शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महाश्रमदानाची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:11 IST

अभिनेता आमिर खान याने दिलेल्या भेटीनंतर या गावातील नागरिकांमध्ये संचारलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता.

काकडदरा वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातलं छोटसं पण टुमदार गाव. पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीने प्रकाशझोतात आलेलं. अभिनेता आमिर खान याने दिलेल्या भेटीनंतर या गावातील नागरिकांमध्ये संचारलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता. म्हणूनच तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे बक्षीस या गावाने पटकावले. यंदाही आमिर खान यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना श्रमदान आणि पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा या वर्षीही चांगलीच रंगात आहे. वर्धा जिल्ह्यातील रानवाडी येथील बंडू धुर्वे या अंध व्यक्तीच्या कार्याने प्रभावित होऊन आमिर खान याने परवा पत्नी किरण राव यांच्यासह चक्क रानवाडी गाठले. आठ तास मुक्कामच केला नाही तर हातात फावडे आणि टोपले घेत श्रमदान केले. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातही चिमुकल्यांनी मोठ्यांचा आदर्श घेत वॉटर कप स्पर्धेत खारीचा वाटा उचलला आहे. त्याचीही दखल आमिरने घेतली. चिमुकल्यांना भेटून त्यांचे मनोबल वाढविले. शिवाय आपल्या वॉटर कप स्पर्धेच्या लघु चित्रपटातही त्याने या चिमुकल्यांना स्थान दिले. त्यामुळे बोरी महल या लहानशा गावाचे महत्त्वही आपसूकच वाढले आहे. पाणीटंचाईने गावा गावात हाहाकार माजविला असून त्यापासून सुटका म्हणजे आपले गाव पाणीदार करणे. त्यामुळे गावागावात चुरस लागली असून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो हात महाश्रमदानात लागले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तर अपुऱ्या पावसाने पाणीटंचाईत चांगलीच भर घातली आहे. याची चाहूल हिवाळ्यातच लागली होती. पैनगंगा नदी हिवाळ्यातच आटल्याने तिरावरील ५० गावात पाणीटंचाई निर्माण झाली. पुसद तालुक्यातील माळपठार भागातील ४० गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अखेरच्या घटका मोजत आहे. यावर मात करण्यासाठी आणि पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचे काम वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. पाण्याची सोय वेळीच केली नाही तर उद्याचे भवितव्य अंध:कारमय आहे, असा संदेशही या माध्यमातून दिला जात आहे. हे आता चिमुकल्यांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे बोरी महल येथील विद्यार्थी आता स्वत:च रोपवाटिका तयार करतात. शोषखड्ड्यांसाठी श्रमदान करतात. बंधाºयाची आखणी करून देण्यात तर ते तरबेज झाले आहेत. ढाळीचे बांध व इतर बंधारे तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. गाव पाणीदार करण्याच्या दिशेने चिमुकल्यांनी उचललेले पाऊल निश्चितच अभिनंदनीय असून इतरांनीदेखील त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा