शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

आई मेली बाप मेला, सांभाळी तू विठ्ठला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 04:26 IST

सर्व कर्मचारी वर्गाला सेवेत असताना मृत्यू झाला तर वारसांना उपजीविकेचे साधन असेल-नसेल तरी त्यांना हक्काची डाळभात मिळावी, म्हणून १९७१ मध्ये फॅमिली पेन्शन स्कीम निर्माण केली.

- विनायक गोडसेराज्य सरकारी आणि केंद्र सरकारी थेट सेवा सोडून इतर सर्व निमशासकीय आणि खासगी आस्थापना, संस्था, उद्योग, कारखाने, वगैरेमधील सर्व कर्मचारी वर्गाला सेवेत असताना मृत्यू झाला तर वारसांना उपजीविकेचे साधन असेल-नसेल तरी त्यांना हक्काची डाळभात मिळावी, म्हणून १९७१ मध्ये फॅमिली पेन्शन स्कीम निर्माण केली. या योजनेत कर्मचारी, मालक, सरकार यांचे समान योगदान जमा व्हायचे. त्यातून निवृत्त कर्मचाऱ्यांना परतावा मिळण्याचे प्रावधान नव्हते. आणि निवृत्त होणारे सभासद आर्थिक नियोजनाअभावी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी, घर खरेदीसाठी बरेच पैसे खर्च झाल्याने, आता जगायचे कसे? हा प्रश्न उभा राहायचा. हे पाहून सरकारने १९९३ मध्ये पेन्शन योजना मांडली. अनेक कारणांमुळे बºयाच उद्योगांनी आणि संघटनांनी त्याला विरोध केला. म्हणून सरकारने १९९५ मध्ये ईपीएस १९९५ ही योजना अचानक लादली. त्या वेळेस फॅमिली पेन्शन योजनेचे ९ हजार कोटी रुपये या योजनेत वळते केले.या योजनेत दर तीन वर्षांनी पुनरावलोकन करण्याची तरतूद असूनही तसे काही सकारात्मक बदल केल्याचे दिसत नाही. उदाहरणार्थ या योजनेत कॉम्युटेशन करणाºया सभासदांची पेन्शन कमी होते, १००/१५०/१८० महिने वसुली झाली तरी पुन्हा पेन्शनवाढ होत नाही. म्हणजे पठाणी कर्ज फिटते पण ईपीएसचे हप्ते थांबत नाहीत. सभासदांच्या अंशदानावर आधारित योजना असूनही त्याच्या/तिच्या मृत्यूनंतर वारसदार पती/पत्नीला ५० टक्के पेन्शन मिळते.एकूण नोकरीचा सेवाकाळ २० वर्षे पूर्ण झाला तर २ वर्षांचे वेटेज देण्याचा नियम असूनही त्याची अंमलबजावणी केली नाही. २०१६ मध्ये समन्वय समितीच्या चर्चेनंतर ते द्यायला सुरुवात केली. पण परिपत्रकात नमूद केलेले असूनही, स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागलेले सभासद किंवा कंपनी बंद पडलेल्या सभासदांना वेटेज मिळत नाहीत.सन २००६ पासून आर.सी. गुप्ता यांनी हा पेन्शन प्रकरणाचा लढा हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेला. त्यामध्ये निकाल कामगारांच्या बाजूने लागला. सर्वोच्च न्यायालयाने १९९५ पासूनचे पूर्ण ८.३३ टक्के अंशदान स्वीकारण्याचा निर्णय दिला. आपल्या राज्यघटनेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कायदा म्हणून देशभर अमलात आणावा. मग या निकालाचा वेगळा अर्थ लावून ३१ मे २०१७ ला नवीन परिपत्रक काढून काही ठरावीक सभासदांना या निर्णयापासून वंचित करण्याचे अधिकार पीएफ कमिशनरना आहेत का, याचा शोध घेणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर न्यायालयात खटला सुरू असताना अशा प्रकारे नियमात बदल करणे कायद्यात बसते का?सन २००९ मध्ये प्रकाश जावडेकर यांनी हा विषय पुढे आणला. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यामुळेच कोशियारी समितीची रचना झाली. पण २०१३ मध्ये समितीचा अहवाल आल्यानंतर तेव्हाच्या सरकारने स्वीकारला नाही. पण नंतर आलेल्या सरकारनेही नाही स्वीकारला. मार्च २०१७ अखेर या फंडात तीन लाख दहा हजार कोटी रुपये जमा होते. त्यात दरमहा सुमारे ६०० कोटी रुपये जमा होतात. योजनेच्या सुरुवातीपासूनच ईपीएफओला मिळणाºया वार्षिक व्याजातील फक्त १/३ रक्कम पेन्शनसाठी खर्च होते. म्हणजेच दरवर्षी ही रक्कम चक्रवाढ व्याजाने वाढते. तरीही सरकार पैसे नाहीत, असे म्हणते. ४९ हजार कोटी रुपये विनादावा रक्कम आहे. त्यातले पैसे द्या असे म्हणत नाही. पण त्यावर व्याज जमतेच ना! १९९८ पासून बंद पडलेल्या कंपनी, निवृत्त सभासदांचे निवृत्तिवेतन ५० ते ६० रुपयांची भर पडून ६०० च्या आसपास आहे. फार तर ९०० रूपये मिळते आहे.अलीकडेच बंडारू दत्तात्रय, नंतर गंगवार यांची भेट घेतली. सर्व खासदारांना स्वतंत्र पत्रे लिहिली. २१ फेब्रुवारी २०१८ रोजी दिल्ली येथे रामलीला मैदानावर मेळावा आणि एकदिवसीय उपोषण केले. सरकारने आश्वासनाखेरीज काहीच दिले नाही. ज्या खासदारांनी आमची मागणी संसदेत मांडली, आम्ही त्यांचे आभार मानतोच, पण विशेषत्वाने माननीय एन.के. प्रेमचंद्रन यांचे आम्ही ऋणी आहोत. आमची ईपीएफओकडे, सरकारकडे एवढीच मागणी आहे की, कोशियारी समितीची अंमलबजावणी करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर ठेवून ३१ मे २०१७ चे परिपत्रक मागे घ्यावे. ईपीएफ १९५६ च्या कायद्यानुसार जो सेवेत आहे आणि १ सप्टेंबर २०१४ नंतर निवृत्त होणाºया सभासदांना हा पेन्शन लाभ पूर्णपणे मिळू न देणे अन्यायकारक आहे. सरकारच्या धोरणाप्रमाणे आम्हाला उत्पन्न कमी असूनही स्वस्त धान्य मिळत नाही, फुकट औषध मिळत नाही, रुग्णालयात सवलत मिळत नाही आणि या सर्वासाठी लागणारा पैसा देण्याची जबाबदारी असून, पैसे असून, सरकार पेन्शन वाढवत नाही. सर्वच राजकीय पक्षांच्या कामगार संघटना होत्या आणि आहेत. पण नोकरीतून बाहेर पडल्यावर मालक आणि युनियन दोघांनीही आम्हाला वाºयावर सोडले. संत जनाबाई एका अभंगात म्हणतात, आई मेली बाप मेला, आता सांभाळी तू विठ्ठला, अशी ही अवस्था आहे.(अध्यक्ष, निवृत्त कर्मचारी समन्वय समिती, राष्ट्रीय संघटना)