘मागेल त्याला शेततळे’. पण, यासाठी सरकारने केवळ ५० हजार रुपये दिल्याने शेततळे मंजूर होऊनही शेतकरी ते करायला तयार नाहीत, असे चित्र आहे. ५० हजारात शेततळ्याचे खोदकामदेखील होत नाही, असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. शेतकऱ्यांची अशीच फसगत महावितरणने केली आहे. शेती सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम गरज आहे ती विजेची. मात्र, शेतकऱ्यांना वीजजोडच मिळायला तयार नाहीत. शेतकरी वीज चोरी करतात म्हणून महावितरणने ‘महावितरण आपल्या दारी’ ही योजना आखली होती. या योजनेत महावितरणने घरोघर जाऊन शेतकऱ्यांकडून वीज मागणीचे कोटेशन भरून घेतले. पुढे मात्र भ्रमनिरास केला. पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोड दिले नाहीत. वीज मिळाली नसल्याने ओरड सुरू झाली. त्यावर महावितरणने शक्कल लढवत आकडे टाकून वीज घेण्यास सांगितले. या आकड्यांचे बिलही आकारणे सुरू आहे. पण, या आकड्यांमुळे अनेक शेतकरी आपल्या जीवाशी खेळत आहेत. या आकड्यांमुळे ना नवीन शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळते ना पूर्वीपासून नियमित वीजजोड घेतलेल्या शेतकऱ्यांना. अनेक रोहित्रांवरील भार त्यामुळे वाढला आहे. या योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी निधीचा प्रस्ताव सरकार दरबारी पडून आहे. इन्फ्रा १ व इन्फ्रा २ या अशाच महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्यातील कामे सध्या सुरु आहेत. मात्र, ग्रामीण भागापर्यंत गरजेइतक्या पायाभूत सुविधा उभारण्यात महावितरणला अद्याप यश आलेले नाही. भाजप सरकारकडूनही शेतकऱ्यांचा असा छळवाद सुरूच आहे. पूर्वीच्या आघाडी सरकारने तर राज्य भारनियमनमुक्त दाखविण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेती पंपांची बिले चक्क वाढवून लावली, असे एक प्रकरण महावितरणचेच निवृत्त अधिकारी दिवाकर ओरणे यांनी उघड केले आहे. तीन एच.पी.ची जोडणी असणाऱ्या शेतकऱ्याला पाच एच.पी.चे बिल दिले गेले. अशी सुमारे ५ ते ६ हजार कोटींची बिले वाढवून लावली असा आरोप आहे. अजित पवार व सुनील तटकरे ऊर्जामंत्री असताना हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. हा घोटाळा न्यायालयातही पोहोचला आहे.