शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पेट्रोल आणि डिझेलच्या लीटरमागे ४० रुपयांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 07:23 IST

मोदींचे ‘अच्छे दिन’ जसजसे मोठे होऊन जवळ येत आहेत, तसतशा डिझेल आणि पेट्रोल या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही ‘भडका’ घेऊ लागल्या आहेत.

मोदींचे ‘अच्छे दिन’ जसजसे मोठे होऊन जवळ येत आहेत, तसतशा डिझेल आणि पेट्रोल या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही ‘भडका’ घेऊ लागल्या आहेत. २०१४ पर्यंत ६० रु. लीटरहून कमी किमतीत विकले जाणारे पेट्रोल आता ८० रुपयांच्या पुढे गेले आहे. परभणीसारख्या मराठवाड्यातील जिल्ह्याच्या शहरात त्याचा दर लीटरमागे ८९ रु. २४ पैसे तर डिझेलचा ७५ रु. ९६ पैसे एवढा झाला आहे. जगभराच्या बाजारात तेजी आल्याचे सांगणारा एक बहाणा सरकारजवळ आहे. त्यात जगात रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरून ती ६० रुपयांवरून ७२ रुपयांपर्यंत वाढली आहे. हा दुसरा बहाणा आहे. शिवाय एवढी भाववाढ होऊनही देशात वाहने धावताहेत, मोटारी व मोटारसायकलींची विक्री होत आहे, हाही एक पुरावा सरकारच्या बाजूने भाववाढीचा जाच सुसह्य असण्यासाठी सांगितला जात आहे. आश्चर्य याचे की जगात ही भाववाढ कुठे दिसत नाही. शेजारच्या पाकिस्तानात, श्रीलंकेत किंवा म्यानमारमध्ये ती नाही. भारत हाच त्या वाढीला अपवाद ठरणारा देश असेल तर त्याची कारणे स्वदेशात शोधली पाहिजेत. तसे काहीएक विश्वसनीय कारण सुब्रमण्यम स्वामी यांनीच सांगितले आहे. स्वामी हे भाजपाचे राज्यसभेतील प्रतिनिधी व भाजपामध्ये अर्थशास्त्रज्ञ म्हणून नावाजले जाणारे पुढारी आहेत. शिवाय वेळी-अवेळी मोदींची तळी उचलून धरण्यातही त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर आपणही विश्वास ठेवायला हरकत नाही. जगात पेट्रोलचे भाव कितीही असले आणि त्यावर सरकारने नियमित कर केवढेही लावले तरी ते जनतेला ४८ रु. लीटर या दराने मिळाले पाहिजे. त्यापेक्षा ते जास्तीच्या भावाने दिले जात असेल तर ती सरकारने जनतेची चालविलेली लूट आहे, असे या स्वामींचे म्हणणे आहे. देशातील सर्व सार्वजनिक बँका बुडाल्या असून, त्यांची कर्जाची थकबाकी कित्येक लक्ष कोटींच्या घरात गेली आहे. ती वसूल करण्याची यंत्रणा या बँकांजवळ नाही आणि तशा वसुलीची सरकारला तमाही नाही. कारण बहुतेक सर्व कर्जबुडवे सरकारच्या मित्रवर्ती वर्तुळातील आहेत. एवढे की त्यांच्यातील काहींना त्या कर्जाच्या ओझ्यासह देशाबाहेर पळून जायलाही या सरकारातील मंत्र्यांनी मदत केली आहे. ते कोर्टाला जुमानत नाहीत, बँकांचे आदेश पाळत नाहीत आणि सरकारी धमक्यांनाही भीक घालत नाहीत. मल्ल्या पळाला, मग एक मोदी पळाला, नंतर दुसरा मोदी पळाला, नंतर चोक्सी पळाला. सरकार लहान माणसांना पकडते, पण मोठी माणसे त्यांच्या हाती लागत नाहीत. मग अरुण जेटली खोटी कारणे सांगतात आणि तो तथाकथित निती आयोग रघुराम राजनवर या घसरणीची जबाबदारी टाकतो. जणू या अवस्थेला रिझर्व्ह बँकच जबाबदार आहे, ते खरे मानले तरी या सरकारची देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत व गरिबांविषयी काही जबाबदारी आहे की नाही? रिझर्व्ह बँक दुर्लक्ष करीत असताना जेटलींचे अर्थमंत्रालय काय करीत होते आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणारे मोदी कुठे होते? समाज सभ्य आहे, तो आपला संताप संघटितपणे व्यक्त करीत नाही आणि मध्यमवर्गातील जे शहाणे मोदीवादी आहेत त्यांना याची झळ त्यांच्या राजकीय बुद्धीपायी फारशी जाणवत नाही. मात्र ग्रामीण भाग, लहान गावे, छोटे व्यापारी, विद्यार्थी व कामगारांचे वर्ग आणि विशेषत: स्त्रिया यांना या बेजबाबदारीचे केवढे मोल मोजावे लागते याची चिंता तरी या सरकारला असावी की नाही? ही आपली लूट समाज खपवून घेतो व सरकारच्या दानखात्यात जमा करतो अशीच या सरकारची धारणा आहे. तसे ते स्वामी सरकार व मोदींना कधी नाराज करीत नाहीत. त्यांचे तोंडाळपण काँग्रेस व गांधी घराणे याविरुद्धच बरळत असते. या स्थितीत प्रथमच त्या स्वामीला सरकारविषयी काही खरे बोलावेसे व ते जनतेची लूट करीत असल्याचे सांगावे असे वाटले असेल तर ते सरकारने अधिक गंभीरतेने घेतले पाहिजे. त्याच वेळी कोणत्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव सरकारने कृत्रिमरीत्या वाढविले आहेत, याचीही शहानिशा आता होणे आवश्यक झाले आहे.आता भाजपाचे पुढारी सरकारवर लुटीचा आरोप करीत असतील तर आपण त्यावर अविश्वास कसा दाखवायचा? वास्तव हे की, देशाच्या अर्थव्यवस्थेलाच अवकळा आली आहे. मोदींनी देशात नोटाबंदी केली तेव्हापासूनच ही घसरण सुरू झाली़

टॅग्स :Petrolपेट्रोल