शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

दुष्काळाचे कालचक्र सोडेना महाराष्ट्राची पाठ

By सुधीर महाजन | Updated: November 1, 2018 17:49 IST

चव्वेचाळीस वर्षांपूर्वी १९७४ साली दुष्काळाने ग्रामीण महाराष्ट्राची घडी जी विस्कटली ती पुन्हा सावरता आली नाही.

- सुधीर महाजन

चव्वेचाळीस वर्षांपूर्वी १९७४ साली दुष्काळाने ग्रामीण महाराष्ट्राची घडी जी विस्कटली ती पुन्हा सावरता आली नाही. त्यानंतरही दुष्काळ पडला नाही असेही नाही मराठवाडा, विदर्भाच्या तर तो पाचवीला पुजलेला. दोन वर्षे बरी एक वर्ष चांगले आणि दोन वर्षे दुष्काळ असे कालचक्र काही वर्षांत आकाराला येत आहे आणि प्रत्येक दुष्काळाची तुलना ७२ च्या दुष्काळाशी केली जाते. त्याच निकषावर सामान्य माणूस परिस्थिती तपासतो. त्यावेळी खायला अन्न नव्हते. जनावरांना चारा नव्हता, हाताला काम नव्हते. पिण्याच्या पाण्याची टंचाई होती; पण आजच्याइतकी जीवघेणी नव्हती.

दुष्काळग्रस्तांना काम देण्यासाठी रोजगार हमी योजना आली. ही महाराष्ट्राने देशाला दिलेली नवी कल्पना वि.स. पागे यांनी ती मांडली व पुढे सरकारने अमलात आणली. जिचे अनुकरण अनेक राज्यांनी केले. हाताला काम असेल, तर पैसा येतो व परिस्थितीशी झगडण्याचे बळही येते. एक आश्वासक वातावरण निर्माण होते. १९७२ पासूनच टँकर, रोजगार हमी, सुखडी या गोष्टी अस्तित्वात आल्या आणि पोटभरण्यासाठी शहरांची वाट तुडवणारी माणसेही. ही वाट आजही वाहते आहे. एकदा खेडे सुटले की माणूस परतत नाही. जे काम गावात करायची लाज वाटते ते शहरात बिनदिक्कत करतो.

दुष्काळाचा इतिहास तपासला तर पार मागे जावे लागते. ७२ चा दुष्काळ हा २० व्या शतकातील मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा समजला जातो. मराठवाड्याला दुष्काळ तसा नवा नाही. अगदी ताजा विचार करायचा, तर २०१० पासून आठ वर्षांत मधली दोन वर्षे चांगल्या पावसाची सोडली, तर दुष्काळाचा ससेमिरा कायम आहे. इतिहासाचा धांडोळा घेतला तर पार यादवांच्या काळापासून या दुष्काळाने पाठ सोडली नाही. देवगिरीच्या पतनानंतर १३२२ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. अलाउद्दीन खिलजीची त्यावेळी राजवट होती. परकीय आक्रमण आणि दुष्काळ यात जनता भरडली गेली. पुढे १३९६ ते १४०७ हा सलग ११ वर्षांचा मोठा दुष्काळ इतिहासात ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ या नावाने प्रसिद्ध आहे. या दुष्काळाचे वर्णन साहित्यातून, धार्मिक ग्रंथातून आले आहे. रस्त्यावर पडलेले मृतदेह, जनावरांचे सांगाडे या चित्रणावरून त्याची भीषणता जाणवते.

पुढे १६२६ मध्ये मोठ्या दुष्काळाची नोंद आहे. दिल्लीत लोधी घराण्याची राजवट मोगलांनी संपुष्टात आणली आणि इकडे देवगिरीच्या सुभेदारीवरून आझम खानला पायउतार व्हावे लागले त्यावेळी भीषण दुष्काळ पडला. हा दुष्काळ पुढे बरीच वर्षे चालला त्यावेळी मोगल सम्राट शहाजहानने दर आठवड्याला जनतेला पैसे वाटण्याची पद्धत सुरू केली व यासाठी पाच जणांची नियुक्ती केली. यात दख्खनसाठी आजम खानचा समावेश होता. या काळात २० आठवडे दर सोमवारी पाच हजार रुपयांचे जनतेत वाटप केले जात होते. सरकारने सगळीकडे कामे सुरू केली होती. 

पुढे मोठा दुष्काळ औरंगजेबाच्या मराठ्यांवरील आक्रमणाच्या वेळी होता. शिवाजी महाराजांचे निधन झाले आणि उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत उतरला. तो हा काळ त्यावेळी ज्वारी व भाताची पेरणी झाली नव्हती. १७०३ ते १७०७ हा दुष्काळाचा आणखी एक फटका. या काळात मराठ्यांनी मोगलांना जेरीला आणले होते. दख्खनमध्ये अन्नधान्याची टंचाई असल्याने उत्तरेकडून मोगलांनी धान्याचा पुरवठा सुरू केला. त्यावेळी अजिंठा घाटात मराठ्यांनी या धान्याची लूट केली. हा दुष्काळ औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत कायम होता. १७४९ च्या दुष्काळात ज्वारी ८० रुपये पल्ला या दराने विकली गेली, तर १७८७ च्या दुष्काळात १ रुपयाला ९ शेर ज्वारी या दराची नोंद आहे. 

दुष्काळाचा पहिला सरकारी अहवाल निजाम राजवटीत करण्यात आला. १८७५-७६ साली मौलवी महदी अली यांनी हा अहवाल त्यावेळी सादर केला होता. त्यावेळी अपेक्षित उत्पन्न व झालेले उत्पन्न याचा ताळेबंद मांडण्यात आला. बाजारपेठेतील धान्याच्या आवक-जावकची नोंद झाली. दुष्काळ व आक्रमण यातच महाराष्ट्राची १३०० ते १८०० अशी पाचशे वर्षे गेली पुढे परचक्र संपले; पण दुष्काळ पाठ सोडत नाही.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र