शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

महाराष्ट्र कन्यांची गैरहजेरी !

By admin | Updated: March 20, 2015 23:17 IST

व्हीप जारी केल्यावरही गैरहजर राहणाऱ्या २५ खासदारांची पंतप्रधान मोदी यांच्याकरवी झाडाझडती अजिबात चुकीची नाही

व्हीप जारी केल्यावरही गैरहजर राहणाऱ्या २५ खासदारांची पंतप्रधान मोदी यांच्याकरवी झाडाझडती अजिबात चुकीची नाहीमहाराष्ट्र कन्यांची लोकसभेतील गैरहजेरी दिल्लीच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. पूनम महाजन व प्रीतम मुंडे या दोन्ही कन्या त्यांच्या वडिलांच्या पुण्याईने राजकारणात ओळखीच्या असल्याने त्यांची भूसंपादन विधेयकावरील मतविभाजनप्रसंगी झालेली ‘दांडीयात्रा’ लक्षवेधी ठरली. लोकसभेत पूनम महाजन, रक्षा खडसे, हीना गावित व प्रीतम मुंडे या संख्येने चौघी असल्या तरी ‘चारचौघी’ नाहीत! त्या सर्वार्थाने वेगळ्या आहेत. पूनम यांच्यामागे प्रमोद महाजन यांची प्रभा आहे. एकनाथ खडसे यांच्या राजकीय वारस म्हणून रक्षा लोकसभेत आल्या. राष्ट्रवादीतून आख्खं गावित घराणं भाजपात येण्यासाठी हीना कारणीभूत ठरल्या, तर गोपीनाथ मुंडे यांच्या राष्ट्रीय प्रतिमेचे प्रतिबिंब प्रीतम यांच्यात शोधण्यात आले. राजकारण त्यांच्यासाठी नवखे नाहीच. महाजन व मुंडे या नावाचा धाक, दबदबा भाजपात असताना, २८२ खासदारांच्या भाजपा सांसदीय पक्षाच्या सप्ताह बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोघींना उभे केले आणि गैरहजेरीबाबत जाब विचारला. दोन राज्यमंत्र्यांसह २५ खासदारांना असेच विचारण्यात आले. पण पूनम व प्रीतम, त्यांच्या भारदस्त राजकीय परंपरेमुळे केंद्रस्थानी आल्या. आरोग्यविषयक कारणे सांगून दोघींनी ‘मोदीसरांच्या या क्लास’मधून अलगद आपली सुटका करून घेतली तरी त्यांना साऱ्यांसमोर उभे करून अपमानीत करण्याचा भाजपा नेतृत्वाचा उद्देश नव्हता. ‘तुम्ही कितीही मोठे असा, पक्षशिस्तीपुढे सारेच समान’ हा संकेत साऱ्यांना द्यायचा होता. मोदींनी ज्यांना उभे केले, त्या २५ पैकी १३ जण पहिल्यांदाच खासदार झाले आहेत. ज्यांची ही दुसरी टर्म आहे असे सात जण आहेत. त्यांनाही उभे केल्याने ‘आपले लक्ष सर्वांवरच आहे, तुम्ही मन मानेल तसे वागू नका’, असे सुनावण्यासही मोदींनी कमी केले नाही. खरं तर, पूमन किंवा प्रीतम या गुणी खासदार आहेत. अकराच्या ठोक्याला त्या सभागृहात हजर असतात. सभागृहातील उपस्थितीही ९० टक्क्यांच्या पलीकडे आहे. सभागृहातील गांभीर्याचे प्रसंग त्या पाहतात. स्वत:चे अनेक विषय मांडतात. दुसऱ्यांचे विषय जाणून घेतात. इतर खासदारांचे मुद्दे पटले तर त्यांना अनुमोदनही देतात. ‘लुप्त होणाऱ्या भारतीय भाषांचे संवर्धन केले पाहिजे’, यावरील पूनम महाजन यांनी मागच्या सत्रात केलेले भाषण स्मरणीय ठरले. कैक वर्षांनी तरुण खासदाराचे असे मुद्देसूद भाषण ऐकायला मिळाले, अशा शब्दात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पूनम यांचे कौतुक केले होते. संपूर्ण सभागृहाच्या टाळ्या त्यांनी मिळवल्या होत्या. या सत्रात आरोग्यविषयक चर्चेत प्रीतम यांनी आरोग्याच्या सोयी व लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अत्यंत मुद्देसूद मांडणी केली. पूनम व प्रीतम यांची सांसदीय कामकाजातील वाटचाल लक्षवेधक आहे. यामुळे मोदींसमोरील त्यांची ‘हजेरी’ चर्चेचा विषय ठरली व राजकारणातील दिग्गजांच्या कन्या महत्त्वाच्या वेळी गैरहजर राहतात म्हणून टीकेचेही लक्ष्य झाली. सरकारसाठी जीव की प्राण झालेले भूसंपादन विधेयक बहुमताच्या जोरावर लोकसभेत मंजूर झाले असले तरी बहुमत असल्याने खासदारांनी बिनधास्त वागणे मोदींना अपेक्षित नाही. मतविभाजनाच्या वेळी पक्षादेश (व्हीप) असूनही खासदारांनी पूर्वसूचना न देता दांडी मारणे मोदींना आवडलेले नाही. त्यांनी सांसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांना सांगून या खासदारांची खरडपट्टी काढण्याच्या सूचना दिल्या. पण नायडूंनी हे पातक नको म्हणून ‘गैरहजेरांची’ यादी मोदींपुढे धरली आणि तुम्हीच काय तो निर्णय करा, असे सांगितले. तेव्हा नायडूंनी नाव पुकारायचे आणि मोदींनी ‘चला उभे राहा’ असे म्हणायचे ठरले. बैठकीत झालेही तसेच ! मुळात सर्वच पक्षात व्हीप निघतात, त्याचे अनेकदा उल्लंघनही होते. पण बहुमत असूनही भाजपाने दखल घेतली. त्यामुळे मोदींची ही भूमिका चुकीची नाही. व्हीप जारी केल्यावरही गैरहजर राहणे हा मामला पक्षाच्या दृष्टीने चिंताजनक होतो. मागच्या रेल्वे अर्थसंकल्पाला हीना गावित यांनी दांडी मारली होती, तर मोदींनी बोलाविलेल्या खासदारांच्या पहिल्याच बैठकीला रक्षा खडसे उशिरा पोचल्या होत्या. तेव्हाही पक्षाच्या दप्तरात याची नोंद झाली होती. यावेळी मुद्दाच अस्मितेचा होता, त्यामुळे म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो, या तात्पर्यापर्यंत ही कथा पोहोचली.- रघुनाथ पांडे