शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अफवांच्या आहारी महाराष्ट्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 05:45 IST

धुळे, बीड, सोलापूर, मालेगाव, माजलगावपासून थेट गोंदियापर्यंत मुले पळविण्याच्या टोळ्या आल्या असल्याच्या अफवांनी राज्यात अनेकांचा बळी घेतला तर अनेकांना कायमचे जायबंदी करून ठेवले आहे.

धुळे, बीड, सोलापूर, मालेगाव, माजलगावपासून थेट गोंदियापर्यंत मुले पळविण्याच्या टोळ्या आल्या असल्याच्या अफवांनी राज्यात अनेकांचा बळी घेतला तर अनेकांना कायमचे जायबंदी करून ठेवले आहे. अफवा पसरविणे हा गुन्हा आहे आणि तो पसरविणारे व त्याचा फायदा घेऊन काही गरीब जीवांना ठार मारणारे लोक हे खुनी इसमांएवढेच गंभीर गुन्ह्यांचे आरोपी आहेत. गेला सबंध आठवडा सारा महाराष्टÑ या आरोपींनी वेठीला धरला असून त्यांच्या अपराधांपायी अनेक निरपराध स्त्री-पुरुष मृत्यू पावले आहेत. लाठ्या-काठ्या, कुºहाडी व मिळेल ते हत्यार हाती घेऊन अशा संशयितांना मारहाण करीत निघणारे लोक पोलिसांकडून क्वचितच पकडले जातात. जे पकडले जातात त्यांना शिक्षाही फारशी कधी होत नाही. अशा आरोपींच्या रक्षणासाठी साक्षीदारांचे तांडे कधीचेच उभेही असतात. मारली जाणारी माणसे सामान्यपणे कमालीचे दारिद्र्य अनुभवणारी व गरीब वर्गातून आलेली असतात. त्यात काही अभागी स्त्रियांचाही समावेश असतो. ही माणसे मुले पळविणारी आहेत अशी अफवा कुणीतरी उठवतो आणि त्यामुळे पेटून जाणारी माणसे त्या संबंधितांचा मरेस्तोवर पाठलाग करतात व प्रसंगी त्यांना जीवानिशीही मारतात. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, त्यात सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे आणि हे राज्य राखण्याचे काम पोलीस करीत आहेत या गोष्टींवरचा विश्वास कायमचा उडून जावा असे सांगणारे हे वास्तव आहे. ज्या शहरात या अफवांपायी निरपराधांचे बळी गेले ती शहरे मोठी व सातत्याने वर्तमानपत्रात उमटणारी आहेत. त्यातल्या जाणत्या व शहाण्या लोकांचा समाजाला परिचयही आहे. झालेच तर त्यात राष्टÑीय व प्रादेशिक पक्षांचे पुढारी कार्यरत आहेत. असे सारे असताना मूठभर माणसे एकत्र येतात आणि निरपराध जीवांचा बळी घेतात हे राज्यात पोलीस, सरकार व कायदा यातले काहीही अस्तित्वात नाही हे उघड करणारे वास्तव आहे. सरकार विकासाच्या घोषणा करते, त्या घोषणांना अंत नसतो. त्यावर होणाऱ्या खर्चाच्या रकमाही कोट्यवधींच्या घरातल्या असतात. मात्र ज्या समाजात माणसे सुरक्षित नाहीत आणि कोणतीही साधी अफवा सामान्य माणसांचा झुंडींकडून बळी घेते त्या राज्यात विकासही फारसे परिवर्तन घडवून आणत नाहीत. सामाजिक सुरक्षा ही सरकारची पहिली व प्राथमिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी पोलीस यंत्रणा व तिची गुन्हेगारांना वाटणारी दहशत या बळावर सरकार पार पाडत असते. दुर्दैव हे की दहशतच आता पोलिसांनी व सरकारनेही गमावली आहे. काही काळापूर्वी गाईंची तस्करी होते म्हणून देशभरात अल्पसंख्यकांच्या हत्या झाल्या. त्यापायी सरकारची साºया जगात बदनामी झाल्यानंतर त्या हत्या थांबल्याचे सध्या दिसत आहे. आताची अफवा गार्इंच्या तस्करीची नसून अल्पवयीन मुला-मुलींची आहे. आपल्या कुटुंबातील मुला-मुलींच्या संरक्षणासाठी आई-बापांचा तळमळणारा जीव साºयांना ठाऊक आहे. साधा मुलांना शाळेतून यायला उशीर झाला तरी त्यांच्या आई-बापांचा जीव टांगणीला लागतो. येथे तर मुले पळविण्याच्याच अफवा उठतात. या अफवा समाजाच्या केवढ्या जिव्हारी लागत असतील याची कल्पना कोणत्याही संवेदनशील माणसाला करता येते. या अफवांनी संतापलेल्या माणसांचा अनावर होणारा आचारही मग समजून यावा असा असतो. तथापि कायदा हाती घेणे व संशयिताला मरेस्तोवर मारहाण करण्यापर्यंत लोकांची पाळी जाणे हा प्रकार केवळ अघोरीच नाही तर दंडनीयही आहे. झालेच तर समाजातील अल्पवयीन मुले व मुली पळविल्या जातात अशा अफवांना जागा असणे हे महाराष्ट्रासारख्या प्रगत व साक्षर राज्यालाही लाज आणणारे आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या व समाज जागृतीत गुंतलेल्या संस्थांसारख्या अनेक संघटना कार्यरत आहेत. त्यांच्याकडून शहर व ग्रामीण भागात लोकशिक्षणाचे कामही सुरू आहे. शिवाय सरकार नावाची सर्वत्र उपलब्ध असणारी व हाताच्या अंतरावर असणारी संरक्षक यंत्रणाही सोबत आहे. तरीही अफवा उठतात आणि त्या निरपराधांचे जीव घेतात हे कायद्याच्या राज्याचे लक्षण नव्हे.

टॅग्स :Dhuleधुळे