शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

महाश्रमदानाची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:11 IST

अभिनेता आमिर खान याने दिलेल्या भेटीनंतर या गावातील नागरिकांमध्ये संचारलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता.

काकडदरा वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातलं छोटसं पण टुमदार गाव. पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीने प्रकाशझोतात आलेलं. अभिनेता आमिर खान याने दिलेल्या भेटीनंतर या गावातील नागरिकांमध्ये संचारलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता. म्हणूनच तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे बक्षीस या गावाने पटकावले. यंदाही आमिर खान यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना श्रमदान आणि पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा या वर्षीही चांगलीच रंगात आहे. वर्धा जिल्ह्यातील रानवाडी येथील बंडू धुर्वे या अंध व्यक्तीच्या कार्याने प्रभावित होऊन आमिर खान याने परवा पत्नी किरण राव यांच्यासह चक्क रानवाडी गाठले. आठ तास मुक्कामच केला नाही तर हातात फावडे आणि टोपले घेत श्रमदान केले. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातही चिमुकल्यांनी मोठ्यांचा आदर्श घेत वॉटर कप स्पर्धेत खारीचा वाटा उचलला आहे. त्याचीही दखल आमिरने घेतली. चिमुकल्यांना भेटून त्यांचे मनोबल वाढविले. शिवाय आपल्या वॉटर कप स्पर्धेच्या लघु चित्रपटातही त्याने या चिमुकल्यांना स्थान दिले. त्यामुळे बोरी महल या लहानशा गावाचे महत्त्वही आपसूकच वाढले आहे. पाणीटंचाईने गावा गावात हाहाकार माजविला असून त्यापासून सुटका म्हणजे आपले गाव पाणीदार करणे. त्यामुळे गावागावात चुरस लागली असून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो हात महाश्रमदानात लागले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तर अपुऱ्या पावसाने पाणीटंचाईत चांगलीच भर घातली आहे. याची चाहूल हिवाळ्यातच लागली होती. पैनगंगा नदी हिवाळ्यातच आटल्याने तिरावरील ५० गावात पाणीटंचाई निर्माण झाली. पुसद तालुक्यातील माळपठार भागातील ४० गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अखेरच्या घटका मोजत आहे. यावर मात करण्यासाठी आणि पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचे काम वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. पाण्याची सोय वेळीच केली नाही तर उद्याचे भवितव्य अंध:कारमय आहे, असा संदेशही या माध्यमातून दिला जात आहे. हे आता चिमुकल्यांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे बोरी महल येथील विद्यार्थी आता स्वत:च रोपवाटिका तयार करतात. शोषखड्ड्यांसाठी श्रमदान करतात. बंधाºयाची आखणी करून देण्यात तर ते तरबेज झाले आहेत. ढाळीचे बांध व इतर बंधारे तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. गाव पाणीदार करण्याच्या दिशेने चिमुकल्यांनी उचललेले पाऊल निश्चितच अभिनंदनीय असून इतरांनीदेखील त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा