शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

बंगालमध्ये कमळ फुलले, पण..

By admin | Updated: September 20, 2014 11:58 IST

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल सर्वच राजकीय पक्षांसाठी धडा शिकविणारे ठरले आहेत.

- स्वपन दासगुप्ता, ज्येष्ठ पत्रकार
 
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल सर्वच राजकीय पक्षांसाठी धडा शिकविणारे ठरले आहेत. भारतीय मतदार राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर आणि ग्रामीण पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने मतदान करताना दिसून आला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसाठी मतदारांची ही वर्तणूक आव्हानात्मक ठरली आहे. गेल्या दोन महिन्यांत ज्या पोटनिवडणुका झाल्या, त्यांचे निकाल लोकसभेच्या निकालांपेक्षा वेगळे दिसून आले आहेत. त्याचे सुसंगत वेिषण करणेही कठीण झाले आहे; पण एक गोष्ट स्पष्ट आहे, की भारतीय जनता पक्षाचा मतदानाचा टक्का घटतो आहे. सर्वच राज्यांत हीच परिस्थिती आढळून आली आहे. त्यातही मतदानातील ही घसरण पश्‍चिम बंगालमध्ये कमी आढळून आली आहे. या राज्यात दोन ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या. त्यापैकी मध्य कोलकात्यातील चौरिंघी मतदारसंघात भाजपाच्या मतदानात अवघी एक टक्का घट दिसून आली. तेथील निवडणुकीत मे २00४च्या तुलनेत ९.७ टक्के मतदान कमी झाले. बशीरहाट दक्षिण या उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील मतदानात भाजपाची मतसंख्या २.१ टक्क्याने कमी झाली.
भाजपाची प. बंगालमधील संघटना दुबळी असूनही तो पक्ष आपली मतसंख्या दोन्ही मतदारक्षेत्रात टिकवून ठेवू शकला. अन्य राज्यात मोदींचा प्रभाव घटल्याचे दिसून आले, तसे ते प. बंगालमध्ये दिसले नाही. उलट बशीरहाट दक्षिणची जागा जिंकून भाजपाने प. बंगाल विधानसभेत प्रथमच खाते उघडले आहे. चौरिंघी मतदारसंघातसुद्धा भाजपा दुसर्‍या क्रमांकावर आहे. या दोन्ही मतदारसंघात त्याने माकपवर मात केल्याचे दिसून आले आहे. २0११च्या निवडणुकीत भाजपाला स्वत:चा प्रभाव दाखवता आला नव्हता. त्या पार्श्‍वभूमीवर त्याने या राज्यात केलेली प्रगती आश्‍चर्यजनक आहे. कम्युनिस्टांच्या मतदारांना खिंडार पाडून भाजपाने ही प्रगती केली आहे. 
मे २0१४च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने प. बंगालवर जवळजवळ वर्चस्व प्रस्थापित केले होते. ती आगेकूच त्या पक्षाने कायम ठेवली आहे. चोरिंघीची जागा तृणमूल काँग्रेसने काँग्रेसकडून हिसकावून घेतली आहे. या ठिकाणी त्या पक्षाच्या मतदानात ९.७ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बशीरहाट दक्षिण मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचा निसटता पराभव झाला आहे. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसची मते तृणमूल काँग्रेसकडे वळल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात कम्युनिस्टांची मतसंख्या घटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण बंगालमधून कम्युनिस्ट पक्ष हळूहळू नामशेष होत आहे आणि त्याचे पाठीराखे तृणमूल काँग्रेसभोवती जमा होत आहेत, असेच एकूण चित्र आहे. कोलकात्यातही भाजपाच्या उमेदवाराला मिळालेली मते लक्षणीय म्हणावी लागतील आणि ते मतदान भाजपाचा आत्मविश्‍वास वाढविणारे ठरले आहे.
या पोटनिवडणुकीतून जो कल दिसून आला आहे, त्यावरून तृणमूल काँग्रेस कम्युनिस्ट पक्षाचीच पुनरावृत्ती करताना दिसून येते. ग्रामीण भागात तृणमूल काँग्रेसचे बळ वाढते आहे, तर शहरी भागात ते घटते आहे आणि शहरी भागात भाजपाचा प्रभाव वाढतो आहे; पण भाजपाला आपले अस्तित्व परिणामकारक पद्धतीने दाखविण्यासाठी संघटनेची चौकट अधिक व्यापक करावी लागणार आहे. पुढील वर्षी मे महिन्यात कोलकाता महानगरपालिकेसह अन्य नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने पक्षाला संघटनात्मक बांधणी करावी लागेल. सध्या लोकांच्या उत्स्फूर्तपणे होणार्‍या मतदानावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. राज्यात स्वत:चे निष्ठावंत कार्यकर्ते निर्माण करणे पक्षासाठी गरजेचे आहे. तृणमूल 
काँग्रेस प्रत्येक मोहल्ल्यात पक्केपणी रुजलेली आहे. ती स्थिती निर्माण करण्यास भाजपाला वेळच लागणार आहे. शारदा घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे अनेक पदाधिकारी गुंतलेले आहेत. त्यामुळे त्या पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागू शकतो, त्याचा फायदा कोण करून घेतो, काँग्रेस की भारतीय जनता पक्ष? हे आगामी काळात दिसणार आहे.