शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

महाश्रमदानाची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:11 IST

अभिनेता आमिर खान याने दिलेल्या भेटीनंतर या गावातील नागरिकांमध्ये संचारलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता.

काकडदरा वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातलं छोटसं पण टुमदार गाव. पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीने प्रकाशझोतात आलेलं. अभिनेता आमिर खान याने दिलेल्या भेटीनंतर या गावातील नागरिकांमध्ये संचारलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता. म्हणूनच तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे बक्षीस या गावाने पटकावले. यंदाही आमिर खान यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना श्रमदान आणि पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा या वर्षीही चांगलीच रंगात आहे. वर्धा जिल्ह्यातील रानवाडी येथील बंडू धुर्वे या अंध व्यक्तीच्या कार्याने प्रभावित होऊन आमिर खान याने परवा पत्नी किरण राव यांच्यासह चक्क रानवाडी गाठले. आठ तास मुक्कामच केला नाही तर हातात फावडे आणि टोपले घेत श्रमदान केले. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातही चिमुकल्यांनी मोठ्यांचा आदर्श घेत वॉटर कप स्पर्धेत खारीचा वाटा उचलला आहे. त्याचीही दखल आमिरने घेतली. चिमुकल्यांना भेटून त्यांचे मनोबल वाढविले. शिवाय आपल्या वॉटर कप स्पर्धेच्या लघु चित्रपटातही त्याने या चिमुकल्यांना स्थान दिले. त्यामुळे बोरी महल या लहानशा गावाचे महत्त्वही आपसूकच वाढले आहे. पाणीटंचाईने गावा गावात हाहाकार माजविला असून त्यापासून सुटका म्हणजे आपले गाव पाणीदार करणे. त्यामुळे गावागावात चुरस लागली असून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो हात महाश्रमदानात लागले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तर अपुऱ्या पावसाने पाणीटंचाईत चांगलीच भर घातली आहे. याची चाहूल हिवाळ्यातच लागली होती. पैनगंगा नदी हिवाळ्यातच आटल्याने तिरावरील ५० गावात पाणीटंचाई निर्माण झाली. पुसद तालुक्यातील माळपठार भागातील ४० गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अखेरच्या घटका मोजत आहे. यावर मात करण्यासाठी आणि पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचे काम वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. पाण्याची सोय वेळीच केली नाही तर उद्याचे भवितव्य अंध:कारमय आहे, असा संदेशही या माध्यमातून दिला जात आहे. हे आता चिमुकल्यांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे बोरी महल येथील विद्यार्थी आता स्वत:च रोपवाटिका तयार करतात. शोषखड्ड्यांसाठी श्रमदान करतात. बंधाºयाची आखणी करून देण्यात तर ते तरबेज झाले आहेत. ढाळीचे बांध व इतर बंधारे तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. गाव पाणीदार करण्याच्या दिशेने चिमुकल्यांनी उचललेले पाऊल निश्चितच अभिनंदनीय असून इतरांनीदेखील त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा