शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपने लक्ष्मणरेषा ओलांडली, गुंता झाला!

By shrimant mane | Updated: June 5, 2024 10:06 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: पेच मतदारांची मने जिंकण्याचा नाही तर पक्षीय राजकारणातील डावपेचाच्या मर्यादांचा! 

 - श्रीमंत माने, (संपादक, लोकमत, नागपूर)

भारतीय जनता पक्ष व काँग्रेसचा आलटून-पालटून बालेकिल्ला असलेल्या विदर्भात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, तसेच यशोमती ठाकूर व सुनील केदार यांनी प्रतिष्ठेच्या जागा जिंकल्या. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दणका बसला. विदर्भात फासे उलटे पडले. नितीन गडकरींसारखा कर्तबगार चेहरा असूनही नागपुरातील मताधिक्य घसरले, सुधीर मुनगंटीवारांना बळेच घोड्यावर बसविणे अंगलट आले. प्रतिष्ठेची रामटेकची जागा गेली. पक्षसहकाऱ्यांचा रोष पत्करून नवनीत राणा यांना अमरावतीच्या उमेदवारीचा जुगार उलटा पडला. खानदेशातील जळगाव, रावेरने लाज राखली. अकोल्याने दिलासा दिला, तरी  तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे आव्हान भाजपसाठी आता अधिक कडवे बनले आहे. 

भाजपपुढील पेच मतदारांची मने जिंकण्याचा नाही तर पक्षीय राजकारणातील डावपेचाच्या मर्यादांचा आहे. फडणवीस-बावनकुळे ही जोडी इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर इतके काही करीत गेली, की एका क्षणी त्यातून काही कळूच नये इतका त्याचा गुंता झाला. एक गाठ सोडवायला गेले की दुसरी आपोआप बसू लागली. जागावाटपाच्या पुढे जाऊन कथित सर्व्हेचे कारण देत मित्रपक्षांचे उमेदवार ठरविणे, उमेदवार नसेल तिथे तो उपलब्ध करणे, त्यांच्या निवडणुकीचे व्यवस्थापन हातात ठेवणे, हे सारे आघाडीच्या राजकारणातील लक्ष्मणरेषा ओलांडणे होते. तसे झाल्याने रामटेक, परभणी, उस्मानाबादच्या जागा गेल्या. मतदारांना हे एकाच पक्षाचे व त्यातील निवडक नेत्यांचे इतके नियंत्रण खरेच रुचते का, याचा आता विचार करावा लागेल. 

या गुंत्याला आणखी मोठा, राज्यव्यापी कंगोरा आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे विधानसभेतील सर्वाधिक जागांचा भाजप सत्तेवर आला. लोकसभा निवडणुकीत सत्तेची मदत झाली, हे खरे. परंतु, ही फोडाफोडी मतदारांना आवडली नाही. खापर भाजपवर फुटले. उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती तयार झाली. तिचा फटका बसू नये म्हणून महापालिका, जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. सगळीकडे प्रशासकीय राजवट आली. त्यामुळे निवडणूक व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाच्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले गेले. सामान्यांची कामे होईनात व त्यांच्या तक्रारी ऐकण्याची, सोडविण्याची व्यवस्था माजी नगरसेवक, जि. प. सदस्यांकडे नाही. त्या रागाचा सामना लोकसभेच्या उमेदवारांना करावा लागला. आता लोकसभेच्या निकालानंतर लगेच त्या निवडणुका घ्याव्यात तरी पंचाईत होणार हे नक्की आणि  न घ्याव्यात तर विधानसभेवेळी काय करायचे, असा आणखी जटिल पेच उभा राहिला आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल