शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महावीरांचा अहिंसा धर्म, हाच खरा विश्व धर्म़़

By admin | Updated: April 19, 2016 02:55 IST

अहिंसेचे अग्रदूत भगवान महावीर यांची २६१५ वी जयंती आज संपूर्ण भारतवर्षात संपन्न होत आहे. भगवान महावीरांचा जन्म एका राजघराण्यात झाला.

अहिंसेचे अग्रदूत भगवान महावीर यांची २६१५ वी जयंती आज संपूर्ण भारतवर्षात संपन्न होत आहे.भगवान महावीरांचा जन्म एका राजघराण्यात झाला. परंतु महावीरांनी त्यात सुख मानले नाही. अल्पवयातच त्यांनी मोहमायेचा त्याग करून तपाचरण केले व सर्व प्राणिमात्राला कल्याणाचा मार्ग दाखविला.आत्मवाद, रत्नत्रयवाद, वस्तू स्वातंत्र्यवाद, अहिंसावाद, अपरिग्रहवाद, अनेकांतवाद, सर्वोदयवाद इ. लोककल्याणकारक सिद्धांताचा महावीरांनी पुरस्कार केला.जीवनातील सर्व समस्यांचे मूळ हिंसा आहे. जैन दर्शनात अहिंसापूर्वक समताच खरा धर्म असल्याचे सांगितले आहे. सुख सर्वांना प्रिय आहे. जसा व्यवहार स्वत:करिता तसाच दुसऱ्याशी असावा. ‘जगा नि जगू द्या’ असा सर्वमान्य संदेश भगवान महावीरांनी दिला. अहिंसा सर्व प्राणिमात्राचा स्वभावधर्म असल्याने तो विश्वधर्म आहे. केवळ जीव वध करण्याने हिंसा होते वा तो न करण्याने अहिंसा होते, असे नव्हे. उलट आपल्या क्रियेत प्रमाद काय आहे, हे महत्वाचे. हेतुरहित कोणतीही कृती हिंसा होत नाही. रागद्वेषादी विकारांना मनात न येऊ देणे अहिंसा होय. भारतासारख्या शांतताप्रिय देशात आज अनेक आव्हाने उभी आहेत. जागतिक दहशतवादास तोंड देण्याची जबाबदारी प्रत्येक देशाला पार पाडावी लागणार आहे. देशाच्या इतिहासात निरपराध माणसाना आपले प्राण गमवावे लागले. कौटुंबिक नातेसंबंधात खून, हाणामारीच्या घटना घडतात. हिंसात्मक कारवायाची यादी न संपणारी आहे. त्याकरिता एकच उपाय आहे, अहिंसेचा अवलंब करणे.‘अहिंसा परमो धर्म:’ ही भगवान महावीरांची शिकवण जगभर पोहोचविण्याची आवश्यकता आहे. जगातील अनेकांना हिंसा नको आहे. जगातील १८७ देशांनी युनोकडे मागणी केली आहे की २ आॅक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून जाहीर करावा. त्याप्रमाणे हा दिवस अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. भगवान महावीरांनी जैन दर्शनात ‘अहिंसा’ अखिल प्राणीमात्रासाठी आहे हे दर्शविले आहे. जे प्राणीमात्रासाठी आहे ते विश्वासाठी आहे व जो धर्म सर्व विश्वासंबंधी आहे तोच विश्वधर्म आहे. देशातील सर्व धर्मांनी, संप्रदायांनी अहिंसेचे समर्थन केले आहे. महाभारत, बुद्ध धर्मातील धम्मपदात याचा उल्लेख आढळतो.भावहिंसा: रागद्वेषादि विकार न होणे ही भाव हिंसा होय.द्रव्यहिंसा: जीवाचा योजनापूर्वक वध करणे ही द्रव्यहिंसा होय.थोडक्यात भावहिंसेत हिंसेची भावना असते.द्रव्यहिंसेत प्रत्यक्ष कृती आहे. जैन दर्शनात अहिंसेचा सूक्ष्म विचार केला आहे. आयुर्वेदात औषधी निर्माण करताना कोणत्याही प्रकारे हिंसा होणार नाही याची दक्षता घेतली आहे.पुष्पार्युवेद ग्रंथात अकरा हजार जातीच्या फुलांच्या उपयोगाने औषध तयार करण्याच्या अहिंसक प्रक्रिया सांगितल्या आहेत. यात केवळ परागरहित फुलांचा उपयोग होतो. भगवान महावीरांनी अहिंसेचा जोरदार पुरस्कार केला. त्यामुळे जैनदर्शन व भगवान महावीर परस्पर पर्याय झाले. अहिंसेने सर्वत्र सामंजस्य निर्माण होऊन सुख, शांती व समाधान मिळेल यात कोणतीही शंका नाही. प्रत्येकाने अहिंसा तत्त्वाचे पालन करण्याचा संकल्प केल्यास खऱ्या अर्थाने भगवान महावीर जयंती साजरी करण्याचे सार्थक होईल.- रवींद्रकुमार बानाईत, जैन